शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

मान्सून काळात साथरोग प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 16:36 IST

३३ गावात संभाव्य साथ रोगांचा उद्रेक रोखण्याच्या आरोग्य यंत्रणा कायम सक्रीय राहण्याच्या दृष्टीकोणातून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सध्या नियोजन करण्यास प्रारंभ केला आहे.

-  नीलेश जोशी  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : मान्सून काळातील आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून गेल्या पाच वर्षात साथ उद्रेकाच्या दृष्टीने संवेदनशील बनलेली १२ गावे आणि पावसाळ््यात वाहन पोहोचू शकत नाही अशा ३३ गावात संभाव्य साथ रोगांचा उद्रेक रोखण्याच्या आरोग्य यंत्रणा कायम सक्रीय राहण्याच्या दृष्टीकोणातून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सध्या नियोजन करण्यास प्रारंभ केला आहे.पुढील आठवड्यात दक्षीण अंदमानमध्ये मान्सून सक्रीय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेनेही पावसाळ््यातील संभाव्य आपत्ती काळात उपाययोजनांचे नियोजन करण्याच्या हालचाली सुरू केल्या असून अनुषंगीक माहिती स्थानिक पातळीवरून जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने मागवली आहे. सोबतच २३ मे रोजी मतमोजणी झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात जिल्हास्तरावर बैठक होणार असून त्यामध्ये जिल्हा परिषदेचे नियोजनही सादर करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने तालुकास्तरावर १३ पथके आणि १३ नियंत्रण कक्षही स्थापन्याच्या संदर्भाने प्रशासन विचार करत असल्याचे सुत्रांनी सांगितले. प्रामुख्याने ज्या भागात किंवा गावात यापूर्वी मान्सून काळात साथरोगांचा उद्रेक झाला आहे किंवा नदी काठच्या गावांची संख्या अधिक आहे, अशा परिसरात येणार्या जिल्हा परिषदेच्या १४ प्राथमिक आरोग्य केंद्रांना पावसाळ््याच्या दृष्टीने आवश्यक औषधी साठा उपलब्ध करण्यासोबतच प्रसंगी जो औषधीसाठा उपलब्ध नाही किंवा शिल्लक नाही तो जिल्हास्तरावरून घेण्याबाबतचे नियोजन प्रशासन सध्या करत आहेत. या व्यतिरिक्त रुग्ण कल्याण समितीमधून त्वरेने काही औषधी साठा खरेदी करण्याचेही प्रशासन प्रयत्न होण्याची शक्यता आहे. नैसर्गिक आपत्तीच्या समयी शिघ्र प्रतिसादासाठीही जिल्हास्तरावर जिल्हास्तरावर अधिकार्यांशी थेट संपर्क साधण्याचे नियोजन लवकरच जिल्हास्तरीय समितीची बैठक झाल्यानंतर करण्यात येणार आहे. गेल्या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, विस्तार अधिकारी (साथरोग), मुख्य अनुजिव शास्त्रज्ञ यांच्याशी थेट संपर्क करण्याबाबत अवगत करण्यात आले होते. त्याच पद्धतीने यंदाही अनुषंगीक उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता आहे.दुसरीकडे गेल्या वर्षी पावसाळ््यात आपले मुख्यालय पूर्वसुचना न देता सोडणार्या अधिकारी व कर्मचार्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या कलम ५५ आणि ५६ अन्वये थेट कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले होते. तसेच निर्देश यंदाही जिल्हास्तरावरील बैठक झाल्यानंतर दिले जाण्याची शक्यता आहे. साधारणत: सप्टेंबर अखेर पर्यंत असे आदेश दिल्या जाण्याची पूर्वीपासूनची परंपरा आहे.मान्सून काळातील आपत्ती व्यवस्थापन कण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांकडूनही सविस्तर माहिती मागविण्यात आली असल्याचे सुत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले आहे.औषधांचा साठा राखीव!साथ रोगांना मान्सून काळात प्रतिबंध घालण्यासाठी तसा पूर्वइतिहास असलेल्या गावांमध्ये व त्यालगतच्या आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा साठा राखीव ठेवण्यात येणार आहे. प्रुयोझोलीडिन, क्लोरोकिन, पॅरासिटामॉल, झिंक सल्फेट, ओआरएसची पाकिटे यासह जवळपास २१ प्रकारची औषधे ठेवण्यात येणार आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून त्यासंदर्भाने माहितीही संकलीत करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाHealthआरोग्य