शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतकऱ्यांनी बुलडाण्यात केली एचटीबीटी कापसाची लागवड ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कायदेभंग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 17:55 IST

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी एच.टी.बी.टी. कापसाच्या बियाण्याची लागवड केली.  

बुलडाणा:  कापासाच्या एचटीबीटी बियाण्यावर बंदी करणाऱ्या धोरणाचा निषेध करण्यासाठी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सविनय कायेभंग आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी एच.टी.बी.टी. कापसाच्या बियाण्याची लागवड केली.  ‘शेतकºयांना बाजारपेठेचे व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे, आमचं वावर आमची पावर, खुल्या अर्थव्यवस्थेला पर्याय नाही, भीक नको घेवू घामाचे दाम..’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी बियाण्याची पॉलीथीनच्या पिशव्यांमध्ये लागवड केली. शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारीणी सदस्य नामदेवराव जाधव यांनी एचटीबीटीच्या कापसाच्या वाणाचे फायदे सांगून शासानाचा धोरणाचा निषेध केला. यावेळी जि.प.माजी सदस्य एकनाथ पाटील थुट्टे म्हणाले केंद्र सरकारचा हा शेतकरी विरोधी बियाणे प्रतिबंधीत कायदा आम्ही धुडकावत लावुन भरोसा या गावातील शेतकºयांनी प्रतिबंधीत बियाण्याची लागवड करून कायदेभंग आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला. शेतकºयांनी या शेतकरी विरोधी कायद्याच्या बेड्या तोडण्यासाठी संघर्ष करण्यास तयार राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी वामनराव जाधव यांनीसुध्दा शेतकºयांना संबोधित केले. त्यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. या आंदोलनामध्ये प्रामुख्याने ज्ञानेश्वर जाधव, देविदास कणखर, समाधान कणखर, डॉ. विनायक वाघ, ज्ञानदेव साळवे, विश्वनाथ जाधव, शामराव जाधव, हरिदास खांडेभराड, गणेश ताठे, गणेश वाघ, बालाजी जाधव, डॉ. देविदास भगत, रतिराम शेळके, सुभाष चेके, पुंजाजी मुजमुले, प्रदूम्न  सोनटक्के, दत्तू पाटील टेकाळे, शेषराव पाटील शेळके, कलीमसेठ जमादार, सादीक देशमुख, आत्माराम पाटील कुटे, सुरेश पाटील धंदर, सुखदेव नरोटे, रामदास शेळके, राजु शेळके, दिनकर टेकाळे, मुरली महाराज येवले, प्रताप जाधव, विठ्ठलराव सोळंके, राजु शेटे, भानदास पाटील घुबे, आत्माराम गाढे, संतोष परिहार यांनी सहभाग नोंदविला आहे. (प्रतिनिधी)

 शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले-जाधवएचटीबीटीच्या कापसाच्या वाणाला केंद्र सरकाने बंदी आणली असून शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नामदेवराव जाधव यांनी केला. शेतकऱ्यांनी शेतात कोणते पीक व वाण पेरायचे याचे स्वातंत्र्य शेतकºयांना असले पाहिजे, असे सांगूण जाधव म्हणाले की, प्रगत देशामध्ये जनुकीय परीवर्तीत केलेल्या मका, कापूस, तांदूळ, सोयाबीन या पिकांना परवानगी आहे. मात्र भारत सरकारने यावर बंदी आणली आहे. या वाणाच्या लागवडीमुळे उत्पादन खर्च कमी होवून उत्पन्नात वाढ होणार आहे. जगाच्या स्पर्धेत जग टिकायचे असेल तर शेतकºयांना तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य आवश्यक आहे. एकीकडे उत्पन्न दुप्पट करण्याची भाषा वापरायची तर दुसरीकडे जीएम बियाण्यावर बंदी आणून शेतकरी विरोधी धोरण राबवायचे हे आता शेतकरी सहन करणार नाहीत, असे मत शेतकरी नेते नामदेवराव जाधव यांनी व्यक्त केले.  

टॅग्स :buldhanaबुलडाणाBuldhana Collector officeबुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयFarmerशेतकरी