शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

शेतकर्‍यांनो आत्महत्या करू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 12:15 AM

मेहकर: दरवर्षी दुष्काळाचे सावट, पावसाचे प्रमाण कमी-अधिक  होणे, पिकांच्या उत्पादनात घट होणे, पिकांना भाव नसणे आदी  संकटांमुळे शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत. दरवर्षी पिकांचे  उत्पादन कमी होत असल्याने शेतकर्‍यांवर कर्जाचा डोंगर वाढत  आहे. त्यामुळे शेतकरी बांधव हतबल होऊन आत्महत्या करतात;  मात्र आलेल्या संकटाला हिमतीने सामोरे जाऊन, संकटातून मार्ग  काढण्याचा प्रयत्न करावा, जीवनात अनेक  संकटे येत असतात;  मात्र आत्महत्या करणे हा अंतिम पर्याय नाही. त्यामुळे शेतकरी  बांधवांनो आत्महत्या करू नका, असे आवाहन  बाबुराव महाराज  नागोलकर यांनी केले.

ठळक मुद्देनागोलकर यांचे आवाहन प्रवचनातून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेशशेतकर्‍यांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: दरवर्षी दुष्काळाचे सावट, पावसाचे प्रमाण कमी-अधिक  होणे, पिकांच्या उत्पादनात घट होणे, पिकांना भाव नसणे आदी  संकटांमुळे शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत. दरवर्षी पिकांचे  उत्पादन कमी होत असल्याने शेतकर्‍यांवर कर्जाचा डोंगर वाढत  आहे. त्यामुळे शेतकरी बांधव हतबल होऊन आत्महत्या करतात;  मात्र आलेल्या संकटाला हिमतीने सामोरे जाऊन, संकटातून मार्ग  काढण्याचा प्रयत्न करावा, जीवनात अनेक  संकटे येत असतात;  मात्र आत्महत्या करणे हा अंतिम पर्याय नाही. त्यामुळे शेतकरी  बांधवांनो आत्महत्या करू नका, असे आवाहन  बाबुराव महाराज  नागोलकर यांनी केले.यावेळी त्यांनी अभंग प्रवचनातून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा  संदेशदेखील देऊन शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात आले.  श्रावणमासानिमित्त मेहकर तालुक्यातील अंजनी बु. येथे दररोज  रात्री विठ्ठल-रुखमाई मंदिरात  बाबुराव महाराज नागोलकर,  भगवान महाराज लिखी, बळीराम महाराज अल्हाट यांचे प्रवचन  सुरू आहे. या प्रवचनातून हा संदेश व मार्गदर्शन करण्यात येत  आहे. प्रवचनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती,  कमी खर्चात शेती कशी करावी, कोणती बाजारपेठ पीक  विक्रीसाठी योग्य राहील, फळबागेविषयी माहिती, तसेच धार्मिक  प्रवचनही करण्यात येते. या कार्यक्रमाचा दररोज शेकडो भाविक,  शेतकरी महिला, लाभ घेतात. यावेळी सेवानवृत्त तालुका कृषी  अधिकारी मधुकर काळे हे सेवानवृत्त झाले असतानासुद्धा शे तकर्‍यांना वेळोवेळी मार्गदर्शन करीत आहेत. शेतकर्‍यांना येणार्‍या  अडीअडचणी मधुकर काळे प्रत्यक्ष गावात जाऊन शेतकर्‍यांशी  संवाद साधून सोडविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मधुकर काळे  यांचे कार्य पाहता त्यांचा गावकर्‍यांच्यावतीने सत्कार करण्यात  आला. या कार्यक्रमाला रमेश सावजी, वैराळ, धांडे, सिरसाट, शिवाजी  अल्हाट, पांडुरंग काळे, सुरेश अल्हाट, नवजीवन कनिष्ठ  महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. भरत अल्हाट, शिवाजी अल्हाट,  नारायण नागोलकर, डॉ. वसंता नागोलकर, अर्जुन पिंपळे, डॉ.  वनस्कर, डॉ. पांडुरंग अल्हाट, प्रकाश खोडवे, नामदेव राऊत,  मदन नागोलकर,  मनोहर टोनपे, मोतीराम अल्हाट, दत्ता  नागोलकर, संजय जाधव, सुखदेव अल्हाट, यादव अल्हाट,  भागवत राऊत, रामभाऊ कांबळे, अरविंद जोशी उपस्थित होते.  कार्यक्रमाचे संचालन बाबुराव महाराज नागोलकर यांनी केले. तर  आभारप्रदर्शन विलास पायघन, किरण पारीस्कर यांनी केले.  कार्यक्रमाला महिला, पुरुष, भाविक व गावकरी मोठय़ा संख्येने उ पस्थित होते.