शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

रब्बीतील पिके वाचविण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 15:20 IST

रब्बी हंगामातील पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची सरासरीच्या ९० टक्के पेरणी झाली आहे. सध्या काही भागातील पिके सुस्थितीत असून अनेक ठिकाणी विविध रोगांनी हल्ला केला आहे. यामुळे शेतकरी महागड्या औषधांची फरवारणी करताना दिसत आहे. एकंदरीतच रब्बी हंगामातील पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे.यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. जमिनीमध्ये भरपूर ओलावा निर्माण झाल्याने रब्बी पिकांना पोषक वातावरण होते. तरीसुद्धा अनेक ठिकाणी शेतजमिनी ओली असल्याने रब्बी हंगामातील पिकांची उशीरा पेरणी झाली. उत्पादनात घट येण्याची भिती व्यक्त होत असल्याने अनेक शेतकºयांच्या मनात लागवडीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र थंडी मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्याने सुरूवातील कमी असलेला रब्बी हंगामातील पिकांची लागवड करणाºया शेतकºयांचा आकडा वाढला. परतीच्या पावसामुळे झालेले नुकसान आता रब्बी हंगामातील पिकांच्या माध्यमातून भरून काढता येईल, अशी शेतकºयांना आशा होती. काही ठिकाणी याचे फलीतही होताना दिसत आहे. मात्र अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे हरभरा, मका, रब्बी ज्वारी या पिकांवर विविध रोगांनी हल्ला आहे. हरभºयावर घाटेअळी तर मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे सदर पिके मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त होत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या किटकनाशकांची फवारणी करूनदेखील परिणाम होत नसल्याने शेतकºयांमध्ये धास्ती भरली आहे. जिल्ह्यातील काही भागात वादळी वाºयासह हलक्या स्वरूपात पाऊस पडत आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका गहू व हरभरा पिकाला बसत आहे. यामुळे शेतकºयांवरील आर्थिक संकटात वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.पिकांवरील रोंगाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करीत आहेत. यामुळे उत्पादन खर्चामध्ये प्रचंड वाढ होत आहे. मात्र या औषधांचा पाहिजे त्या प्रमाणात दिसून येत नाही. यामुळे पिकांवर प्रादुर्भाव झालेल्या रोगांचा बंदोबस्त करताना शेतकºयांची चांगलीच दमछाक होत आहे. परिणामी उत्पादना घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी