शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

बुलडाणा जिल्ह्यात चार टक्के पीककर्जाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 17:31 IST

बुलडाणा: पीक कर्ज वाटपाचा टक्का तब्बल १२ दिवसांनी एक टक्का वाढला असून आतापर्यंत चार टक्के शेतकºयांना ६६ काटी ५५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

बुलडाणा: पीक कर्ज वाटपाचा टक्का तब्बल १२ दिवसांनी एक टक्का वाढला असून आतापर्यंत चार टक्के शेतकºयांना ६६ काटी ५५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. २५ मे रोजी चार हजार १८२ शेतकºयांना ४९ कोटी ४८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. त्यामुळे पीक कर्ज वाटपाचा टक्का वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.वर्तमान स्थितीत जिल्ह्यातील आठ हजार ७४७ शेतकºयांना ६६ कोटी ५५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप झाले असून त्याची टक्केवारी ही चार टक्के आहे. बुलडाणा जिल्ह्यात यंदा तीन लाख ३४ हजार शेतकºयांना एक हजार ७७३ कोटी ७७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट आहे. पीक कर्ज वाटपास प्रारंभ होऊन दीड महिन्याचा कालावदी जवळपास लोटला आहे. मात्र वाटपाचा टक्का अपेक्षेप्रमाणे सुधारलेला नाही. दर १५ दिवसांनी पीक कर्ज वाटपाचा आढावा यंत्रणा घेत आहे. त्यातून उपलब्ध झालेल्या  आकडेवारीचा विचार करता पीक कर्ज वाटपाचा टक्का तुलनेने कमी आहे. गत वर्षी ३४.१५ टक्के पीक कर्ज वाटप संपूर्ण हंगामात झाले होते. ही बाब पाहता यंदा हा टक्का वाढविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली करण्यात येत आहे. त्यासाठी पीक कर्ज मेळावे मंडळ निहाय घेण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र अपेक्षीत असा प्रतिसाद अद्याप त्यास मिळालेला नाही.मान्सून सध्या तोंडावर आलेला आहे. बुलडाणा जिल्ह्यात अद्याप एकदाही मान्सूनपूर्व पाऊस पडलेला नाही. येत्या काळात तो सक्रीय होईल. त्यामुळे शेतकºयांनीही शेती मशागतीची लगबक करून ती पूर्णत्वास नेली आहे. पावसाचे आगमन होताच शेतकरी पेरते होतील. मात्र त्यासाठी बी-बियाणे खरेदीसाठी वर्तमान स्थितीत शेतकºयांना पीक कर्ज उपलब्ध झाल्यास त्यांचा पुढील काळाताली भार हलका होण्यास मदत होणार आहे. मात्र एकंदरीत परिस्थिती पाहता पीक कर्ज वाटपाचा टक्का तुलनेने अत्यंत कमी आहे.दुष्काळी स्थिती पाहता शेतकºयांच्या हातात आता किमान पैसा असणे येत्या खरीप हंगामासाठी आवश्यक झाले आहे. मात्र बँकांच्यास्तरावर त्यादृष्टीने अपेक्षीत कार्यवाही होत नसल्याचे चित्र आहे.

जिल्हा बँकेचे ३७ टक्के वाटपपीक कर्ज वाटपाचा विचार करता जिल्हा  केंद्रीय सहकारी बँकेने आतापर्यंत एकूण उदिष्टाच्या ३७ टक्के वाटप केले आहे. जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेला ४७ कोटी २५ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट असून त्यापैकी १७ कोटी ४४ लाख रुपयांचे त्यांनी एक हजार ७४४ शेतकºयांना वाटप केले आहे. राष्टीयकृत, व्यापारी आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचा विचार करता सर्वाधिक पीक कर्ज हे जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने आतापर्यंत वाटप केले आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी