शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील पाच शहरात धावणार ई-रिक्षा

By admin | Updated: August 6, 2016 01:51 IST

वायु प्रदूषणाला बसणार आळा; प्रवासी वाहतुकीचे परवाने देण्यास मान्यता.

नीलेश शहाकारबुलडाणा, दि. ५ : रस्त्यांवरील वाहनांची गर्दी वाढण्यासोबतच अवैध प्रवासी वाहतुकीला चालना मिळत आहे.त्याला आळा घालण्यासह पर्यावरणालापुरक ठरण्याच्या दृष्टीने ई-रिक्षाला प्रवासी वाहतुकीचे परवाने देण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा, नागपूर व वर्धा या पाच शहरामध्ये लवकरच ई-रिक्षा धावतांना दिसणार आहे.पर्यावरण सुरक्षा व रोजगार निर्मिती या उद्देशाने गृह विभागाने ३ ऑगस्ट रोजी या संदर्भात प्रादेशिक परिवहन विभागाला आदेश दिला. मोटर वाहन कायदा, ११८८च्या कलम ७४(१) मधील तरतुदीनुसार विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा, नागपूर व वर्धा तसेच मराठवाड्यातील लातूर या ठिकाणी प्रादेशिक परिवहन विभागाने ई-रिक्षा संदर्भात परवाने देण्याबाबत कार्यवाही करावी, असे आदेशात नमुद आहे.सदर ई-रिक्षाचे परवाने देण्यापूर्वी सबंधीत प्रादेशिक परिवहन विभागाला संबधीत शहरातील पोलीस आयुक्त/अधिक्षक, महानगर पालिका आयुक्त/मुख्याधिकारी यांचे अभिप्राय घेणे बंधनकारक राहणार आहे. राज्य शासनाच्या ई-रिक्षा धोरणानुसार ई-रिक्षा वाहनांचा स्वंतत्र्य संवर्ग राहणार असून चालकाला ई-रिक्षा परवाना मिळाल्यानंतर विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ई-रिक्षा वाहतुकीसाठी वेगळा रस्ता तयार करण्यात येणार आहे.सायकल रिक्षाचालकांना सुगीचे दिवसआदेशानुसार केवळ सायकलरिक्षा चालविणार्‍या चालक, मालक यांनाच ई-रिक्षा परवाने दिले जाणार आहेत. ई-रिक्षाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण केल्या जाणार आहेत. या शिवाय महिला व अंपग व्यक्तींना प्राधान्य राहणार आहे. तसेच ई-रिक्षामुळे शहरातील वायू प्रदुषणाची पातळी कमी करण्याचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे.मराठी बोलता येणे अनिवार्यआदेशानुसार ई-रिक्षा परवानासाठी अर्ज करणार्‍यास स्थानिक भाषा व स्थानिक स्थळांची माहिती असणे अनिवार्य असणार आहे. शिवाय त्यांच्यावर १ वर्षात कुठलाही गुन्हा दाखल नसावा, तो शासकीय व खाजगी कंपनीत नोकरीवर नसावा अशी अट आहे.प्रवाशांची घेणार काळजीसदर वाहनांमध्ये प्रथमोपचार पेटी, अग्निशमन यंत्र ठेवणे अनिवार्य राहणार आहे. तसेच वाहनावर चालकाचे नाव, पत्ता, फोन क्रमांक रंगविणे अनिवार्य राहील. आसन क्षमतेपक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे, उभ्या प्रवाश्यांची वाहतूक केल्यास वाहन जप्त केले जाणार आहे.