शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

संघटीत गुन्हे करणारे पाच जण तडीपार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 18:39 IST

बुलडाणा : जिल्ह्यात संघटीत गुन्हे करणार्या तीन टोळ््यांपैकी एका टोळीत पाच जणांना जिल्हा पोलिस अधीक्षकानी आगामी सहा महिन्यासाठी घाटाखालील सहा तालुक्यातून हद्दपार केले आहे.

बुलडाणा : जिल्ह्यात संघटीत गुन्हे करणार्या तीन टोळ््यांपैकी एका टोळीत पाच जणांना जिल्हा पोलिस अधीक्षकानी आगामी सहा महिन्यासाठी घाटाखालील सहा तालुक्यातून हद्दपार केले आहे. दरम्यान, संघटीत गुन्हे करणार्या आणखी दोन टोळ््यातील सदस्यही हद्दपारीच्या उंबरठ्यावर असून कायदेशीर प्रक्रिया पूर्णत्वास जाताच त्यांनाही प्रसंगी जिल्ह्यातून हद्दपार केले जाण्याचे संकेत आहेत. सहा तालुक्यातून हद्दपार करण्यात आलेले पाचही जण हे मलकापूर येथील असून त्यांच्यावर गंभीरस्वरुपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत. यामध्ये टोळीप्रमुख शहजार खान सलीम खान (३०, रा. मालवीयपुरा) त्याचे साथीदार मोहम्मद दानीश शेख रशीद (२६, रा. रायकल पुरा), शेख शाहीद अहमद अ. सलमान (३०, रा. मोहनपुरा), अतिकुर रहेमान शफीकुर रहेमान (३३, रा. पांढरी, पारपेठ,), शेक आरिफ शेख अहमद (३५, रा. फातेमानगर) अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व जण मलकापूर शहरातील रहिवासी आहेत. या सर्व आरोपींवर खुनाचा प्रयत्न, दंगल घडविणे, दंगलीत घातक हत्यारांचा वापर करणे, सरकारी नोकराच्या कामात अडथळा निर्माण करणे व त्यांच्यावर हल्ला करणे, अत्यावश्यक वस्तूंची काळाबाजारी करणे, शासकीय व खासगी मालमत्तेचे नुकसान करणे अशा स्वरुपाचे गंभीर व शारीरिक नुकसान करणारे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते. मलकापूर शहर आणि दसरखेड (एमआयडीसी) पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात हे गुन्हे दाखल झालेले आहेत. दरम्यान, त्यांच्या विरोधात वेळोवेळी कायदेशीर व प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्यात सुधारणा झालेली नव्हती. उलटपक्षी त्यांच्या वास्तव्यामुळे व हालचालीमुळे मलकापूर शहर, मलकापूर तालुका व परिसरात सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात संबंधित परिसरातील नागरिकही पोलिसांत तक्रार देण्यास धजावत नव्हते. प्रकरणी या टोळीचे मलकापूर परिसरातील वास्तव्यामुळे त्यांचे बेकायदेशीर कृत्य रोखण्यासाठी, त्यांना हिंसेपासून परावृत्त करण्यासाठी, नागरिकांच्या जिविताचे व मालमत्तेच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून पाचही जणांना महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ च्या कलम ५५ (१) प्रमाणे किमान दोन वर्षा च्या कालावधीसाठी बुलडाणा, जळगाव व अकोला जिल्ह्याच्या बाहेर हद्दपार करण्याचा प्रस्ताव मलकापूर पोलिस ठाण्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे पाठवला होता. त्यानुषंगाने पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ च्या कलम ५५नुसार टोळ््यांची पांगापांगमद्ये देण्यात आलेल्या तरतुदीसह अन्य कलमांचा आधार प्राप्त कायदेशीर अधिकाराचा वापर करत उपरोक्त पाचही जणांना नांदुरा, मोताळा, जळगाव जामोद, खामगाव तालुक्यातून १४ सप्टेंबरला हद्दपार करण्याचे आदेश पारीत केले आहेत. यासंदर्भात मलकापूर शहर पोलिस आणि मलकापूर उपविभागीय पोलिस अधिकारी यांचा चौकशी अहवाल आणि पुरावे विचारात घेऊन हे आदेश दिल्या गेले असल्याची माहिती आहे. ४८ तासांची दिली होती मुदत सहा तालुक्यात पाचही जणांना हद्दपार केल्यानंतर मलकापूर शहर सोडण्यासाठी त्यांना ४८ तासांची मुदत देण्यात आली होती. दरम्यान, पाचही आरोपी हे स्वच्छेने अन्यत्र जाणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र हद्दपारीचा आदेश झालेल्या सहाही तालुक्याबाहेर जेथे ते जातील तेथील पोलिसांना त्यांना त्याबाबत सुचनाही द्यावी लागणार असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी