जिल्ह्यातील चार प्रकल्प ओव्हरफ्लाे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:40 IST2021-09-24T04:40:45+5:302021-09-24T04:40:45+5:30
बुलडाणा : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून हाेत असलेल्या जाेरदार पावसामुळे प्रकल्पांच्या जलसाठ्यात माेठी वाढ झाली आहे़ चार प्रकल्प ओव्हरफ्लाे ...

जिल्ह्यातील चार प्रकल्प ओव्हरफ्लाे
बुलडाणा : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून हाेत असलेल्या जाेरदार पावसामुळे प्रकल्पांच्या जलसाठ्यात माेठी वाढ झाली आहे़ चार प्रकल्प ओव्हरफ्लाे झाले आहेत़ या प्रकल्पांमधून नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहेत़ खडकपूर्णा प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ हाेत असल्याने ९ वक्रदारातून ३० सेमीने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे़
ऑगस्ट महिन्यापासून जिल्ह्यात दमदार पाऊस हाेत आहे़ त्यामुळे, जलसाठ्यात वाढ हाेत असून अनेक प्रकल्प ओव्हरफ्लाे झाले आहेत़ सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत प्रकल्पक्षेत्रात जाेरदार पाऊस झाल्याने ज्ञानगंगा, काेराडी, उतावळी प्रकल्प ओव्हरफ्लाे झाले आहेत़ तसेच नळगंगामध्ये ६३़ २३ टक्के, पेनटाकळीमध्ये ६०़ ६० टक्के आणि खडकपूर्णा प्रकल्पात ८९़ ७३ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे़ सप्टेंबर महिन्यापर्यंत २० टक्क्यावर असलेल्या पलढग प्रकल्पाच्या जलसाठ्यातही माेठी वाढ झाली असून ६३़ ५२ टक्क्यांपर्यंत जलसाठा वाढला आहे़ मस प्रकल्पात ६२़ ०३ टक्के,मन प्रकल्पात ९८.७५ टक्के, ताेरणा प्रकल्पात ८५.६८ टक्के जलसाठा आहे़ दमदार पावसामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न सुटला आहे़
मध्यम, लघु प्रकल्पही तुडुंब
जिल्ह्यात एकूण ७ मध्यम व ८१ लघु प्रकल्प आहेत़ या प्रकल्पांमध्येही माेठ्या प्रमाणात जलसाठा वाढला आहे़ मध्यम प्रकल्पामध्ये सरासरी ९२.६२ टक्के तर लघु प्रकल्पांमध्ये ६४.६१ टक्के जलसाठा आहे़ जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये आतापर्यंत ७५.५२ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे़
काेराडी, उतावळीतून पाण्याचा विसर्ग
मेहकर तालुक्यातील काेराडी प्रकल्प ओव्हरफ्लाे झाला असून २० सेमीने पाण्याचा विसर्ग सुरू आहे़ तसेच उतावळी प्रकल्पही भरला असून ३ सेमीने पाण्याचा विसर्ग सुरू आहे़ प्रकल्पांच्या क्षेत्रात दमदार पाऊस हाेत असल्याने जलसाठ्यात आणखी वाढ हाेणार आहे़ यावर्षी प्रकल्प भरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे़
पद्मावती धरण ओव्हरफ्लाे, ३२ गावांना दिलासा
बुलडाणा तालुक्यातील धामणगावसह परिसरात गेल्या काही दिवसापासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे परिसरातील नदी, ओढे, तुडुंब भरले आहे़ त्यामुळे पदमावती धरण ओव्हरफ्लाे झाले असून परिसरातील ३२ गावांचा पिण्याचे पाणी तसेच खरीपासह रब्बी हंगामातील पिकांना मोठा फायदा हाेणार आहे़ हे मराठवाडा व विदर्भाच्या असलेल्या या धरणाचा वालसावंगीसह, पारध, धामणगाव , वाढोणा , मासरूळ, डोमरूळ, जनुना , गुम्मी , तराडखेड आदी गावांना दिलासा मिळणार आहे़