जिल्ह्याला समृद्ध करण्यासाठी सर्वांनी विकास प्रक्रियेत सहभागी व्हावे-पुलकुंडवार
By Admin | Updated: May 1, 2017 13:53 IST2017-05-01T13:53:17+5:302017-05-01T13:53:17+5:30
जिल्ह्याला या योजनांच्या माध्यमातूनसमृद्ध करण्यासाठी सर्वांनी विक्रास प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहनजिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज केले.

जिल्ह्याला समृद्ध करण्यासाठी सर्वांनी विकास प्रक्रियेत सहभागी व्हावे-पुलकुंडवार
राज्याचा ५७ वा स्थापना दिवस थाटात
बुलडाणा : राज्य शासन विविध विभाग व अनेक योजनांच्या माध्यमातून जनतेचे
कल्याण साधण्याचे काम करीत असते. यामध्ये जनतेच्या दैनंदिन आयुष्याशी
निगडीत घटकांचादेखील सहभाग असतो. शासन राबवित असलेल्या योजनांमध्ये
लोकसहभागही तितकाच महत्वाचा असतो. जिल्ह्याला या योजनांच्या माध्यमातून
समृद्ध करण्यासाठी सर्वांनी विक्रास प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन
जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज केले.
महाराष्ट्र राज्याचा ५७ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा पोलीस
कवायत मैदानावर आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहणानंतर जिल्ह्याला
संबोधित करताना जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा
श्रीमती उमाताई तायडे, माजी आमदार विजयराज शिंदे, नगराध्यक्षा श्रीमती
नजमुन्नीसा मो. सज्जाद, जिल्हा पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना, जि.प मुख्य
कार्यकारी अधिकारी षष्मुखराजन, अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे
आदींची उपस्थिती होती.
जिल्ह्यात उद्भवत असलेल्या पाणीटंचाईवर यशस्वीरित्या मात करण्यात येत
असल्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले, सध्या तीव्र उन्हाळ्यामुळे
जिल्ह्यात पाणीटंचाईची दाहकता सर्वदूर जाणवत आहे. अशा परिस्थितीत
प्रशासनाने नागरिकांना मुबलक व पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्याचे ध्येय
डोळ्यासमोर ठेवले आहे. पाणीटंचाईचे संकट दूर करण्यासाठी प्रशासनाने विविध
उपाययोजना करून पाणीटंचाईवर मात करण्याचे यशस्वी नियोजन केले आहे.गत खरीप
हंगामात तूरीचे प्रचंड उत्पादन झाले. तूरीला खाजगी व्यापा?्यांकडून किमान
आधारभूत किंमतीपेक्षा कमी मिळत असलेला दर बघता बळीराजाचे नुकसान होऊ नये,
म्हणून शासनाने नाफेडमार्फत तूरीची शासकीय खरेदी केली. नुकतेच राज्य
शासनाने २२ एप्रिल पर्यंत नोंद झालेल्या संपूर्ण तुरीची खरेदी करावयाचा
निर्णय घेतला असून खरेदीला सुरूवातही झाली आहे.
ते पुढे म्हणाले, या खरीप हंगापासून राज्यभर ह्यउन्नत शेती समृद्ध
शेतकरी अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाच्या माध्यमातून तालुका हा
कृषि विकासाचा घटक निश्चित करण्यात आला असून कृषि यांत्रिकीकरणाची विशेष
मोहिम राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेत जमिनीचे आरोग्य समजून
त्याप्रमाणे पीक घेता यावे, यासाठी मृद आरोग्य पत्रिका वितरण अभियान सुरू
आहे. जिल्ह्यात २०१६-१७ मध्ये ६० हजार ८७५ मातीच्या नमुन्यांची तपासणी
करण्यात आली असून ४ लक्ष ४ हजार ९१२ आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात आले
आहे.