शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

कारखन्याचे दूषित पाणी थेट सोडले धरणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 16:09 IST

केमीकलयुक्त दुषित व दुर्गंधीयुक्त पाणी वायझडी धरणाच्या मुख्य नाल्यात सोडण्यात येत असल्याने नाला व धरणातील पाणी दूषित होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : स्थानिक एमआयडीसीस्थित एका कपडा फॅक्टरीचे केमीकलयुक्त दुषित व दुर्गंधीयुक्त पाणी वायझडी धरणाच्या मुख्य नाल्यात सोडण्यात येत असल्याने नाला व धरणातील पाणी दूषित होत आहे. या पाण्याला दूर्गंधी असल्याने जनावरांनी पाणी पित नाहीत. तसेच पिके देखील धोक्यात आली असल्याने फॅक्टरीच्या या दुषित पाणी तातडीने थांबविण्यात यावे, अशी मागणी चिखली व खंडाळा मकरध्वज शिवारातील शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, याची दखल घेत तहसीलदार येळे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून फॅक्टरी मालकास उपाययोजनेचे निर्देश दिले आहेत.चिखली एमआयडीसीमधील एका टेक्सटाईल कंपनीतून निघणारे केमीकलयुक्त घाण पाणी वायझडी धरणात सोडण्यात येत आहे. या दुषित पाण्याची प्रचंड दूर्गंधी सुटल्यामुळे जनावरे पाणी पीत नाहीत. यासह हे पाणी सुचेत उर्फ बबलू देशमुख, आशिष महाडीक यांच्या शेताजवळ व धरणाच्या ज्या ठीकाणी तुंबते त्या कट्ट्यामधील पाणी काळे पडले आहे व त्याची दुर्गंधी सुटली आहे. तेच पाणी देशमुख यांच्या विहिरीमध्ये येत असल्याने विहरीतील पाण्याचा सुध्दा वास येत असून नाल्याला लागून असलेल्या विहरीतील पाणी दुषीत होऊन वास मारत असल्याने मजुरांना शहरातून पाणी घेऊन प्यावे लागत आहे. या दुषीत पाण्याबाबत फॅक्टरीचे मालक व व्यवस्थापकांकडे शेतकऱ्यांनी धरणाच्या मुख्य ओढ्यात हे पाणी येऊ देऊ नये अशी विनंती करण्यात आली होती. परंतू, वारंवार सांगूनही यावर उपाय न झाल्याने आणि जनावरांच्या व माणसांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तथापी हेच पाणी पिकाला देण्यात येत असल्याने जमिनीची पोत खराब होत असल्याची तक्रार शेतकºयांनी केली आहे. तसेच धरणाखाली पाणीपुरवठा विहिरी असल्याने भविष्यात हेच रसायनयुक्त पाणी मोठ्या प्रमाणात वायझडी धरणामध्ये साठवले जाणार असल्याने याचा विपरीत परिणाम सर्वांना भोगावे लागणार आहेत. यामुळे तातडीने पाहणी करून या रसायनयुक्त दूषित पाण्याबाबत उपाययोजना करण्यात याव्या, दूषित पाणी धरणाच्या मुख्य नाल्याच्या प्रवाहात सोडणाºयांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली होती. याअनुषंगाने ६ फेब्रुवारी रोजी तहसीलदार येळे यांनी मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासमवेत प्रत्यक्ष पाहणी करून कंपनीच्या मालकांना उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान कंपनीनेही याबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे मान्य केले आहे. ओढ्याने केमीकलचे पाणी आल्यास कारवाई करणार असल्याचे अश्वासन तहसीलदारांनी शेतकºयांना दिले आहे. यावेळी रयत संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक सरनाईक, स्वाभिमानीचे नितिन राजपूत, मंडळ अधिकारी पाटील, तलाठी गिरी, शेजोळ, बबलू देशमुख, आशिष महाडीक, एकनाथ यादव, शे. जमील शे. अहमद, सुरेश गायकवाड आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाChikhliचिखलीDamधरण