गटविम्याचे पैसे मिळत नसल्याची कर्मचार्यांची तक्रार
By Admin | Updated: May 12, 2014 22:51 IST2014-05-12T22:47:39+5:302014-05-12T22:51:33+5:30
कर्मचार्याच्या वेतनातून कपात करण्यात येणारी एलआयसी गटविम्याची रक्कम भरण्यात आली नाही;

गटविम्याचे पैसे मिळत नसल्याची कर्मचार्यांची तक्रार
डोणगाव : भविष्याचा विचार करुन जिल्हा परिषद कर्मचार्याच्या वेतनातून कपात करण्यात येणारी एलआयसी गटविम्याची रक्कम भरण्यात आली नाही; तसेच सेवानवृत्तीनंतर कर्मचार्यांना गटविम्याचे पैसे मिळत नसल्याची तक्रार सेवानवृत्त आरोग्यसेवक आर.जी.चनखोरे यांनी केली आहे. पगारासाठी पूर्ण अनुदान प्राप्त असताना गटविकास अधिकारी यांनी सदरचा पैसा दुसरीकडे वळती केला आहे. कर्मचार्यांचा भविष्य निर्वाह निधी, एलआयसी, गटविमा इत्यादीचे पैसे जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या खात्यात पाठविल्याने सदरचा धनादेश परत झाला. त्यामुळे आजपावेतो सेवानवृत्त चनखोरे यांच्या नावे कोणतेही पैसे जमा झाले नाहीत. असाच प्रकार अनेक कर्मचार्यांच्या बाबतीत झाला असतानाही प्रशासन मात्र गप्प आहे.