शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
2
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
3
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
4
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
5
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
6
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
7
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
8
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
9
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
10
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
11
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
13
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
14
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
15
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
16
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
18
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
20
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जळगावात निघाला आसूड मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2021 18:31 IST

Farmers March in Jalgaon Jamod : माळीखेल,बाजार ओळ, मानाजी चौक,चौभारा,दुर्गा चौक या मार्गाने हा आसूड मोर्चा उपविभागीय महसूल कार्यालयावर धडकला.

 जळगाव जामोद :         शेतकरी व सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी आ.डॉ.संजय कुटे यांचे नेतृत्वात मंगळवारी २६ ऑक्टोबर रोजी आसूड मोर्चा काढण्यात आला. स्थानिक राठी जिनिंगमधून या मोर्चाला सुरुवात झाली आणि माळीखेल,बाजार ओळ, मानाजी चौक,चौभारा,दुर्गा चौक या मार्गाने हा आसूड मोर्चा उपविभागीय महसूल कार्यालयावर धडकला.यावेळी बुलढाणा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा,शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजाराची मदत करण्यात यावी,सन २०१९-२० मधील पीक विम्याची तफावत दूर करण्यात यावी,सन २०२१-२२ च्या हंगामातील पीक नुकसानीचा सरसकट पिक विमा देण्यात यावा,शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ करावे,कृषी पंपांना २४ तास वीज पुरवठा करण्यात यावा, कोरोना काळातील थकीत वीज बिल माफ करण्यात यावे व निराधार नागरिकांच्या खात्यात दिवाळीपूर्वी रक्कम जमा करण्यात यावी अशा घोषणांनी जळगाव शहर दुमदुमून गेले होते.        शेतकऱ्यांनी विविध मागण्यांचे फलक मोर्चात फडकविले होते.आ.डॉ.संजय कुटे हे आपल्या सहकाऱ्यांसह सहभागी झाले होते. उपविभागीय महसूल कार्यालयाजवळ मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. सभेनंतर एसडीओ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जळगाव नगराध्यक्ष सीमा डोबे,शेगाव नगराध्यक्ष शकुंतला बूच,जि प सदस्य राजेंद्र उमाळे, रूपाली काळपांडे,बंडू अवचार,मंजुषा तिवारी, प्रमोद खोद्र,ज्ञानदेव भारसाकळे,सभापती रामेश्वर राऊत व रत्नप्रभा धर्माळ,जिल्हा सरचिटणीस नंदकिशोर अग्रवाल,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख,राजेंद्र ठाकरे,लोकेश राठी,तालुकाध्यक्ष प्रकाश वाघ,जानराव देशमुख,ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ.रवींद्र ढोकणे,पांडुरंग हागे,जिल्हा उपाध्यक्ष गुणवंतराव कपले,भारत वाघ,पांडुरंग बूच, उपसभापती महादेव धुर्डे,अभिमन्यू भगत,ज्ञानेश्वर साखरे,शरद अग्रवाल,चंदा पुंडे,राजेंद्र गांधी, डॉ.प्रकाश बगाडे,गुणवंत खोडके,परीक्षित ठाकरे, विजय लांजुळकर,डॉ.अमोल कुकडे,लता तायडे, डॉ.अपर्णाताई कुटे,शोएब खान आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती.

...तर काळी दिवाळी साजरी करणार - आमदार संजय कुटे

गेल्या दोन वर्षापासून विदर्भातील शेतकरी हा दुष्काळाचा सामना करीत असताना राज्य सरकार मात्र याकडे पूर्ण दुर्लक्ष करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत आहे.कर्जमाफीच्या व आर्थिक मदतीच्या केवळ पोकळ घोषणा करण्याचा सपाटा राज्य सरकारने लावला असून शेतकऱ्यांना मात्र प्रत्यक्ष कोणतीही मदत मिळाली नाही.परिणामी जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव तालुक्यातील शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे.दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना आर्थिक मदत न मिळाल्यास आघाडी सरकारच्या विरोधात काळी दिवाळी साजरी करण्यात येईल असा इशारा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार डॉ.संजय कुटे यांनी दिला.

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोदDr. Sanjay Kuteसंजय कुटेFarmerशेतकरी