शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

चिखली-खामगाव महामार्गाच्या कडेला शेतकर्‍यांनी पुकारले बेमुदत उपोषण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:54 IST

चिखली : खामगाव ते चिखली या राष्ट्रीय माहामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून, यांतर्गत दोन्ही बाजूकडील शेतकर्‍यांच्या शेतजमिनी अधिग्रहणाची कोणतीही प्रक्रिया न राबविता परस्पर ताब्यात घेऊन त्यावर रस्त्याचे बांधकाम करण्यात येत आहे. तसेच या बदल्यात शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारे मोबदला मिळत नसल्याने या अन्यायाविरोधात तालुक्यातील दहिगाव येथील शेतकर्‍यांनी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून रोडच्या कडेला बेमुदत उपोषणास सरुवात केली आहे. 

ठळक मुद्देसंपादित जमिनीचा मोबदल्यासाठी दहिगाववासियांनी सुरू केले आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : खामगाव ते चिखली या राष्ट्रीय माहामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून, यांतर्गत दोन्ही बाजूकडील शेतकर्‍यांच्या शेतजमिनी अधिग्रहणाची कोणतीही प्रक्रिया न राबविता परस्पर ताब्यात घेऊन त्यावर रस्त्याचे बांधकाम करण्यात येत आहे. तसेच या बदल्यात शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारे मोबदला मिळत नसल्याने या अन्यायाविरोधात तालुक्यातील दहिगाव येथील शेतकर्‍यांनी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून रोडच्या कडेला बेमुदत उपोषणास सरुवात केली आहे. खामगाव ते चिखली या राष्ट्रीय महामार्गाचे काम काही महिन्यांपासून युद्धस्तरावर  सुरू आहे. या महामार्गाच्या रुंदीकरणांतर्गत २४ मीटर रस्ते तयार करण्यात येत असताना यामध्ये रस्त्याच्या कडेवरील शेतकर्‍यांच्या जमिनीचा ताबा कोणत्याही अधिग्रहणाशिवाय परस्पर घेतला जात आहे, तसेच नियोजित २४ मीटर रुंदीपेक्षा जास्त  रुंदीचे मोजमाप करून जमीन ताब्यात घेतली असल्याचा आरोप दहिगाव येथील शेतकर्‍यांनी केला असून, याबाबत १२ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी बुलडाणा यांना निवेदन देऊन याबाबत तातडीने न्याय न मिळाल्यास उपोषणास बसण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला होता. तसेच रस्ता रुंदीकरणांतर्गत होणार्‍या कामामुळे व वाहनांनासाठी तयार करण्यात आलेल्या वळण रस्त्यामुळे उडणारी धूळ आजूबाजूच्या शेतातील हरभरा, गहू, वाल, यासारख्या पिकाचे नुकसान करीत आहे. सदर झालेल्या नुकसानाची मोका पाहणी करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणीसुद्धा शेतकर्‍यांनी केली असून, या मागणीची दखल न घेतल्याने दहिगाव येथील बळीराम नारायण खरपास, भास्कर मोतीराम खरपास, दिलीप देवलाल बेदकर यांच्यासह संतोष रसाळ, दिलीप  खरपास, विजय होगे यांनी २६ जानेवारीपासून रस्त्याच्या कडेला आमरण उपोषण चालविले आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी संघटनेने या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला असून, प्रशासनाने शेतकर्‍यांच्या उपोषणाची दाखल न घेतल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा स्वाभिमानीचे नितीन राजपूत, जिल्हा उपाध्यक्ष अनिल वाकोडे, तालुकाध्यक्ष शेख मुखतर, अमोल तेलांगरे, भागवत म्हस्के रामेश्‍वर परिहार, दीपक  धनवे, राम अंभोरे यांनी दिला आहे, तर अन्यायकारकरीत्या शेतकर्‍यांच्या जमिनी बळकावून शासन शेतकर्‍यांची पिळवणूक करीत असेल, तर शेतकर्‍यांना न्याय मिळविण्यासाठी शेतकरी संघटना शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची भूमिका प.स. सदस्य उषा उद्धव थुट्टे यांनी जाहीर केली आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावchikhali roadचिखली रोडFarmerशेतकरीagitationआंदोलन