शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

दुष्काळात महावितरणच्या वसुलीचा ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 18:47 IST

बुलडाणा:  मार्च एंन्डीगच्या तोंडावर थकबाकी वसूलीसाठी गावोगावी महावितरणचे पथक सध्या फिरत आहे. परंतू दुष्काळात महावितरणच्या वसुलीचा शेतकरी व सर्वसामान्य ग्राहकांना ‘शॉक’ बसत आहे

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा:  मार्च एंन्डीगच्या तोंडावर थकबाकी वसूलीसाठी गावोगावी महावितरणचे पथक सध्या फिरत आहे. परंतू दुष्काळात महावितरणच्या वसुलीचा शेतकरी व सर्वसामान्य ग्राहकांना ‘शॉक’ बसत आहे. परिणामस्वरूप कर्मचारी व ग्राहकांमध्ये वाद वाढत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिवे यासह शासकीय कार्यालय व इतर सार्वजनिक ठिकाणचे लाखो रुपयांचे वीज देयक थकलेले आहे. थकीत वीजबिलांचा भरणा न करणाºया ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने १ मार्चपासून तीव्र केली आहे. वीजबिलांच्या थकबाकीचे प्रमाण वाढल्यामुळे महावितरणला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दरमहा वीजबिलांसह वीजग्राहकांकडे असलेल्या थकबाकीची वसुली करण्यासाठी महावितरणने धडक मोहीम सुरू केली आहे.   महावितरणच्या वरीष्ठ अधिकाºयांसह सर्व अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, क्षेत्रीय अभियंत्यांनी वसुली व थकबाकीदारांकडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे. परंतू सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने सर्वसामान्य ग्राहकांसह शेतकरी वर्गही थकबाकी भरू शकत नाहीत. त्यामुळे महाविरतणला या वसूली मोहीमेत मोठ्या अडचणी येत आहेत. जिल्ह्याचे अर्थचक्र हे शेतीवर अवलंबुन आहे. परंतू अत्यल्प पर्जन्यमानामुळे शेतकºयांना शेतीतील उत्पादनात मोठा फटका बसला. त्यामुळे यावर्षी शेतकºयांची आर्थिक घडी विस्कटली आहे. परिणामी इतर खर्च व विद्युत देयके भरणे शेतकºयांना अवघड झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य व शेतकरी वर्ग महावितरणच्या थकबाकीदारांच्या यादीत मोडला आहे.   परंतू थकित वीजबिले भरण्यासाठी ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत नाही. दुष्काळी परिस्थितीत विद्युत देयके भरण्यासाठी महावितरणकडून तगादा लावला जात असल्याने महावितरणचे कर्मचारी व ग्राहक यांच्यामध्ये वादाच्या घटना समोर येत आहेत. यासंदर्भात महावितरणच्या अधिकाºयांशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही. हल्ल्याने महावितरणच्या कर्मचाºयांमध्ये खळबळथकबाकी वसुलीस गेलेल्या महावितरणच्या पथकातील संदिप गव्हांदे यांच्यावर दोन दिवसांपूर्वी मेहकर तालुक्यात गोहोगाव दांदडे येथे हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामुळे महावितरणच्या कर्मचाºयांमध्ये खळबळ उडाली आहे. तर इतर कर्मचाºयांमध्येही वसुलीसाठी जाण्याची भीती निर्माण झाली आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाmahavitaranमहावितरण