शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

कारखन्याचे दूषित पाणी थेट सोडले धरणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 16:09 IST

केमीकलयुक्त दुषित व दुर्गंधीयुक्त पाणी वायझडी धरणाच्या मुख्य नाल्यात सोडण्यात येत असल्याने नाला व धरणातील पाणी दूषित होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : स्थानिक एमआयडीसीस्थित एका कपडा फॅक्टरीचे केमीकलयुक्त दुषित व दुर्गंधीयुक्त पाणी वायझडी धरणाच्या मुख्य नाल्यात सोडण्यात येत असल्याने नाला व धरणातील पाणी दूषित होत आहे. या पाण्याला दूर्गंधी असल्याने जनावरांनी पाणी पित नाहीत. तसेच पिके देखील धोक्यात आली असल्याने फॅक्टरीच्या या दुषित पाणी तातडीने थांबविण्यात यावे, अशी मागणी चिखली व खंडाळा मकरध्वज शिवारातील शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, याची दखल घेत तहसीलदार येळे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून फॅक्टरी मालकास उपाययोजनेचे निर्देश दिले आहेत.चिखली एमआयडीसीमधील एका टेक्सटाईल कंपनीतून निघणारे केमीकलयुक्त घाण पाणी वायझडी धरणात सोडण्यात येत आहे. या दुषित पाण्याची प्रचंड दूर्गंधी सुटल्यामुळे जनावरे पाणी पीत नाहीत. यासह हे पाणी सुचेत उर्फ बबलू देशमुख, आशिष महाडीक यांच्या शेताजवळ व धरणाच्या ज्या ठीकाणी तुंबते त्या कट्ट्यामधील पाणी काळे पडले आहे व त्याची दुर्गंधी सुटली आहे. तेच पाणी देशमुख यांच्या विहिरीमध्ये येत असल्याने विहरीतील पाण्याचा सुध्दा वास येत असून नाल्याला लागून असलेल्या विहरीतील पाणी दुषीत होऊन वास मारत असल्याने मजुरांना शहरातून पाणी घेऊन प्यावे लागत आहे. या दुषीत पाण्याबाबत फॅक्टरीचे मालक व व्यवस्थापकांकडे शेतकऱ्यांनी धरणाच्या मुख्य ओढ्यात हे पाणी येऊ देऊ नये अशी विनंती करण्यात आली होती. परंतू, वारंवार सांगूनही यावर उपाय न झाल्याने आणि जनावरांच्या व माणसांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तथापी हेच पाणी पिकाला देण्यात येत असल्याने जमिनीची पोत खराब होत असल्याची तक्रार शेतकºयांनी केली आहे. तसेच धरणाखाली पाणीपुरवठा विहिरी असल्याने भविष्यात हेच रसायनयुक्त पाणी मोठ्या प्रमाणात वायझडी धरणामध्ये साठवले जाणार असल्याने याचा विपरीत परिणाम सर्वांना भोगावे लागणार आहेत. यामुळे तातडीने पाहणी करून या रसायनयुक्त दूषित पाण्याबाबत उपाययोजना करण्यात याव्या, दूषित पाणी धरणाच्या मुख्य नाल्याच्या प्रवाहात सोडणाºयांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली होती. याअनुषंगाने ६ फेब्रुवारी रोजी तहसीलदार येळे यांनी मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासमवेत प्रत्यक्ष पाहणी करून कंपनीच्या मालकांना उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान कंपनीनेही याबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे मान्य केले आहे. ओढ्याने केमीकलचे पाणी आल्यास कारवाई करणार असल्याचे अश्वासन तहसीलदारांनी शेतकºयांना दिले आहे. यावेळी रयत संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक सरनाईक, स्वाभिमानीचे नितिन राजपूत, मंडळ अधिकारी पाटील, तलाठी गिरी, शेजोळ, बबलू देशमुख, आशिष महाडीक, एकनाथ यादव, शे. जमील शे. अहमद, सुरेश गायकवाड आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाChikhliचिखलीDamधरण