शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
7
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
8
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
9
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
10
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
11
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
12
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
13
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
14
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
15
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
16
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
17
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
18
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
19
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
20
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!

मान्सून काळात साथरोग प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 16:36 IST

३३ गावात संभाव्य साथ रोगांचा उद्रेक रोखण्याच्या आरोग्य यंत्रणा कायम सक्रीय राहण्याच्या दृष्टीकोणातून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सध्या नियोजन करण्यास प्रारंभ केला आहे.

-  नीलेश जोशी  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : मान्सून काळातील आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून गेल्या पाच वर्षात साथ उद्रेकाच्या दृष्टीने संवेदनशील बनलेली १२ गावे आणि पावसाळ््यात वाहन पोहोचू शकत नाही अशा ३३ गावात संभाव्य साथ रोगांचा उद्रेक रोखण्याच्या आरोग्य यंत्रणा कायम सक्रीय राहण्याच्या दृष्टीकोणातून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सध्या नियोजन करण्यास प्रारंभ केला आहे.पुढील आठवड्यात दक्षीण अंदमानमध्ये मान्सून सक्रीय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेनेही पावसाळ््यातील संभाव्य आपत्ती काळात उपाययोजनांचे नियोजन करण्याच्या हालचाली सुरू केल्या असून अनुषंगीक माहिती स्थानिक पातळीवरून जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने मागवली आहे. सोबतच २३ मे रोजी मतमोजणी झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात जिल्हास्तरावर बैठक होणार असून त्यामध्ये जिल्हा परिषदेचे नियोजनही सादर करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने तालुकास्तरावर १३ पथके आणि १३ नियंत्रण कक्षही स्थापन्याच्या संदर्भाने प्रशासन विचार करत असल्याचे सुत्रांनी सांगितले. प्रामुख्याने ज्या भागात किंवा गावात यापूर्वी मान्सून काळात साथरोगांचा उद्रेक झाला आहे किंवा नदी काठच्या गावांची संख्या अधिक आहे, अशा परिसरात येणार्या जिल्हा परिषदेच्या १४ प्राथमिक आरोग्य केंद्रांना पावसाळ््याच्या दृष्टीने आवश्यक औषधी साठा उपलब्ध करण्यासोबतच प्रसंगी जो औषधीसाठा उपलब्ध नाही किंवा शिल्लक नाही तो जिल्हास्तरावरून घेण्याबाबतचे नियोजन प्रशासन सध्या करत आहेत. या व्यतिरिक्त रुग्ण कल्याण समितीमधून त्वरेने काही औषधी साठा खरेदी करण्याचेही प्रशासन प्रयत्न होण्याची शक्यता आहे. नैसर्गिक आपत्तीच्या समयी शिघ्र प्रतिसादासाठीही जिल्हास्तरावर जिल्हास्तरावर अधिकार्यांशी थेट संपर्क साधण्याचे नियोजन लवकरच जिल्हास्तरीय समितीची बैठक झाल्यानंतर करण्यात येणार आहे. गेल्या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, विस्तार अधिकारी (साथरोग), मुख्य अनुजिव शास्त्रज्ञ यांच्याशी थेट संपर्क करण्याबाबत अवगत करण्यात आले होते. त्याच पद्धतीने यंदाही अनुषंगीक उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता आहे.दुसरीकडे गेल्या वर्षी पावसाळ््यात आपले मुख्यालय पूर्वसुचना न देता सोडणार्या अधिकारी व कर्मचार्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या कलम ५५ आणि ५६ अन्वये थेट कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले होते. तसेच निर्देश यंदाही जिल्हास्तरावरील बैठक झाल्यानंतर दिले जाण्याची शक्यता आहे. साधारणत: सप्टेंबर अखेर पर्यंत असे आदेश दिल्या जाण्याची पूर्वीपासूनची परंपरा आहे.मान्सून काळातील आपत्ती व्यवस्थापन कण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांकडूनही सविस्तर माहिती मागविण्यात आली असल्याचे सुत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले आहे.औषधांचा साठा राखीव!साथ रोगांना मान्सून काळात प्रतिबंध घालण्यासाठी तसा पूर्वइतिहास असलेल्या गावांमध्ये व त्यालगतच्या आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा साठा राखीव ठेवण्यात येणार आहे. प्रुयोझोलीडिन, क्लोरोकिन, पॅरासिटामॉल, झिंक सल्फेट, ओआरएसची पाकिटे यासह जवळपास २१ प्रकारची औषधे ठेवण्यात येणार आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून त्यासंदर्भाने माहितीही संकलीत करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाHealthआरोग्य