शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

राजूर घाटात आगीचे तांडव; वनसंपदा नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 19:01 IST

बुलडाणा: शहरालगतच्या राजूर घाटात पुन्हा एकदा आगीचे तांडव २८ एप्रिल रोजी दिसून आले.

बुलडाणा: शहरालगतच्या राजूर घाटात पुन्हा एकदा आगीचे तांडव २८ एप्रिल रोजी दिसून आले. यामध्ये प्रादेशिक वनविभागातंर्गत येत असलेली वनसंपदा नष्ट झाली आहे. दरम्यान, वनविभागाचे आग रोधक पथक मात्र उशिरार्पंत या ठिकाणी पोहोचले नव्हते.बुलडाणा शहरालगतच्या या भागात अलिकडील काळात सातत्याने आगीच्या घटना घडत आहे. त्यात लोख रुपये किंमतीची वनसंपदा नष्ट होत आहे. मात्र वनविभागाकडून या वनसंपदेच्या रक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यातच खडकी रस्त्या लगतच्या भागातही मधल्या काळात आग लागली होती. या भागात काही ठिकाणी दगडांच्या पाळा रचण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या भागात अतिक्रमण करण्यासाठीतर अशा आगीच्या घटना घडवल्या जात नसाव्यात ना अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे वनविभागाने या भागात लागणार्या आगीकडे गांभिर्याने बघण्याची गरज निर्माण झाली आहे. मार्च महिन्यातही या भागात आग लागली होती. त्यावेळीही मोठ्या प्रमाणावर वनसंपदेचे नुकसान झाले होते. शहराचे वैभव असलेला आरटीओ आॅफीस जवळचा व्हीव्ह पॉईंट परिसरातही यापूर्वी आगीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे वनविभागाने वनसंपदेच्या रक्षणाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.दुसरीकडे ज्ञानगंगा अभयारण्यातही गेल्या काही वर्षापासून सातत्याने आगीच्या घटना घडत असून येथील वनसंपदाही धोक्यात आली आहे. २००७ मध्ये ज्ञानगंगा अभयारण्यात मोठी आग लागली होती. त्यानंतर सातत्याने अलिकडील काळात या आगीच्या घटना घडत आहे. त्यातच वाढत्या तापमानाचाही फटका वनसंपदेला बसत असून त्यातून ही आग आणखी भडकत आहे. त्यामुळे जाळ रेषेची कामेही वन्यजीव तथा प्रादेशिक वनविभागात प्रभावी पणे केली जाण्याची गरज आहे.

सातपुडा परिसरात वणवा; लाखोंची वनसंपत्ती धोक्यात

जळगाव जामोद: : सातपुडा पर्वतातील निमखेडी बिटमध्ये २२ एप्रिल पासून राखीव वनात वणवा लागल्याने वनसंपत्तीचे अतोनात नुकसान होत आहे. अद्याप आग आटोक्यात आणण्यास वनविभागास अपयश आल्याचे दिसून येत आहे. २२ एप्रिल पासून राखीव जंगलात वणवा लागला असल्याने मोठयाप्रमाणात साग, धावडा, सालाई, अंजन इत्यादी बहुमोल विविध जैव वनस्पती वनव्याच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. याबाबत २७ एप्रिल रोजी वनपरिक्षेत्रअधिकारी कांबळे यांच्याशी संपर्क केला असता, आग विझविण्यासाठी मजूर पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान वनविभागाच्या दुर्लक्षामुळे लाखो रूपयांची वनसंपदा जळून खाक होत असल्याची भावना निमखेडी येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. शासनाकडून बिटमध्ये वन संरक्षण समित्यासुध्दा स्थापन करण्यात आल्या आहेत. नियमानुसार वनसंपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांची व वनविभागाची आहे. परंतु सर्वांचेच दुर्लक्ष होत असल्याने आगीत वनसंपदा भक्ष्यस्थानी पडत असल्याचे दिसून येत आहे. वन संरक्षण समितीला शासनाकडून निधीही मिळतो. तरीही याकडे दुर्लक्ष करण्यात येते. या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आदिवासी ग्राम निमखेडी येथील नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाforestजंगलfireआग