शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

Ganesh Festival: सर्वधर्म समभावाची जोपासना करणारे वीर हनुमान गणेश मंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 13:56 IST

सर्वधर्म समभावाची जोपासना करणारे वीर हनुमान मंडळलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :   येथील शंकर नगर भागातील वीर हनुमान मंडळाचा सर्व धर्म समभाव जोपासना करणारे मंडळ म्हणून नावलौकीक आहे. या भागात मिश्र वस्तीचा समावेश असल्यामुळे कार्यकारिणीतही सर्वच जाती धर्माच्या नागरिकांना स्थान दिले जाते. पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर या मंडळाचा अधिक भर असला तरी, परिसरातील गोर गरीबांच्या ...

सर्वधर्म समभावाची जोपासना करणारे वीर हनुमान मंडळ

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव:   येथील शंकर नगर भागातील वीर हनुमान मंडळाचा सर्व धर्म समभाव जोपासना करणारे मंडळ म्हणून नावलौकीक आहे. या भागात मिश्र वस्तीचा समावेश असल्यामुळे कार्यकारिणीतही सर्वच जाती धर्माच्या नागरिकांना स्थान दिले जाते. पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर या मंडळाचा अधिक भर असला तरी, परिसरातील गोर गरीबांच्या सेवेसाठी मंडळाचे पदाधिकारी सदैव अग्रेसर असतात. नवनवीन संकल्पनांमुळे या मंडळाला शासनाकडून वारंवार गौरविण्यात आले आहे.

वीर हनुमान गणेश मंडळाची स्थापना सन १९८५ च्या कालावधीत झाली असून, सन १९९२ साली वीर हनुमान मंडळाची धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात आली.  परिसरातील हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख, जैन, ख्रिश्चन बांधवांचा समावेश या मंडळाच्या कार्यकारिणत केला जातो. दरवर्षी वेगवेगळ्या समुदायातील व्यक्तीला अध्यक्षपद दिले जाते.

महिला सशक्तीकरण, शेतकरी  आत्महत्या, पर्यावरण रक्षणासोबतच सामाजिक समस्यांवर या मंडळाकडून वेळोवेळी कृतीशील उपक्रम राबविण्यात येतात. यावर्षी मंडळाने गणेशोत्सव कार्यकारिणी अध्यक्षपदी प्रमोद सुरेश रोकडे(जैन) यांची निवड केली आहे. तर उपाध्यक्ष समाधान लोढे, सचिव शेख इरफान शेख युसुफ,  सहसचिव  संतोष डवंगे, कोषाध्यक्ष प्रल्हाद संपत बोदडे, श्याम कोथळकर, जसवंतसिंह शीख अशी सर्व धर्म समभावाची कार्यकारीणी तयार केली आहे. पर्यावरणपूरक आणि सामाजिक संदेशावर या मंडळाचा अधिकभर राहतो. त्यामुळे विविध सामाजिक संघटनांसोबतच पोलिस आणि महाराष्ट्र शासनाकडूनही मंडळाला वेळोवेळी गौरविण्यात आले आहे. लोकमान्य टिळकांना हारार्पण केल्याशिवाय या मंडळाकडून श्री गणेशाची स्थापनाच केली जात नाही. हे या मंडळाचे वेगळे वैशिष्टे म्हणावे लागेल.

लोककलांची जोपासना!

सामाजिक एकोप्यासोबतच लोककलांची जोपासना करण्यासाठी वीर हनुमान मंडळाचे पदाधिकारी नियमित प्रयत्नशील असतात. रूग्णसेवेतही हे मंडळ सदैव अग्रेसर राहते. व्यसनमुक्ती, आरोग्य विषयक जनजागृती आणि एडस् जनजागृती विषयक कार्यक्रमामध्ये मंडळाचा नेहमीच पुढाकार राहतो. 

समाजातील उपेक्षीत आणि वंचितांची सेवा करण्यासोबतच राष्ट्र धर्माचे पालन वीर हनुमान मंडळाकडून केले जाते.   सर्व धर्म समभावाची जोपासना हे वीर हनुमान मंडळाचे मुख्य वैशिष्ट्ये आहे.

- अ‍ॅड. मनदिपसिंह शीख, मार्गदर्शक, वीर हनुमान मंडळ, शंकर नगर खामगाव. 

टॅग्स :khamgaonखामगावGanpati Festivalगणेशोत्सव