कंत्राटी कर्मचा-यांचे भविष्य अंधारात

By Admin | Updated: December 22, 2014 00:47 IST2014-12-22T00:47:44+5:302014-12-22T00:47:44+5:30

कंत्राटी कामगाराच्या मानधनात वाढीसह इतर मागण्या शासनदरबारी अद्यापही प्रलंबित.

The future of contractual employees in the dark | कंत्राटी कर्मचा-यांचे भविष्य अंधारात

कंत्राटी कर्मचा-यांचे भविष्य अंधारात

बुलडाणा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर असलेल्या कंत्राटी कामगाराच्या मानधनात वाढीसह इतर मागण्या शासनदरबारी अद्यापही प्रलंबित असल्यामुळे राज्यातील तीन हजार कर्मचार्‍यांचे भविष्य अंधारमय झाले आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन २0११-१२ मध्ये कंत्राटी कर्मचार्‍यांची पदभरती करीत असताना एम.आय.एस. समन्वयक, कार्यक्रम व्यवस्थापक, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक अधिकारी, लेखापाल, लिपिक कम डाटा एन्ट्री ऑपरेटर अशी पदनिहाय भरती करण्यात आली. सदर भरती ही जिल्हा सेतू संस्थेमार्फत राज्य निधी असोसिएशनकडून करण्यात आली होती. महाराष्ट्रात जवळपास ३ हजार ५00 कंत्राटी कर्मचारी या योजनेचे काम पाहत आहेत.
सन २0११ पासून ते आजपयर्ंत अनेकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम नरेगा कंत्राटी कर्मचार्‍यांनी केले आहेच परंतु शासनाने सदर कंत्राटी कर्मचार्‍यांना अत्यल्प मानधन देत असून, या कर्मचार्‍यांचे भवितव्य अंधकारमय झालेले आहे.

Web Title: The future of contractual employees in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.