शहरं
Join us  
Trending Stories
1
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
2
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
3
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
4
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
5
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
6
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
7
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
8
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
9
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
10
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
11
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
12
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
13
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
14
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
15
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
16
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
17
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
18
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
19
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
20
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

खरिपाच्या तोंडावर शेतकर्‍यांचे खिसे रितेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 1:07 AM

जानेफळ : एकीकडे सूर्य आग ओकत असताना शेतकर्‍यांची मात्र तोंडावर आलेल्या खरीप हंगामासाठी लगबग सुरू झाली आहे. लग्न सराईचा धूमधडाका सध्या मुहूर्त नसल्यामुळे थांबलेला असल्याने शेतकरी शेतीच्या कामाकडे वळले आहेत. परंतु खिसे रिकामेच असल्याने कर्जासाठी शेतकर्‍यांची धडपड सुरू झाली आहे. मागील वर्षीची कर्जमाफी अद्यापपर्यंत अनेक शेतकर्‍यांना मिळालेली नाही. शेतकर्‍यांना तत्काळ कर्ज द्यावे, असे शासनाचे निर्देश असले, तरी बँकांना मात्र अद्यापपर्यंत आदेश मिळाले नसल्याचे बँक व्यवस्थापकाकडून सांगण्यात येत आहे. 

ठळक मुद्देकर्ज वाटपाचा अद्याप आदेश नाही पैसा नसल्याने बळीराजा अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कजानेफळ : एकीकडे सूर्य आग ओकत असताना शेतकर्‍यांची मात्र तोंडावर आलेल्या खरीप हंगामासाठी लगबग सुरू झाली आहे. लग्न सराईचा धूमधडाका सध्या मुहूर्त नसल्यामुळे थांबलेला असल्याने शेतकरी शेतीच्या कामाकडे वळले आहेत. परंतु खिसे रिकामेच असल्याने कर्जासाठी शेतकर्‍यांची धडपड सुरू झाली आहे. मागील वर्षीची कर्जमाफी अद्यापपर्यंत अनेक शेतकर्‍यांना मिळालेली नाही. शेतकर्‍यांना तत्काळ कर्ज द्यावे, असे शासनाचे निर्देश असले, तरी बँकांना मात्र अद्यापपर्यंत आदेश मिळाले नसल्याचे बँक व्यवस्थापकाकडून सांगण्यात येत आहे.  शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये पैसे नसल्याने त्यांची झोप उडाली आहे. गेल्या वर्षीचा हंगाम शेतकर्‍यांसाठी दुष्काळाचाच ठरला. मोठय़ा उत्साहाने पैशांची जुळवाजुळव करून शेतकरी तयार झाला. परंतु वरुणराजाने शेतकर्‍यांचे कंबरडेच मोडले होते. अत्यल्प पावसाने पिके सुकली, काही प्रमाणात झालेल्या पिकांवर बोंडअळी, किडींच्या प्रमाणामुळे उत्पादनात घट झाली आणि कसेबसे घरात आलेल्या शेतमालाला सुद्धा बाजार भाव न मिळाल्यामुळे कंबरडेच मोडले.कर्जमाफीची घोषणा हवेतच जिरल्यामुळे आता पुन्हा शेतकरी कर्जाच्या खाईत सापडला आहे. खरीप हंगाम जवळ आल्याने बी-बियाणे व रासायनिक खतांसाठी आता पैसा कोठून आणाव,ा अशा विचारात पडला आहे. मात्र, शासनाने जणु काही शेतकर्‍यांसोबत पोरखेळच चालविला आहे. एकीकडे शेतकर्‍यांना तत्काळ कर्ज देण्याचे निर्देश देण्यात आल्याचे प्रसिद्धी माध्यमांसमोर सांगितल्या जात आहे, तर दुसरीकडे बँक प्रशासन आम्हाला पीक कर्ज वाटपाविषयी अद्याप कुठलेच आदेश मिळाले नसल्याचे सांगतात. त्यामुळे शेतकर्‍यांना चकरा माराव्या लागत आहेत.यावर्षीच्या खरीप हंगामाची सुरुवात दरवाढीने होत आहे. रासायनिक खताच्या प्रतिबॅग १00 ते १२५ रुपयांची दरवाढ झालेली आहे. डीझलच्या दरवाढीचा सुद्धा फटका शेतकर्‍यांना बसत आहे. सध्याच्या यांत्रिकीकरणामुळे शेतीच्या नांगरणीपासून तर वखरणी, पेरणी, कीटकनाशके फवारणी आदी कामे ट्रॅक्टरद्वारेच केली जात आहेत. त्यामुळे डीझलचे भाव वाढल्याने ट्रॅक्टर मालकांनीसुद्धा भाववाढीचा निर्णय घेतला. शेतकर्‍यांना महागाईचा दुहेरी फटका बसत आहे.७ जूनपासून मृग नक्षत्रास सुरुवात होत आहे. यावर्षी लवकरच पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. परंतु शेतकर्‍यांच्या खिशाची कुठलीच सोय नसून, बँकेच्या कर्जाचीसुद्धा खात्री दिसत नाही. उधार उसणवारी करण्याससुद्धा कुणी तयार नसून, शेतीच्या नांगरणी, वखरणीसाठी ट्रॅक्टर मालकसुद्धा नगदी पैसे मागत असल्याने शेतकरी मोठय़ा अडचणीत सापडल्याचे चित्र दिसत आहे.  

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी