शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

शेतमालाला भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 6:04 PM

मालाची प्रतवारी पार घसरल्याने अत्यल्प भाव मिळत आहे.

- देवेंद्र ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: यावर्षी सुरूवातीपासूच दमदार पाऊस पडल्याने गतवर्षीच्या तुलनेत सोयाबीनचे उत्पादन वाढले; परंतु मालाची प्रतवारी पार घसरल्याने अत्यल्प भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकºयांच्या पदरी निराशाच आली आहे.

गत चार वर्षांपासून शेतकºयांनी कोरडा दुष्काळ अनुभवला. पाऊसच नसल्याने शेतीत उत्पादन झाले नाही. यावर्षी सुरूवातीपासूनच पाऊस चांगला पिकांची वाढ चांगली झाली. खासकरून सोयाबीन उत्पादक शेतकºयांना मोठी आशा होती. परंतु गत महिन्यात झालेल्या अति पावसामुळे सर्व पिकांचे नुकसान झाले. अनेक शेतकºयांच्या शेतात सोयाबीनला कोंब फुटले.  परंतु ज्या शेतकºयांच्या शेतात सोयाबीन उभे होते, त्यांच्या पिकाची काढणी सध्या सुरू आहे. गत १५ दिवसांपासून पावसाने उघाड दिल्याने सध्या सोयाबीनची काढणी सुरू आहे. यावर्षी अनेक शेतकºयांना एकरी ५ ते ७ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन होत असल्याचे सध्या करण्यात येत असलेल्या सोयाबीनच्या काढणीवरून दिसून येते. परंतु सोयाबीनची प्रतवारी प्रचंड घसरलेली दिसून येत आहे. बाजारात मोजके सोयाबीन सोडले, तरी बहुतांश शेतकºयांच्या सोयाबीनला हजार ते १५०० रूपये प्रतिक्विंटलचे भाव मिळत आहेत. शिवाय सोयाबीन ओलसर असल्याने ते वाळायला टाकण्याचे आव्हानही शेतकºयांसमोर आहेच. गतवर्षी सोयाबनीची झडती एकरी दोन क्विंटलच्या वर नव्हती. बहुतांश शेतकºयांनी सोयाबीनची काढणीही न करता शेतात थेट रोटावेटर मारले होते. त्यामुळे गतवर्षीच्या मानाने यावर्षी सोयाबीनची झडती बºयापैकी आहे, मात्र भाव अत्यल्प मिळत असल्याने उत्पादन असून-नसून काहीही फायदा होत नसल्याचे दिसून येते. एकीकडे सोयाबीन ४ हजार रूपये प्रतिक्विंटलचे भाव अपेक्षित असताना, मालाची प्रतवारी खराब असल्याने केवळ २५ टक्के किंमतीतच सोयाबीनची विक्री होत आहे. त्यामुळे यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकºयांचे सरासरी ७५ टक्के नुकसान झाल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शेतातील उभ्या पिकाचा विचार न करता त्यातून शेतकºयांचे होणारे प्रचंड नुकसान लक्षात घेता, यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकºयांना विम्याचा लाभ मिळण्याची नितांत गरज आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरी