शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

संघटीत गुन्हे करणारे पाच जण तडीपार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 18:39 IST

बुलडाणा : जिल्ह्यात संघटीत गुन्हे करणार्या तीन टोळ््यांपैकी एका टोळीत पाच जणांना जिल्हा पोलिस अधीक्षकानी आगामी सहा महिन्यासाठी घाटाखालील सहा तालुक्यातून हद्दपार केले आहे.

बुलडाणा : जिल्ह्यात संघटीत गुन्हे करणार्या तीन टोळ््यांपैकी एका टोळीत पाच जणांना जिल्हा पोलिस अधीक्षकानी आगामी सहा महिन्यासाठी घाटाखालील सहा तालुक्यातून हद्दपार केले आहे. दरम्यान, संघटीत गुन्हे करणार्या आणखी दोन टोळ््यातील सदस्यही हद्दपारीच्या उंबरठ्यावर असून कायदेशीर प्रक्रिया पूर्णत्वास जाताच त्यांनाही प्रसंगी जिल्ह्यातून हद्दपार केले जाण्याचे संकेत आहेत. सहा तालुक्यातून हद्दपार करण्यात आलेले पाचही जण हे मलकापूर येथील असून त्यांच्यावर गंभीरस्वरुपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत. यामध्ये टोळीप्रमुख शहजार खान सलीम खान (३०, रा. मालवीयपुरा) त्याचे साथीदार मोहम्मद दानीश शेख रशीद (२६, रा. रायकल पुरा), शेख शाहीद अहमद अ. सलमान (३०, रा. मोहनपुरा), अतिकुर रहेमान शफीकुर रहेमान (३३, रा. पांढरी, पारपेठ,), शेक आरिफ शेख अहमद (३५, रा. फातेमानगर) अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व जण मलकापूर शहरातील रहिवासी आहेत. या सर्व आरोपींवर खुनाचा प्रयत्न, दंगल घडविणे, दंगलीत घातक हत्यारांचा वापर करणे, सरकारी नोकराच्या कामात अडथळा निर्माण करणे व त्यांच्यावर हल्ला करणे, अत्यावश्यक वस्तूंची काळाबाजारी करणे, शासकीय व खासगी मालमत्तेचे नुकसान करणे अशा स्वरुपाचे गंभीर व शारीरिक नुकसान करणारे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते. मलकापूर शहर आणि दसरखेड (एमआयडीसी) पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात हे गुन्हे दाखल झालेले आहेत. दरम्यान, त्यांच्या विरोधात वेळोवेळी कायदेशीर व प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्यात सुधारणा झालेली नव्हती. उलटपक्षी त्यांच्या वास्तव्यामुळे व हालचालीमुळे मलकापूर शहर, मलकापूर तालुका व परिसरात सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात संबंधित परिसरातील नागरिकही पोलिसांत तक्रार देण्यास धजावत नव्हते. प्रकरणी या टोळीचे मलकापूर परिसरातील वास्तव्यामुळे त्यांचे बेकायदेशीर कृत्य रोखण्यासाठी, त्यांना हिंसेपासून परावृत्त करण्यासाठी, नागरिकांच्या जिविताचे व मालमत्तेच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून पाचही जणांना महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ च्या कलम ५५ (१) प्रमाणे किमान दोन वर्षा च्या कालावधीसाठी बुलडाणा, जळगाव व अकोला जिल्ह्याच्या बाहेर हद्दपार करण्याचा प्रस्ताव मलकापूर पोलिस ठाण्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे पाठवला होता. त्यानुषंगाने पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ च्या कलम ५५नुसार टोळ््यांची पांगापांगमद्ये देण्यात आलेल्या तरतुदीसह अन्य कलमांचा आधार प्राप्त कायदेशीर अधिकाराचा वापर करत उपरोक्त पाचही जणांना नांदुरा, मोताळा, जळगाव जामोद, खामगाव तालुक्यातून १४ सप्टेंबरला हद्दपार करण्याचे आदेश पारीत केले आहेत. यासंदर्भात मलकापूर शहर पोलिस आणि मलकापूर उपविभागीय पोलिस अधिकारी यांचा चौकशी अहवाल आणि पुरावे विचारात घेऊन हे आदेश दिल्या गेले असल्याची माहिती आहे. ४८ तासांची दिली होती मुदत सहा तालुक्यात पाचही जणांना हद्दपार केल्यानंतर मलकापूर शहर सोडण्यासाठी त्यांना ४८ तासांची मुदत देण्यात आली होती. दरम्यान, पाचही आरोपी हे स्वच्छेने अन्यत्र जाणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र हद्दपारीचा आदेश झालेल्या सहाही तालुक्याबाहेर जेथे ते जातील तेथील पोलिसांना त्यांना त्याबाबत सुचनाही द्यावी लागणार असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी