शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

अतिवृष्टीच्या मदतीवरून शेतकरी संघटना आक्रमक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 18:24 IST

शेतकरी हताश: हेक्टरी आठ हजाराची मदत म्हणजे निव्वळ थट्टाच!

- देवेंद्र ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: यावर्षी आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले. या धर्तीवर राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांनी शनिवारी नुकसानग्रस्त शेतकºयांना हेक्टरी ८ हजार रूपये मदत जाहीर केली. यावरून खामगाव व परिसरात शेतकरी संघटना आक्रमक तर शेतकरी हताश झाल्याचे दिसून येते.एकीकडे आधीच गत तीन ते चार वर्षांपासून शेतकरी कोरड्या दुष्काळाला सामोरा जात असताना, यावर्षी ओल्या दुष्काळानंतरही शेतकºयांच्या तोंडाला केवळ पाने पुसण्याचा प्रकार झाल्याचा आरोप शेतकरी संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे. यावर्षी संपुर्ण खरीप हंगाम शेतकºयांच्या हातून गेला आहे. मोजके शेतकरी सोडले, तर मुगाचे पिकही शेतकºयांच्या हाती लागले नाही. त्यानंतर उडीद,  ज्वारी, सोयाबीन, मका ही पिके पावसामुळे अक्षरश: सडली. कपाशी जरी सध्या शेतात उभी दिसत असली, तरी पावसामुळे सुरूवातीच्या बहरातील बोंडे सडल्याने उत्पादनात कमालीची घट आली. त्यातच बाजारभाव नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी हैराण झाले. दरम्यान पावसामुळे झालेली परिस्थिती पाहता, शासनाने नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. पंचनामे पुर्ण झाले आणि शनिवारी राज्यपालांनी नुकसानग्रस्त शेतकºयांना हेक्टरी ८ हजार रूपये मदत जाहीर केली. या मदतीवरून शेतकरी संघटनांसह शेतकरीही चांगलेच आक्रमक झाले आहेत. पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकºयांना हेक्टरी ५० हजार रूपये मदत देण्यात यावी, या प्रमुख मागणीसह विविध मागण्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या तर कोणतेही पंचनामे न करता शेतकºयांना सरसकट हेक्टरी २५ हजार रूपये मदत तसेच शेतकºयांच्या पाल्यांची केवळ परीक्षा फी नव्हे तर शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी रघुनाथदादा प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. परंतु जाहीर करण्यात आलेली मदत अत्यल्प आहे. त्यामुळे शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप शेतकरी संघटनांच्या वतीने करण्यात आला आहे. शेतकºयांकडूनही खंत व्यक्त करण्यात येत आहे. 

 परीक्षा शुल्क नव्हे शैक्षणिक शुल्क माफ करा!शनिवारी राज्यपालांनी जाहीर केलेल्या मदतीनुसार नुकसानग्रस्त शेतकºयांच्या पाल्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे. परंतु केवळ परीक्षा शुल्क नको, तर शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली होती. परीक्षा शुल्काची रक्कम फार मोठी नसून शेतकरी ती भरू शकेलही, मात्र शैक्षणिक शुल्काची रक्कम प्रचंड असल्याने यात शेतकºयांना दिलासा मिळायला हवा होता, मात्र तसे झाले नाही. त्यामुळे जाहीर झालेल्या मदतीवरून आक्रोश पाहायला मिळत आहे.

 शेतकºयांना जाहीर झालेली हेक्टरी ८ हजार रूपयांची मदत म्हणजे निव्वळ थट्टाच आहे. स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या पदाकिाºयांच्या बैठका सुरू असून लवकरच मुंबई येथे मोठे आंदोलन करण्यात येईल. यासाठी जिल्ह्यातून सुमारे १० हजार शेतकरी सहभागी होतील.प्रशांत डिक्करजिल्हाध्यक्ष, स्वाभीमानी शेतकरी संघटना युवा आघाडी

 हेक्टरी ८ हजार रूपयात पेरणीचा खर्चही निघू शकत नाही. अशा अवस्थेत वर्षभर उदर्निर्वाह, जनावरांच्या चाºयाचा प्रश्न कसा सोडवायचा, याचा विचार मदत जाहीर करताना करण्यात आलेला नाही. त्यामुळे आंदोलन हाच एकमेव मार्ग आहे.रमेश बाणाईतजिल्हाध्यक्ष, रघुनाथदादा प्रणित शेतकरी संघटना 

 शेतकºयांचे दु:ख काय असते, हे राज्यपालांना काय कळणार? ज्यांच्याकडून अपेक्षा होती, त्या राजकारण्यांनीच शेतकºयांच्या संकटाच्या काळात सत्तेचा खेळ मांडला; त्यामुळे शेतकरी अलगद बाजूला फेकल्या गेला. हेही दिवस निघून जातील. येणारा काळच प्रत्येकाला ज्याची-त्याची जागा दाखवेल.संतोष कुकडे, शेतकरी सोनाळा

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरी