शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

पाणी देण्यासाठी शेतकरी करतात रात्रीचा दिवस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 23:29 IST

बुलडाणा: सध्या रब्बी हंगामाची पेरणी सुरू आहे. त्यासाठी  जमिनी ओलीत करण्याची कामे सुरू असताना शेतातील विद्युत  पुरवठा दिवसभर खंडित ठेवण्यात येत आहे. त्यामुळे शे तकर्‍यांना रात्रीच्या वेळी शेतीला पाणी द्यावे लागत आहे.

ठळक मुद्दे रब्बीवर महावितरणची वक्रदृष्टी शेतातील विद्युत पुरवठा दिवसभर राहतो खंडित 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: सध्या रब्बी हंगामाची पेरणी सुरू आहे. त्यासाठी  जमिनी ओलीत करण्याची कामे सुरू असताना शेतातील विद्युत  पुरवठा दिवसभर खंडित ठेवण्यात येत आहे. त्यामुळे शे तकर्‍यांना रात्रीच्या वेळी शेतीला पाणी द्यावे लागत आहे. रब्बी  हंगामावर महावितरणची वक्रदृष्टी असल्याने रब्बी हंगामाच्या  सुरुवातीलाच शेतकर्‍यांना रात्रीचा दिवस करावा लागत आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्‍यांना दरवर्षी रब्बी हंगामात  फटका बसतो; मात्र यावर्षी महावितरणच्या अजब कारभाराने  शेतकरी त्रस्त झाले आहेत. मृग नक्षत्रात सुरुवातील झालेल्या  पावसावर मूग, उडीद, सोयाबीन ही खरीप हंगामातील पिके  कशीबशी आली. त्यानंतर परतीच्या पावसाने जलपातळीत वाढ  झाली असून, अनेक नदी, नाले, तलावातील पाणी साठा  वाढला. या पाणी साठय़ाच्या भरवश्यावर शेतकर्‍यांनी रब्बी  हंगामाची तयारी केली आहे. सध्या जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या  गहू, हरबरा  पेरणीला सुरुवात झाली आहे; मात्र खरिपाचा कस  रब्बी हंगामात भरून काढण्याच्या तयारीत असलेल्या शे तकर्‍यांना वीज वितरणशी संघर्ष करावा लागत आहे. परतीच्या  पावसाने यावर्षी पाणीसाठय़ात वाढ झालेली असल्याने रब्बी  हंगामाला पूरक इतका पाणीसाठी बहुतांश तालुक्यात उपलब्ध  आहे; परंतु मुबलक पाणीसाठा असूनही विद्युत पुरवठय़ाअभावी  ते रब्बी पिकाला पुरवले जाऊ शकत नाही. रब्बी हंगामातील गहू  पेरणीच्या सुरुवातीला अनेक शेतकरी शेतजमीनीला विद्युत पं पाच्या सहाय्याने पाणी देतात. तसेच तूर पीकही चांगले बहरलेले  आहे. रब्बी हंगामातील या सर्व पिकांना पाण्याची आवश्यकता  आहे; परंतु ऐनवेळी वीज कंपनीने विद्युत पुरवठा खंडित  केल्यामुळे तसेच १६ ते १७ तासाचे  शेतात भारनियमन  केल्यामुळे रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकर्‍यांसमोर संकट  उभे ठाकले आहे. काही शेतकर्‍यांनी विद्युत बिल भरले  नसल्याने विद्युत कनेक्शन कापण्यात आले आहे; मात्र ज्या शे तकर्‍यांनी विद्युत बिल भरलेले असते त्यांच्याही शेतातील विद्युत  कनेक्शन बंद आहे. १0 ते १५ शेतकर्‍यांचे विद्युत कनेक्शन हे  एका विद्युत रोहित्रावर असल्याने विद्युत बिल न भरलेल्या शे तकर्‍यांचे विद्युत कनेक्शन कापताना विद्युत रोहित्रावर  असलेल्या सर्वच शेतकर्‍यांना त्याचा फटका बसत आहे. रब्बी  पिकाला पाणी देण्यासाठी शेतकर्‍यांसमोर भारनियमनाचा खोडा  निर्माण होत आहे.  

पाणी साठा असूनही रब्बी हंगाम धोक्यातजिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे  शेतकर्‍यांना रब्बीची  आस आहे. यासाठी अनुकूल वातावरण असून, जिल्ह्यातील  छोट्या-मोठय़ा लघू प्रकल्पामधील पाणी साठासुद्धा वाढलेला  आहे; परंतु विद्युत वितरण कंपनीकडून शेतीसाठी वेळेवर विद्युत  पुरवठा पुरवल्या जात नसल्याने  रब्बी हंगामाचे चित्र धोक्यात  दिसून आहे. महावितरणच्या या अनागोंदी कारभारामुळे मुबलक  पाणी साठा असतानाही शेतकर्‍यांना त्याचा वापर करता येत नाही.

टॅग्स :Farmerशेतकरी