वीज वितरण कार्यालयात उपोषण
By Admin | Updated: May 20, 2014 23:50 IST2014-05-20T23:48:58+5:302014-05-20T23:50:12+5:30
मनसेच्यावतीने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात ग्रामस्थांनी व पदाधिकार्यांनी आज २0 मे पासून उपोषण सुरू केले.

वीज वितरण कार्यालयात उपोषण
मलकापूर : धानोरा (विटाळी) येथील पथदिवे मंजूर असताना खड्डे खोदल्यानंतर टाकलेले खांब ठेकेदाराने इतरत्र हलविले. तेव्हा काढलेले खांब तात्काळ लावून पथदिवे त्वरित लावावे या मागणीसाठी मनसेच्यावतीने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात ग्रामस्थांनी व पदाधिकार्यांनी आज २0 मे पासून उपोषण सुरू केले.सदर उपोषणाची पहिल्याच दिवशी लेखी आश्वासनाने सांगता करण्यात आली. धानोरा (विटाळी) येथे डिपीडीसीतून पथदिवे मंजूर झाले आहेत. ठेकेदाराने पथदिव्यांसाठी खड्डे खोदून ठेवले. मात्र गावात आलेले खांब व साहित्य ठेकेदाराने इतरत्र हलविल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी झाली. याबाबत ७ मे रोजी निवेदन देवून पथदिवे तात्काळ लावा अन्यथा वीज वितरण कार्यालयात उपोषणाचा इशारा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन ठोसर, शहराध्यक्ष नानासाहेब बाबर आदींनी या निवेदनाव्दारे दिला होता. मात्र निवेदन देवून १५ दिवस उलटले तरीही वीज वितरण कंपनीने गावात पथदिवे लावलेच नाही. त्यामुळे आज मनसेचे गजानन वेरूळकर, विनायक उंबरकर, ज्ञानेश्वर कांडेलकर, मनिष झनके, योगेश बाठे, नरेश ठाकरे, रविंद्र डमाळे, मंगेश सातव, निखील चिम, शे.समद कुरेशी, पंकज पाटील, किशोर राऊत, जुबेर खान, हसन कुरेशी, नासीर भाई, वासीम भाई, पंजाब पिवळतकर, अभिजीत गिरी यांनी आमरण उपोषणास सुरूवात केली होती. या उपोषणाची दखल घेत कार्यकारी अभियंता देशमुख यांनी आंदोलनस्थळी भेट देवून येत्या ५ दिवसात खांब उभारून पथदिवे लावण्यात येतील, असे लेखी आश्वासन दिल्याने उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले.