शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

फुलकोबी’ उत्पादनातून सावरतोय शेती व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 16:38 IST

खामगाव : खामगाव तालुक्यात काही शेतकरी ‘फुलकोबी’ उत्पादनातून शेतीव्यवसाय सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.

ठळक मुद्देएक वेगळी वाट धुंडाळत शेतकरी आता फुलकोबी पिकविण्याकडे वळत आहेत.अनेक गावांमध्ये कमी-अधिक प्रमाणात शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेतात.यामुळे तोट्याचा होत चाललेला शेती व्यवसाय सावरण्यास बळ मिळत आहे. 

- देवेंद्र ठाकरेखामगाव : कोरडवाहू  तर कोरडवाहूच... पण ज्यांच्याकडे सिंचनाची थोडीबहूत सोय आहे, अशा शेतकºयांनाही शेती  परवडेनासी झाली आहे.  आपल्याकडे बागायतदार शेतकरी ज्या पिकाकडे उत्पन्नाची हमी देणारे पिक म्हणून पाहतात, ती कपाशी सुध्दा गेल्या काही वर्षांपासून  दगा देत आहे. त्यामुळेच खामगाव तालुक्यात काही शेतकरी ‘फुलकोबी’ उत्पादनातून शेतीव्यवसाय सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.कोरडवाहू शेती गेल्या अनेक वर्षांपासून पिकेनाशी झाली आहे. दिवसेंदिवस साथ सोडत चाललेला निसर्ग अन् त्यातून अपुरा तसेच लहरी स्वरूपाचा पडणारा पाऊस यामुळे कोरडवाहू शेती म्हणजे तोट्याचा व्यवसाय झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकºयांनी थोडी का होईना सिंचनाची व्यवस्था करून घेतली आहे. सिंचनाची व्यवस्था झाली, तरी यामाध्यमातून पारंपारिक कपाशीचे पिक घेण्याकडेच शेतकºयांचा कल राहीला आहे. परंतु अलीकडे रोगराईने पिकाची होत चाललेली वाताहत पाहता, कपाशी सुध्दा शेतकºयांची निराश करत आहे. त्यातच गेल्या वर्षी बोंडअळी आली अन् कपाशीाबाबत शेतकरी अधिकच सावध झाले. यातूनच एक वेगळी वाट धुंडाळत शेतकरी आता फुलकोबी पिकविण्याकडे वळत आहेत. खामगाव तालुक्यात साधारणपणे अनेक गावांमध्ये कमी-अधिक प्रमाणात शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेतात.  परंतु भाजीपाल्याचे उत्पादन घेणाºया शेतकºयांना अलीकडे वांगे, टमाटे या पिकांसोबतच फुलकोबीची गोडी लागली आहे.  हे पिक शेतकºयांना बºयापैकी उत्पन्न मिळवून देणारे ठरत असून यामुळे तोट्याचा होत चाललेला शेती व्यवसाय सावरण्यास बळ मिळत आहे. 

एकरी लाखाचे उत्पन्न मिळवून देणारे पिकआपल्याकडे दोन ‘सिझन’ मध्ये फुलकोबीचे पिक घेतल्या जाते. पावसाळ्यात सुमारे ६० ते ६५ क्विंटल कोबीचे उत्पन्न एक एकर शेतीत होते. हिवाळ्यात हेच उत्पन्न १२५ ते १५० क्विंटलवर पोहचते. दोन्ही सिझन मिळून १ लाख ५० हजार  रूपयांचे उत्पन्न होते. यातून खर्च वजा जाता १ लाख रूपये निव्वळ नफा मिळतो, असे शेतकºयांचे म्हणने आहे.

‘कोबी’लाही सतावतो ‘खोडकीडा’इतर पिकांप्रमाणेच फुलकोबी पिकावरही रोगराई येतेच. त्यात पावसाळ्यात खोडकिडा जास्तच त्रासदायक ठरतो. यावर उपाय म्हणून बुरशी नाशक औषधाचा वापर शेतकरी करतात. परंतु उत्पन्नासाठी कोबी चांगला पर्याय असल्याचे अनेकांचे म्हणने आहे.

फुलकोबी शेतीतून चांगले उत्पन्न मिळते.  तशी याआधीही कोबीची लागवड होतीच,  मात्र सध्या इतर पिके दगा देत असल्याने कोबीचे क्षेत्र वाढविले आहे.गजानन चोपडे,शेतकरी घाटपुरी

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेतीFarmerशेतकरी