शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
2
Kolhapur Mahadevi Elephant : अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
3
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
4
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
5
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
6
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
7
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
8
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
9
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
10
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
11
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
12
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
13
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
14
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
15
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
16
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...
17
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
18
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
19
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
20
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी

मान्सून काळात साथरोग प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 16:36 IST

३३ गावात संभाव्य साथ रोगांचा उद्रेक रोखण्याच्या आरोग्य यंत्रणा कायम सक्रीय राहण्याच्या दृष्टीकोणातून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सध्या नियोजन करण्यास प्रारंभ केला आहे.

-  नीलेश जोशी  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : मान्सून काळातील आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून गेल्या पाच वर्षात साथ उद्रेकाच्या दृष्टीने संवेदनशील बनलेली १२ गावे आणि पावसाळ््यात वाहन पोहोचू शकत नाही अशा ३३ गावात संभाव्य साथ रोगांचा उद्रेक रोखण्याच्या आरोग्य यंत्रणा कायम सक्रीय राहण्याच्या दृष्टीकोणातून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सध्या नियोजन करण्यास प्रारंभ केला आहे.पुढील आठवड्यात दक्षीण अंदमानमध्ये मान्सून सक्रीय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेनेही पावसाळ््यातील संभाव्य आपत्ती काळात उपाययोजनांचे नियोजन करण्याच्या हालचाली सुरू केल्या असून अनुषंगीक माहिती स्थानिक पातळीवरून जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने मागवली आहे. सोबतच २३ मे रोजी मतमोजणी झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात जिल्हास्तरावर बैठक होणार असून त्यामध्ये जिल्हा परिषदेचे नियोजनही सादर करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने तालुकास्तरावर १३ पथके आणि १३ नियंत्रण कक्षही स्थापन्याच्या संदर्भाने प्रशासन विचार करत असल्याचे सुत्रांनी सांगितले. प्रामुख्याने ज्या भागात किंवा गावात यापूर्वी मान्सून काळात साथरोगांचा उद्रेक झाला आहे किंवा नदी काठच्या गावांची संख्या अधिक आहे, अशा परिसरात येणार्या जिल्हा परिषदेच्या १४ प्राथमिक आरोग्य केंद्रांना पावसाळ््याच्या दृष्टीने आवश्यक औषधी साठा उपलब्ध करण्यासोबतच प्रसंगी जो औषधीसाठा उपलब्ध नाही किंवा शिल्लक नाही तो जिल्हास्तरावरून घेण्याबाबतचे नियोजन प्रशासन सध्या करत आहेत. या व्यतिरिक्त रुग्ण कल्याण समितीमधून त्वरेने काही औषधी साठा खरेदी करण्याचेही प्रशासन प्रयत्न होण्याची शक्यता आहे. नैसर्गिक आपत्तीच्या समयी शिघ्र प्रतिसादासाठीही जिल्हास्तरावर जिल्हास्तरावर अधिकार्यांशी थेट संपर्क साधण्याचे नियोजन लवकरच जिल्हास्तरीय समितीची बैठक झाल्यानंतर करण्यात येणार आहे. गेल्या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, विस्तार अधिकारी (साथरोग), मुख्य अनुजिव शास्त्रज्ञ यांच्याशी थेट संपर्क करण्याबाबत अवगत करण्यात आले होते. त्याच पद्धतीने यंदाही अनुषंगीक उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता आहे.दुसरीकडे गेल्या वर्षी पावसाळ््यात आपले मुख्यालय पूर्वसुचना न देता सोडणार्या अधिकारी व कर्मचार्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या कलम ५५ आणि ५६ अन्वये थेट कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले होते. तसेच निर्देश यंदाही जिल्हास्तरावरील बैठक झाल्यानंतर दिले जाण्याची शक्यता आहे. साधारणत: सप्टेंबर अखेर पर्यंत असे आदेश दिल्या जाण्याची पूर्वीपासूनची परंपरा आहे.मान्सून काळातील आपत्ती व्यवस्थापन कण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांकडूनही सविस्तर माहिती मागविण्यात आली असल्याचे सुत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले आहे.औषधांचा साठा राखीव!साथ रोगांना मान्सून काळात प्रतिबंध घालण्यासाठी तसा पूर्वइतिहास असलेल्या गावांमध्ये व त्यालगतच्या आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा साठा राखीव ठेवण्यात येणार आहे. प्रुयोझोलीडिन, क्लोरोकिन, पॅरासिटामॉल, झिंक सल्फेट, ओआरएसची पाकिटे यासह जवळपास २१ प्रकारची औषधे ठेवण्यात येणार आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून त्यासंदर्भाने माहितीही संकलीत करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाHealthआरोग्य