शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळात महावितरणच्या वसुलीचा ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 18:47 IST

बुलडाणा:  मार्च एंन्डीगच्या तोंडावर थकबाकी वसूलीसाठी गावोगावी महावितरणचे पथक सध्या फिरत आहे. परंतू दुष्काळात महावितरणच्या वसुलीचा शेतकरी व सर्वसामान्य ग्राहकांना ‘शॉक’ बसत आहे

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा:  मार्च एंन्डीगच्या तोंडावर थकबाकी वसूलीसाठी गावोगावी महावितरणचे पथक सध्या फिरत आहे. परंतू दुष्काळात महावितरणच्या वसुलीचा शेतकरी व सर्वसामान्य ग्राहकांना ‘शॉक’ बसत आहे. परिणामस्वरूप कर्मचारी व ग्राहकांमध्ये वाद वाढत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिवे यासह शासकीय कार्यालय व इतर सार्वजनिक ठिकाणचे लाखो रुपयांचे वीज देयक थकलेले आहे. थकीत वीजबिलांचा भरणा न करणाºया ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने १ मार्चपासून तीव्र केली आहे. वीजबिलांच्या थकबाकीचे प्रमाण वाढल्यामुळे महावितरणला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दरमहा वीजबिलांसह वीजग्राहकांकडे असलेल्या थकबाकीची वसुली करण्यासाठी महावितरणने धडक मोहीम सुरू केली आहे.   महावितरणच्या वरीष्ठ अधिकाºयांसह सर्व अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, क्षेत्रीय अभियंत्यांनी वसुली व थकबाकीदारांकडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे. परंतू सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने सर्वसामान्य ग्राहकांसह शेतकरी वर्गही थकबाकी भरू शकत नाहीत. त्यामुळे महाविरतणला या वसूली मोहीमेत मोठ्या अडचणी येत आहेत. जिल्ह्याचे अर्थचक्र हे शेतीवर अवलंबुन आहे. परंतू अत्यल्प पर्जन्यमानामुळे शेतकºयांना शेतीतील उत्पादनात मोठा फटका बसला. त्यामुळे यावर्षी शेतकºयांची आर्थिक घडी विस्कटली आहे. परिणामी इतर खर्च व विद्युत देयके भरणे शेतकºयांना अवघड झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य व शेतकरी वर्ग महावितरणच्या थकबाकीदारांच्या यादीत मोडला आहे.   परंतू थकित वीजबिले भरण्यासाठी ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत नाही. दुष्काळी परिस्थितीत विद्युत देयके भरण्यासाठी महावितरणकडून तगादा लावला जात असल्याने महावितरणचे कर्मचारी व ग्राहक यांच्यामध्ये वादाच्या घटना समोर येत आहेत. यासंदर्भात महावितरणच्या अधिकाºयांशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही. हल्ल्याने महावितरणच्या कर्मचाºयांमध्ये खळबळथकबाकी वसुलीस गेलेल्या महावितरणच्या पथकातील संदिप गव्हांदे यांच्यावर दोन दिवसांपूर्वी मेहकर तालुक्यात गोहोगाव दांदडे येथे हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामुळे महावितरणच्या कर्मचाºयांमध्ये खळबळ उडाली आहे. तर इतर कर्मचाºयांमध्येही वसुलीसाठी जाण्याची भीती निर्माण झाली आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाmahavitaranमहावितरण