पॅकेजवर घेतला शेतक-यांनी आक्षेप
By Admin | Updated: January 14, 2015 23:50 IST2015-01-14T23:50:40+5:302015-01-14T23:50:40+5:30
पीकविम्याचेही पैसे थकले; बुलडाणा जिल्ह्यातील शेतक-यांनी केली सरसकट मदतीची मागणी.
_ns.jpg)
पॅकेजवर घेतला शेतक-यांनी आक्षेप
बुलडाणा: शेतकर्यांवर ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीचे संकट दूर करण्यासाठी शासनाने पॅकेज जाहीर केले आहे; मात्र शेतकर्यांना सरसकट मदत न देता हेक्टरची अट टाकल्याने शेतकर्यांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. राज्य शासनाने शेतकर्यांना दोन हेक्टरपर्यंंत सरसकट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी मोताळा तालुक्यातील शेतकर्यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे, निमखेडी, ब्राम्हंदा, पांगरखेड, चुनपिंप्री येथील शेतकर्यांनी जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांना निवेदन देऊन शासनाच्या या पॅकेजवर आक्षेप घेतला आहे. या शेतकर्यांनी म्हटले आहे की, शासनाने नैसर्गिक आपत्तीचे पॅकेज जाहीर करताना अल्प व अत्यल्पभूधारक शेतकर्यांसाठी दोन हेक्टरपर्यंत र्मयादा ठेवली आहे; मात्र ज्या शेतकर्यांकडे दोन हेक्टरपेक्षा एक आर जास्त जमीन असली तरी त्या शेतकर्यांच्या केवळ एक हेक्टर शेतजमिनीलाच आर्थिक मदत मिळणार आहे. हा शेतकर्यांवर अन्याय आहे.
शासनाने पॅकेज जाहीर करताना भेदभाव केल्याचा आरोप या शेतकर्यांनी केला आहे; तेव्हा दुष्काळग्रस्त शेतकरी केंद्रस्थानी मानून शासनाने सरसकट दोन हेक्टरपर्यंत आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी या शेतकर्यांनी केली आहे.