जलपुर्ती सिंचन समितीकडून शेतक-यांची फसवणूक

By Admin | Updated: April 15, 2017 13:26 IST2017-04-15T13:26:48+5:302017-04-15T13:26:48+5:30

आवश्यक जमिनीचा सातबारा जोडूनही जलपुर्ती सिंचन विहीरसमितीने क्षेत्र कमी असल्याचे कारण दाखवून अपात्र केले.

Farmers' Fraud from Water Supply Irrigation Committee | जलपुर्ती सिंचन समितीकडून शेतक-यांची फसवणूक

जलपुर्ती सिंचन समितीकडून शेतक-यांची फसवणूक

सिंदखेडराजा : तालूक्यात विदर्भातील ११ जिल्ह्यात जिल्हानिहाय आलेल्या
जलपुर्ती धडक सिंचन विहीरीसाठी १४ आॅगस्ट २००७  रोजी केलेल्या विहीरीच्या
 अर्जासाठी  आवश्यक जमिनीचा सातबारा जोडूनही जलपुर्ती सिंचन विहीर
समितीने क्षेत्र कमी असल्याचे कारण दाखवून अपात्र केले. मात्र याबाबत सदर
शेतकरी २०१० पासुन विहीर मिळावी, यासाठी प्रयत्न करीत असताना सुद्धा
अधीकाऱ्यांनी शेतकऱ्यांना न्याय दिला नाही.
तालुक्यातील चिंचोली जहाँगिर  येथील विठोबा बापु पवार या अल्पभुधारक
शेतकऱ्याने जलपुर्ती सिंचन विहीर मिळावी, यासाठी १४ आॅगस्ट २००७ रोजी
तहसिल कार्यालयात अर्ज दाखल केला. त्यावेळी अर्जासोबत १ हे ३४ आर. चा
सातबारा  व त्यामधे १२५ गट नं. मध्ये ६७ आर. चा सातबारा जोडला. त्यानंतर
२०१० साली तालुक्यातील विहीरी मंजुर झालेल्याची यादी पंचायत समितीमध्ये
प्रसीद्ध झाली. सदर यादीमध्ये सदर शेतकऱ्यांच्या १२५ गट मध्ये  ६७ आर.
जमिन असताना ३३ आर. क्षेत्र दाखवून अपात्र केल्याचे कळाले. यामुळे  सदर
शेतकऱ्याने आवश्यक जमिन असताना जाणीवपूर्वक अपात्र केल्याने  ४ मे २०१०
रोजी समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार सिंदखेड राजा यांना अर्ज देवून
जमिनीचे सातबारा सुद्धा जोडला व त्याच्या प्रती तत्कालीन आ.डॉ.राजेद्र
शिंगणे, जिल्हाधीकारी बुलडाणा, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
गटविकास अधीकारी यांच्याकडे पात्र असताना अपात्र केलेल्या प्रकरणी न्याय
देण्याची मागणी केली. तद्नंतर दुसरा अर्ज ७ जून २०१० रोजी खा.प्रतापराव
जाधव यांच्यासह संबंधित अधिकारी यांना दिला. तिसरा अर्ज ३० नोव्हेंबर
२०१५ रोजी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला. तरीसुद्धा जलपुर्ती सिंचन
विहीर समितीने दखल घेतली नाही. फक्त गटसमन्वयक तथा तहसिलदार यांनी
गटविकास अधिकारी यांना २ डिसेंबर  २०१५   ला पत्र पाठवून योग्य ती चौकशी
करून अर्जदारास परस्पर कळविण्यात यावे, असे म्हटले होते. तरी सुद्धा
काहीच कार्यवाही करण्यात आली नाही. तरी न्याय मिळेल म्हणून शेवटच्या
टप्प्यावर येवुन  १३ एप्रिल २०१७ रोजी परत पात्र असताना अपात्र करून
अन्याय केल्यामुळे सदर शेतकऱ्याने आपणास विहीर देऊन न्याय देण्याची मागणी
तहसिलदार सिंदखेड  राजा यांच्याकडे केली आहे.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Farmers' Fraud from Water Supply Irrigation Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.