शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

शेतकरी कुटूंबाची भूतदया;  माकडांच्या कळपास दररोज पाजतात पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 16:34 IST

सोयंदेव येथील शेतकरी कुटुंब तहानेने व्याकूळ झालेल्या ६० ते ७० माकडांना दररोज पाणी पाजण्याचे काम करीत आहे.

ठळक मुद्दे बाळाभाऊ खरात यांचे शेत गावाजवळच आहेतेथील पाण्याचा साठा पाहून माकडांनी बाळाभाऊ यांचे शेताकडे मोर्चा वळविला. तहानेने व्याकूळ झालेल्या माकडांना हाकलून देऊनही ती तेथून जाईनात.

- अशोक इंगळे लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : दुष्काळी परिस्थितीत पाणीटंचाईची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. पाण्यासाठी माणसांची वणवण भटकंती होत असून जनावरांचे हाल होत आहे. सोयंदेव येथील शेतकरी कुटुंब तहानेने व्याकूळ झालेल्या ६० ते ७० माकडांना दररोज पाणी पाजण्याचे काम करीत आहे. शेतकरी कुटूंबाची भूतदया माणूसकिचा परिचय देणारी आहे.सोयंदेव येथील शेतकरी बाळाभाऊ खरात, पत्नी मंदोधरी बाळाभाऊ खरात, मुुुलगा किरण खरात, सूूून गीता किरण खरात व भाऊ रावसाहेब खरात हे गावाशेजारी असलेल्या शेतात राहतात. शेतात विहीर, हौद असल्याने झाडे हिरवीगार आहेत. उन्हाचा पारा चढत असल्याने अंगाची लाहीलाही होते. त्यामुळे थंड विसाव्यावर माणसेच काय जंगली प्राणीही येऊ लागले. जंगलातील माकडांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरु होती. तहानेने व्याकूळ माकडांची तगमग वाढली. बाळाभाऊ खरात यांचे शेत गावाजवळच आहे. त्यांच्या शेतावर पुरेसे पाणी आहे. आपल्या घरी लागणारे धुणीभांड्यासह लागणारे पाणी व जनावरांना लागणारे पाणी वापरुन त्यांचेकडे पाणी उरते. शिवारात कोठेच पाणी नाही. तेथील पाण्याचा साठा पाहून माकडांनी बाळाभाऊ यांचे शेताकडे मोर्चा वळविला. सुरुवातीला त्यांनी माकडांना हाकलून देण्याचा प्रयत्न केला .मात्र तहानेने व्याकूळ झालेल्या माकडांना हाकलून देऊनही ती तेथून जाईनात. अत्यंत व्याकूळ चेहऱ्यांनी विनवणी करीत असल्याची जाणीव त्यांना झाली. मंदोदरी खरात यांच्यातील भूतदया जागृत झाली.स्वत: पुढे होऊन त्यांनी माकडांना पाणी पिण्यासाठी भांडी भरुन ठेवली. सर्व माकडे भितभित लगबगीने पाणी पिऊन तृप्त होऊन निघून गेले. दुसरे दिवशीही माकडांची टोळी पाणी पिण्यासाठी तेथे पुन्हा येऊन थडकली. दुसरे दिवशीही त्या माऊलीने त्या माकडांना सह्रदयतेने पाणी पाजून तृप्त केले.गेली दोन महिन्यांपासून मंदोदरी बाळाभाऊ खरात, सून गीता किरण खरात, किरण बाळाभाऊ खरात, रावसाहेब रामराम खरात हे संपूर्ण कुटुंबीय दररोज माकडांना पाणी पाजतात. पाण्यावाचून तडफडणाºया माकडांना पाणी पाजण्याचे पूण्यकर्म करतात. हीच ईश्वरसेवा आहे असे त्यांना वाटत असून मनाला समाधान लाभते. पाणी पाजणे हे पुण्याचे काम असल्याचे कुटूंबीय सांगतात.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSindkhed Rajaसिंदखेड राजाwildlifeवन्यजीवwater scarcityपाणी टंचाई