शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

यंदाही वैशाख पौर्णिमेला वन्यप्राणी गणना नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 10:40 IST

Wildlife census : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या आदेशानंतर यंदाच्या वर्षीही गणना रद्द करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क संग्रामपूर : दरवर्षी वैशाख पौर्णिमेला होणारी पक्षी व वन्यप्राणी गणना सलग दुसऱ्या वर्षीही होणार नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या आदेशानंतर यंदाच्या वर्षीही गणना रद्द करण्यात आली आहे. यामुळे पक्षी व प्राणिप्रेमींची निराशा झाली आहे.वन्यजीव संवर्धन कार्यात अधिकाधिक लोकसहभाग मिळावा यासाठी वन्यजीवप्रेमींनाही गणनेमध्ये सहभागी करून घेतले जाते. भारतातील जंगलात वन्यप्राण्यांची संख्या किती हे मोजण्यासाठी भारतीय वन्यजीव संस्थेने पाऊलखुणा आणि पाणवठ्यावर येणाऱ्या वन्यप्राण्यांच्या आधारावर वन्यप्राणी गणना सुरू केली होती. त्यासाठी पाणवठ्याशेजारी मचाण उभारून त्यावरून वन्यजिवांचे निरीक्षण करण्यात येते. ते वन्यजीवप्रेमींना अभ्यासासाठी महत्त्वाची मानली जाते. या उपक्रमातून पक्षी, प्राणी व पर्यावरणाबाबतचे ज्ञान मिळते. यात स्वयंसेवी संस्थांनाही समाविष्ट केले जाते. वैशाख पौर्णिमेला दुपारी गणनेस सुरुवात होते, तर दुसऱ्या दिवशी दुपारी गणना संपविली जाते.केंद्र सरकारने २३ मार्च २०२० रोजी लॉकडाऊन जाहीर केले होते, तर ७ मे २०२० रोजी वैशाख पौर्णिमा होती.त्यामुळे २०२० मध्ये गणना झाली नव्हती. यंदाच्या वर्षी लॉकडाऊन असल्याने २६ मे रोजी असणाऱ्या वैशाख पौर्णिमेदिवशी आयोजित करण्यात आलेली गणना रद्द केली आहे. 

गणना वैशाख पौर्णिमेलाच का ? वैशाख पौणिमेच्या दिवशी चंद्राची कक्षा पृथ्वीच्या जवळ असते. चंद्राचा लख्ख प्रकाश पृथ्वीवर पडत असतो. त्यामुळे पक्षी व प्राणी सहज दिसून येतात. मे महिन्यात झाडांची पाने गळालेली असतात. त्यामुळे लांबपर्यंतचे प्राणी मचाणावरून दिसतात. त्यांच्या नोंदी घेऊन त्यांना ओळखणे सोपे जाते. तसेच या नोंदीवरून वनविभागास आपल्या क्षेत्रातील प्राण्यांची माहिती मिळाल्याने त्यांच्या संवर्धनासाठी उपाययोजना करणे सुलभ होते. यासाठी वैशाख पौणिमेदिवशी प्राणी व पक्ष्यांच्या नोंदी केल्या जातात. 

महाराष्ट्र शासनाने यंदाच्या वर्षीही वैशाख पौर्णिमा दिवशी गणना करण्यास मनाई केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील वर्षी कोरोना पूर्णपणे नष्ट होऊन गणना करण्याची संधी प्राणी व पक्षिप्रेमींना मिळेल, अशी अपेक्षा आहे.सुहास कांबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, सोनाळा

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरforestजंगलwildlifeवन्यजीव