समृद्धी महामार्गाच्या विरोधासाठी शेतकर्‍यांनी केला रक्ताभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:26 IST2017-08-23T00:23:12+5:302017-08-23T00:26:08+5:30

Farmers made bloody rhetoric against the Samrudhiyi highway | समृद्धी महामार्गाच्या विरोधासाठी शेतकर्‍यांनी केला रक्ताभिषेक

समृद्धी महामार्गाच्या विरोधासाठी शेतकर्‍यांनी केला रक्ताभिषेक

ठळक मुद्देमेहकर तालुक्यामधील ग्राम बेलगाव येथील बाधित शेतकर्‍यांनी केला रक्ताभिषेक मुख्यमंत्री फडणवीस व पंतप्रधान मोदी यांच्या फोटोवर रक्त सांडलेअग्निकुंडात रक्त टाकून रक्ताभिषेक

लोकमत न्यूज नेटवर्क
डोणगाव : समृद्धी महामार्गाला शेतकरी वर्गातून विरोध होताना  दिसत आहे. मेहकर तालुक्यामधील ग्राम बेलगाव येथील बाधित  शेतकर्‍यांनी समृद्धी महामार्गाला विरोध दर्शविण्यासाठी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवर रक्त सांडले  व अग्निकुंडात रक्त टाकून रक्ताभिषेक केला.  
समृद्धी महामार्ग बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातून जाणार  असून, यामध्ये बेलगाव येथील ३0 शेतकर्‍यांची १00 एकराच्या  जवळपास जमीन द्यावी लागणार आहे; परंतु शेती समृद्धी महामार्गा त जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेत समृद्धीच्या विरोधासाठी  कोणत्याही स्तरापर्यंत पोहोचण्याची तयारी असल्याचे शासनाला  दर्शविण्यासाठी बेलगाव येथील शेतकर्‍यांनी मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवर रक्त सांडले  तसेच अग्निकुंडात रक्त टाकून निषेध व्यक्त केला. त्याच  अग्निकुंडावर शपथ घेतली, की प्राण आहे, तोपर्यंत काळ्या  आईला समृद्धी महामार्गात जाऊ देणार नाही. यासाठी रक्त सांडायचे  काम पडो की, प्राण त्यागायचे, यासाठी आम्ही लढणारच, अशी  शपथ घेण्यात आली. 
ज्या नियमाने शासन शेती शासन हस्तगत करीत आहे, तो कायदा  इंग्रजकालीन आहे. इंग्रजांप्रमाणेच अन्याय अत्याचार करीत शासन  आमची जमीन हिसकावून घेत आहे, हे आम्ही सहन करणार  नसल्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला. 
यासाठी चेतावणी म्हणून मुख्यमंत्री व पंतप्रधानांच्या फोटोवर स्व त:चे रक्त सांडून शपथ घेतली. या रक्ताभिषेकाच्यावेळी रितेश  वानखेडे, परसराम वानखेडे, अविनाश बाजड, गजानन वानखेडे,  गोपाल वानखेडे, दत्तात्रय वानखेडे, किरण बाजड, संतोष  वानखेडे, ज्ञानेश्‍वर वानखेडे, सचिन बाजड, रवी बाजड, नारायण  वानखेडेसह असंख्य शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Farmers made bloody rhetoric against the Samrudhiyi highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.