शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

विदर्भातील पाच शहरात धावणार ई-रिक्षा

By admin | Updated: August 6, 2016 01:51 IST

वायु प्रदूषणाला बसणार आळा; प्रवासी वाहतुकीचे परवाने देण्यास मान्यता.

नीलेश शहाकारबुलडाणा, दि. ५ : रस्त्यांवरील वाहनांची गर्दी वाढण्यासोबतच अवैध प्रवासी वाहतुकीला चालना मिळत आहे.त्याला आळा घालण्यासह पर्यावरणालापुरक ठरण्याच्या दृष्टीने ई-रिक्षाला प्रवासी वाहतुकीचे परवाने देण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा, नागपूर व वर्धा या पाच शहरामध्ये लवकरच ई-रिक्षा धावतांना दिसणार आहे.पर्यावरण सुरक्षा व रोजगार निर्मिती या उद्देशाने गृह विभागाने ३ ऑगस्ट रोजी या संदर्भात प्रादेशिक परिवहन विभागाला आदेश दिला. मोटर वाहन कायदा, ११८८च्या कलम ७४(१) मधील तरतुदीनुसार विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा, नागपूर व वर्धा तसेच मराठवाड्यातील लातूर या ठिकाणी प्रादेशिक परिवहन विभागाने ई-रिक्षा संदर्भात परवाने देण्याबाबत कार्यवाही करावी, असे आदेशात नमुद आहे.सदर ई-रिक्षाचे परवाने देण्यापूर्वी सबंधीत प्रादेशिक परिवहन विभागाला संबधीत शहरातील पोलीस आयुक्त/अधिक्षक, महानगर पालिका आयुक्त/मुख्याधिकारी यांचे अभिप्राय घेणे बंधनकारक राहणार आहे. राज्य शासनाच्या ई-रिक्षा धोरणानुसार ई-रिक्षा वाहनांचा स्वंतत्र्य संवर्ग राहणार असून चालकाला ई-रिक्षा परवाना मिळाल्यानंतर विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ई-रिक्षा वाहतुकीसाठी वेगळा रस्ता तयार करण्यात येणार आहे.सायकल रिक्षाचालकांना सुगीचे दिवसआदेशानुसार केवळ सायकलरिक्षा चालविणार्‍या चालक, मालक यांनाच ई-रिक्षा परवाने दिले जाणार आहेत. ई-रिक्षाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण केल्या जाणार आहेत. या शिवाय महिला व अंपग व्यक्तींना प्राधान्य राहणार आहे. तसेच ई-रिक्षामुळे शहरातील वायू प्रदुषणाची पातळी कमी करण्याचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे.मराठी बोलता येणे अनिवार्यआदेशानुसार ई-रिक्षा परवानासाठी अर्ज करणार्‍यास स्थानिक भाषा व स्थानिक स्थळांची माहिती असणे अनिवार्य असणार आहे. शिवाय त्यांच्यावर १ वर्षात कुठलाही गुन्हा दाखल नसावा, तो शासकीय व खाजगी कंपनीत नोकरीवर नसावा अशी अट आहे.प्रवाशांची घेणार काळजीसदर वाहनांमध्ये प्रथमोपचार पेटी, अग्निशमन यंत्र ठेवणे अनिवार्य राहणार आहे. तसेच वाहनावर चालकाचे नाव, पत्ता, फोन क्रमांक रंगविणे अनिवार्य राहील. आसन क्षमतेपक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे, उभ्या प्रवाश्यांची वाहतूक केल्यास वाहन जप्त केले जाणार आहे.