शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

राजूर घाटात आगीचे तांडव; वनसंपदा नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 19:01 IST

बुलडाणा: शहरालगतच्या राजूर घाटात पुन्हा एकदा आगीचे तांडव २८ एप्रिल रोजी दिसून आले.

बुलडाणा: शहरालगतच्या राजूर घाटात पुन्हा एकदा आगीचे तांडव २८ एप्रिल रोजी दिसून आले. यामध्ये प्रादेशिक वनविभागातंर्गत येत असलेली वनसंपदा नष्ट झाली आहे. दरम्यान, वनविभागाचे आग रोधक पथक मात्र उशिरार्पंत या ठिकाणी पोहोचले नव्हते.बुलडाणा शहरालगतच्या या भागात अलिकडील काळात सातत्याने आगीच्या घटना घडत आहे. त्यात लोख रुपये किंमतीची वनसंपदा नष्ट होत आहे. मात्र वनविभागाकडून या वनसंपदेच्या रक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यातच खडकी रस्त्या लगतच्या भागातही मधल्या काळात आग लागली होती. या भागात काही ठिकाणी दगडांच्या पाळा रचण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या भागात अतिक्रमण करण्यासाठीतर अशा आगीच्या घटना घडवल्या जात नसाव्यात ना अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे वनविभागाने या भागात लागणार्या आगीकडे गांभिर्याने बघण्याची गरज निर्माण झाली आहे. मार्च महिन्यातही या भागात आग लागली होती. त्यावेळीही मोठ्या प्रमाणावर वनसंपदेचे नुकसान झाले होते. शहराचे वैभव असलेला आरटीओ आॅफीस जवळचा व्हीव्ह पॉईंट परिसरातही यापूर्वी आगीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे वनविभागाने वनसंपदेच्या रक्षणाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.दुसरीकडे ज्ञानगंगा अभयारण्यातही गेल्या काही वर्षापासून सातत्याने आगीच्या घटना घडत असून येथील वनसंपदाही धोक्यात आली आहे. २००७ मध्ये ज्ञानगंगा अभयारण्यात मोठी आग लागली होती. त्यानंतर सातत्याने अलिकडील काळात या आगीच्या घटना घडत आहे. त्यातच वाढत्या तापमानाचाही फटका वनसंपदेला बसत असून त्यातून ही आग आणखी भडकत आहे. त्यामुळे जाळ रेषेची कामेही वन्यजीव तथा प्रादेशिक वनविभागात प्रभावी पणे केली जाण्याची गरज आहे.

सातपुडा परिसरात वणवा; लाखोंची वनसंपत्ती धोक्यात

जळगाव जामोद: : सातपुडा पर्वतातील निमखेडी बिटमध्ये २२ एप्रिल पासून राखीव वनात वणवा लागल्याने वनसंपत्तीचे अतोनात नुकसान होत आहे. अद्याप आग आटोक्यात आणण्यास वनविभागास अपयश आल्याचे दिसून येत आहे. २२ एप्रिल पासून राखीव जंगलात वणवा लागला असल्याने मोठयाप्रमाणात साग, धावडा, सालाई, अंजन इत्यादी बहुमोल विविध जैव वनस्पती वनव्याच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. याबाबत २७ एप्रिल रोजी वनपरिक्षेत्रअधिकारी कांबळे यांच्याशी संपर्क केला असता, आग विझविण्यासाठी मजूर पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान वनविभागाच्या दुर्लक्षामुळे लाखो रूपयांची वनसंपदा जळून खाक होत असल्याची भावना निमखेडी येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. शासनाकडून बिटमध्ये वन संरक्षण समित्यासुध्दा स्थापन करण्यात आल्या आहेत. नियमानुसार वनसंपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांची व वनविभागाची आहे. परंतु सर्वांचेच दुर्लक्ष होत असल्याने आगीत वनसंपदा भक्ष्यस्थानी पडत असल्याचे दिसून येत आहे. वन संरक्षण समितीला शासनाकडून निधीही मिळतो. तरीही याकडे दुर्लक्ष करण्यात येते. या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आदिवासी ग्राम निमखेडी येथील नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाforestजंगलfireआग