शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

राज्य सरकारचा पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्याची पाण्यासाठी आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 09:21 IST

म्हणाले... शून्य झालो, शून्य सोडून जातोय !

अंढेरा (जि. बुलढाणा) : शून्य झालो आणि शून्य सोडून जात आहे, या शब्दांत हतबलता व्यक्त करीत, राज्य शासनाने युवा शेतकरी पुरस्कार देऊन गौरविलेल्या तरुण शेतकऱ्याने ऐन होळीच्या दिवशी गुरुवारी विष प्राशन करून आत्महत्या केली. शेतीसाठी पाणी मिळविण्याकरिता सातत्याने लढा देत असलेल्या कैलास नागरे (वय ४४) यांनी परिस्थितीपुढे हात टेकत मृत्यूला जवळ केले. त्यांच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी सरकारच्या कृषी क्षेत्रासंदर्भातील अनास्थेची चिरफाड केली आहे.

शिवणी अरमाळ (ता. देऊळगाव राजा) येथील कैलास नागरे हे खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाणी हमीसाठी लढा देत होते. खडकपूर्णाचे पाणी शिवणी अरमाळ धरणात आणत बारमाही सिंचनाची व्यवस्था व्हावी, या मागणीसाठी त्यांनी डिसेंबरमध्ये सात दिवसांचे अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यानंतर २६ जानेवारी रोजी त्यांनी पुन्हा उपोषणाचा इशारा दिला होता; मात्र पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित केले होते.

शासनाने शिवणी अरमाळ प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता; परंतु खडकपूर्णा प्रकल्पातील पाणी सोडण्याबाबत ठोस भूमिका घेतली नाही. प्रशासनाच्या या उदासीनतेपायी अखेर कैलास नागरे यांनी शेतातच जीवन संपवले.

संतप्त ग्रामस्थांनी लेखी आश्वासन मिळेपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा घेतला. प्रशासनाने ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र शेतकरी ठाम राहिले. आमदार मनोज कायंदे यांनी पाणी प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सायंकाळी नागरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

'शेती आहुती मागतेय!' सुसाइड नोटमधील हृदयद्रावक मजकूर

आत्महत्या करण्यापूर्वी कैलास नागरे यांनी लिहिलेली तीन पानांची चिठ्ठी त्यांच्या खिशात सापडली. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार आणि खासदारांना उद्देशून त्यांनी ही चिठ्ठी लिहिली आहे.

या चिठ्ठीत कैलास यांनी म्हटले आहे की, 'ही शेती आहुती मागतेय. कृपया पंचक्रोशीत पाणी हमी द्या. हमी पाणी हेच जीवन; अन्यथा शेतकरी स्पर्धेतून बाद होतो. मला वादा करा, काहीही करा; पण माझ्या पंचक्रोशीत शेतीला पाणी हमी द्या!' 

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी