शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

राज्य सरकारचा पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्याची पाण्यासाठी आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 09:21 IST

म्हणाले... शून्य झालो, शून्य सोडून जातोय !

अंढेरा (जि. बुलढाणा) : शून्य झालो आणि शून्य सोडून जात आहे, या शब्दांत हतबलता व्यक्त करीत, राज्य शासनाने युवा शेतकरी पुरस्कार देऊन गौरविलेल्या तरुण शेतकऱ्याने ऐन होळीच्या दिवशी गुरुवारी विष प्राशन करून आत्महत्या केली. शेतीसाठी पाणी मिळविण्याकरिता सातत्याने लढा देत असलेल्या कैलास नागरे (वय ४४) यांनी परिस्थितीपुढे हात टेकत मृत्यूला जवळ केले. त्यांच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी सरकारच्या कृषी क्षेत्रासंदर्भातील अनास्थेची चिरफाड केली आहे.

शिवणी अरमाळ (ता. देऊळगाव राजा) येथील कैलास नागरे हे खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाणी हमीसाठी लढा देत होते. खडकपूर्णाचे पाणी शिवणी अरमाळ धरणात आणत बारमाही सिंचनाची व्यवस्था व्हावी, या मागणीसाठी त्यांनी डिसेंबरमध्ये सात दिवसांचे अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यानंतर २६ जानेवारी रोजी त्यांनी पुन्हा उपोषणाचा इशारा दिला होता; मात्र पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित केले होते.

शासनाने शिवणी अरमाळ प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता; परंतु खडकपूर्णा प्रकल्पातील पाणी सोडण्याबाबत ठोस भूमिका घेतली नाही. प्रशासनाच्या या उदासीनतेपायी अखेर कैलास नागरे यांनी शेतातच जीवन संपवले.

संतप्त ग्रामस्थांनी लेखी आश्वासन मिळेपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा घेतला. प्रशासनाने ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र शेतकरी ठाम राहिले. आमदार मनोज कायंदे यांनी पाणी प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सायंकाळी नागरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

'शेती आहुती मागतेय!' सुसाइड नोटमधील हृदयद्रावक मजकूर

आत्महत्या करण्यापूर्वी कैलास नागरे यांनी लिहिलेली तीन पानांची चिठ्ठी त्यांच्या खिशात सापडली. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार आणि खासदारांना उद्देशून त्यांनी ही चिठ्ठी लिहिली आहे.

या चिठ्ठीत कैलास यांनी म्हटले आहे की, 'ही शेती आहुती मागतेय. कृपया पंचक्रोशीत पाणी हमी द्या. हमी पाणी हेच जीवन; अन्यथा शेतकरी स्पर्धेतून बाद होतो. मला वादा करा, काहीही करा; पण माझ्या पंचक्रोशीत शेतीला पाणी हमी द्या!' 

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी