झाडे जिवंत ठेवल्यास दरवर्षी अनुदान

By Admin | Updated: June 22, 2014 01:14 IST2014-06-22T01:01:29+5:302014-06-22T01:14:36+5:30

पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजना : राज्यातील चार हजार १७४ ग्रामपंचायतींना संधी

Every year if plants keep alive, grants | झाडे जिवंत ठेवल्यास दरवर्षी अनुदान

झाडे जिवंत ठेवल्यास दरवर्षी अनुदान

हर्षनंदन वाघ / बुलडाणा
गावाच्या लोकसंख्येएवढी झाडे जिवंत ठेवणार्‍या ग्रामपंचायतींना पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजनेंतर्गत दरवर्षी अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, त्या आधारे राज्यातील ४,१७४ ग्रामपंचायतींना, अनुदानासाठी दरवर्षी पात्र ठरण्याची संधी प्राप्त झाली आहे.
पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करून, समृद्ध व संपन्न गावांची निर्मिती ही काळाची गरज असल्याचे ओळखून, ह्यइको व्हिलेजह्णची संकल्पना राबविण्यासाठी राज्य शासनाने पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजना राज्यात सुरू केली आहे. योजनेच्या तिसर्‍या वर्षी एकूण ४,१७४ ग्रामपंचायती अनुदानासाठी पात्र ठरल्या होत्या.
शासनाने २0१0-११ मध्ये सुरू केलेल्या पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजनेंतर्गत सतत तीन वर्ष विविध निकष पूर्ण करणार्‍या ग्रामपंचायतींना लोकसंख्येच्या आधारे निधी देण्यात येत आहे. राज्यातील एकूण २७,५00 ग्रामपंचायतीपैकी प्रथम वर्षी १६,४४३, व्दितीय वर्षी ९,२९0, तर तृतीय वर्षी ४,१७४ ग्रामपंचायती पात्र ठरल्या व त्यांनी योजनेच्या अंतर्गत मिळणार्‍या विविध निधीचा लाभ घेतला; मात्र तिसर्‍या वर्षानंतर कोणत्याच प्रकारचा लाभ मिळत नसल्यामुळे अनेक ग्राम पंचायती या योजनेपासून दूर जात होत्या. त्यामुळे शासनाने तिसर्‍या वर्षाचे निकष पूर्ण करणार्‍या ग्राम पंचायतींना, निकषामध्ये सातत्य ठेवल्यास दरवर्षी अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे तिसर्‍या वर्षी निधी प्राप्त करणार्‍या राज्यातील ४,१७७ ग्रामपंचायतींना दरवर्षी निधी मिळविण्याची संधी प्राप्त झाली आहे.

Web Title: Every year if plants keep alive, grants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.