शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

शेतकऱ्यांनी बुलडाण्यात केली एचटीबीटी कापसाची लागवड ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कायदेभंग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 5:55 PM

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी एच.टी.बी.टी. कापसाच्या बियाण्याची लागवड केली.  

बुलडाणा:  कापासाच्या एचटीबीटी बियाण्यावर बंदी करणाऱ्या धोरणाचा निषेध करण्यासाठी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सविनय कायेभंग आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी एच.टी.बी.टी. कापसाच्या बियाण्याची लागवड केली.  ‘शेतकºयांना बाजारपेठेचे व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे, आमचं वावर आमची पावर, खुल्या अर्थव्यवस्थेला पर्याय नाही, भीक नको घेवू घामाचे दाम..’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी बियाण्याची पॉलीथीनच्या पिशव्यांमध्ये लागवड केली. शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारीणी सदस्य नामदेवराव जाधव यांनी एचटीबीटीच्या कापसाच्या वाणाचे फायदे सांगून शासानाचा धोरणाचा निषेध केला. यावेळी जि.प.माजी सदस्य एकनाथ पाटील थुट्टे म्हणाले केंद्र सरकारचा हा शेतकरी विरोधी बियाणे प्रतिबंधीत कायदा आम्ही धुडकावत लावुन भरोसा या गावातील शेतकºयांनी प्रतिबंधीत बियाण्याची लागवड करून कायदेभंग आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला. शेतकºयांनी या शेतकरी विरोधी कायद्याच्या बेड्या तोडण्यासाठी संघर्ष करण्यास तयार राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी वामनराव जाधव यांनीसुध्दा शेतकºयांना संबोधित केले. त्यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. या आंदोलनामध्ये प्रामुख्याने ज्ञानेश्वर जाधव, देविदास कणखर, समाधान कणखर, डॉ. विनायक वाघ, ज्ञानदेव साळवे, विश्वनाथ जाधव, शामराव जाधव, हरिदास खांडेभराड, गणेश ताठे, गणेश वाघ, बालाजी जाधव, डॉ. देविदास भगत, रतिराम शेळके, सुभाष चेके, पुंजाजी मुजमुले, प्रदूम्न  सोनटक्के, दत्तू पाटील टेकाळे, शेषराव पाटील शेळके, कलीमसेठ जमादार, सादीक देशमुख, आत्माराम पाटील कुटे, सुरेश पाटील धंदर, सुखदेव नरोटे, रामदास शेळके, राजु शेळके, दिनकर टेकाळे, मुरली महाराज येवले, प्रताप जाधव, विठ्ठलराव सोळंके, राजु शेटे, भानदास पाटील घुबे, आत्माराम गाढे, संतोष परिहार यांनी सहभाग नोंदविला आहे. (प्रतिनिधी)

 शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले-जाधवएचटीबीटीच्या कापसाच्या वाणाला केंद्र सरकाने बंदी आणली असून शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नामदेवराव जाधव यांनी केला. शेतकऱ्यांनी शेतात कोणते पीक व वाण पेरायचे याचे स्वातंत्र्य शेतकºयांना असले पाहिजे, असे सांगूण जाधव म्हणाले की, प्रगत देशामध्ये जनुकीय परीवर्तीत केलेल्या मका, कापूस, तांदूळ, सोयाबीन या पिकांना परवानगी आहे. मात्र भारत सरकारने यावर बंदी आणली आहे. या वाणाच्या लागवडीमुळे उत्पादन खर्च कमी होवून उत्पन्नात वाढ होणार आहे. जगाच्या स्पर्धेत जग टिकायचे असेल तर शेतकºयांना तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य आवश्यक आहे. एकीकडे उत्पन्न दुप्पट करण्याची भाषा वापरायची तर दुसरीकडे जीएम बियाण्यावर बंदी आणून शेतकरी विरोधी धोरण राबवायचे हे आता शेतकरी सहन करणार नाहीत, असे मत शेतकरी नेते नामदेवराव जाधव यांनी व्यक्त केले.  

टॅग्स :buldhanaबुलडाणाBuldhana Collector officeबुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयFarmerशेतकरी