शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

यंदाही वैशाख पौर्णिमेला वन्यप्राणी गणना नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 10:40 IST

Wildlife census : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या आदेशानंतर यंदाच्या वर्षीही गणना रद्द करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क संग्रामपूर : दरवर्षी वैशाख पौर्णिमेला होणारी पक्षी व वन्यप्राणी गणना सलग दुसऱ्या वर्षीही होणार नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या आदेशानंतर यंदाच्या वर्षीही गणना रद्द करण्यात आली आहे. यामुळे पक्षी व प्राणिप्रेमींची निराशा झाली आहे.वन्यजीव संवर्धन कार्यात अधिकाधिक लोकसहभाग मिळावा यासाठी वन्यजीवप्रेमींनाही गणनेमध्ये सहभागी करून घेतले जाते. भारतातील जंगलात वन्यप्राण्यांची संख्या किती हे मोजण्यासाठी भारतीय वन्यजीव संस्थेने पाऊलखुणा आणि पाणवठ्यावर येणाऱ्या वन्यप्राण्यांच्या आधारावर वन्यप्राणी गणना सुरू केली होती. त्यासाठी पाणवठ्याशेजारी मचाण उभारून त्यावरून वन्यजिवांचे निरीक्षण करण्यात येते. ते वन्यजीवप्रेमींना अभ्यासासाठी महत्त्वाची मानली जाते. या उपक्रमातून पक्षी, प्राणी व पर्यावरणाबाबतचे ज्ञान मिळते. यात स्वयंसेवी संस्थांनाही समाविष्ट केले जाते. वैशाख पौर्णिमेला दुपारी गणनेस सुरुवात होते, तर दुसऱ्या दिवशी दुपारी गणना संपविली जाते.केंद्र सरकारने २३ मार्च २०२० रोजी लॉकडाऊन जाहीर केले होते, तर ७ मे २०२० रोजी वैशाख पौर्णिमा होती.त्यामुळे २०२० मध्ये गणना झाली नव्हती. यंदाच्या वर्षी लॉकडाऊन असल्याने २६ मे रोजी असणाऱ्या वैशाख पौर्णिमेदिवशी आयोजित करण्यात आलेली गणना रद्द केली आहे. 

गणना वैशाख पौर्णिमेलाच का ? वैशाख पौणिमेच्या दिवशी चंद्राची कक्षा पृथ्वीच्या जवळ असते. चंद्राचा लख्ख प्रकाश पृथ्वीवर पडत असतो. त्यामुळे पक्षी व प्राणी सहज दिसून येतात. मे महिन्यात झाडांची पाने गळालेली असतात. त्यामुळे लांबपर्यंतचे प्राणी मचाणावरून दिसतात. त्यांच्या नोंदी घेऊन त्यांना ओळखणे सोपे जाते. तसेच या नोंदीवरून वनविभागास आपल्या क्षेत्रातील प्राण्यांची माहिती मिळाल्याने त्यांच्या संवर्धनासाठी उपाययोजना करणे सुलभ होते. यासाठी वैशाख पौणिमेदिवशी प्राणी व पक्ष्यांच्या नोंदी केल्या जातात. 

महाराष्ट्र शासनाने यंदाच्या वर्षीही वैशाख पौर्णिमा दिवशी गणना करण्यास मनाई केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील वर्षी कोरोना पूर्णपणे नष्ट होऊन गणना करण्याची संधी प्राणी व पक्षिप्रेमींना मिळेल, अशी अपेक्षा आहे.सुहास कांबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, सोनाळा

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरforestजंगलwildlifeवन्यजीव