शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

शेतकरी कुटूंबाची भूतदया;  माकडांच्या कळपास दररोज पाजतात पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 16:34 IST

सोयंदेव येथील शेतकरी कुटुंब तहानेने व्याकूळ झालेल्या ६० ते ७० माकडांना दररोज पाणी पाजण्याचे काम करीत आहे.

ठळक मुद्दे बाळाभाऊ खरात यांचे शेत गावाजवळच आहेतेथील पाण्याचा साठा पाहून माकडांनी बाळाभाऊ यांचे शेताकडे मोर्चा वळविला. तहानेने व्याकूळ झालेल्या माकडांना हाकलून देऊनही ती तेथून जाईनात.

- अशोक इंगळे लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : दुष्काळी परिस्थितीत पाणीटंचाईची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. पाण्यासाठी माणसांची वणवण भटकंती होत असून जनावरांचे हाल होत आहे. सोयंदेव येथील शेतकरी कुटुंब तहानेने व्याकूळ झालेल्या ६० ते ७० माकडांना दररोज पाणी पाजण्याचे काम करीत आहे. शेतकरी कुटूंबाची भूतदया माणूसकिचा परिचय देणारी आहे.सोयंदेव येथील शेतकरी बाळाभाऊ खरात, पत्नी मंदोधरी बाळाभाऊ खरात, मुुुलगा किरण खरात, सूूून गीता किरण खरात व भाऊ रावसाहेब खरात हे गावाशेजारी असलेल्या शेतात राहतात. शेतात विहीर, हौद असल्याने झाडे हिरवीगार आहेत. उन्हाचा पारा चढत असल्याने अंगाची लाहीलाही होते. त्यामुळे थंड विसाव्यावर माणसेच काय जंगली प्राणीही येऊ लागले. जंगलातील माकडांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरु होती. तहानेने व्याकूळ माकडांची तगमग वाढली. बाळाभाऊ खरात यांचे शेत गावाजवळच आहे. त्यांच्या शेतावर पुरेसे पाणी आहे. आपल्या घरी लागणारे धुणीभांड्यासह लागणारे पाणी व जनावरांना लागणारे पाणी वापरुन त्यांचेकडे पाणी उरते. शिवारात कोठेच पाणी नाही. तेथील पाण्याचा साठा पाहून माकडांनी बाळाभाऊ यांचे शेताकडे मोर्चा वळविला. सुरुवातीला त्यांनी माकडांना हाकलून देण्याचा प्रयत्न केला .मात्र तहानेने व्याकूळ झालेल्या माकडांना हाकलून देऊनही ती तेथून जाईनात. अत्यंत व्याकूळ चेहऱ्यांनी विनवणी करीत असल्याची जाणीव त्यांना झाली. मंदोदरी खरात यांच्यातील भूतदया जागृत झाली.स्वत: पुढे होऊन त्यांनी माकडांना पाणी पिण्यासाठी भांडी भरुन ठेवली. सर्व माकडे भितभित लगबगीने पाणी पिऊन तृप्त होऊन निघून गेले. दुसरे दिवशीही माकडांची टोळी पाणी पिण्यासाठी तेथे पुन्हा येऊन थडकली. दुसरे दिवशीही त्या माऊलीने त्या माकडांना सह्रदयतेने पाणी पाजून तृप्त केले.गेली दोन महिन्यांपासून मंदोदरी बाळाभाऊ खरात, सून गीता किरण खरात, किरण बाळाभाऊ खरात, रावसाहेब रामराम खरात हे संपूर्ण कुटुंबीय दररोज माकडांना पाणी पाजतात. पाण्यावाचून तडफडणाºया माकडांना पाणी पाजण्याचे पूण्यकर्म करतात. हीच ईश्वरसेवा आहे असे त्यांना वाटत असून मनाला समाधान लाभते. पाणी पाजणे हे पुण्याचे काम असल्याचे कुटूंबीय सांगतात.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSindkhed Rajaसिंदखेड राजाwildlifeवन्यजीवwater scarcityपाणी टंचाई