पीक विमा काढण्यात कनेक्टिव्हिटीचा खोडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:01 IST2017-08-02T23:47:30+5:302017-08-03T00:01:53+5:30

बुलडाणा : शेतमालाचा पीक विमा काढण्याकरिता शेतकरी बँकांमध्ये गर्दी करीत आहेत. मात्र, बँकांमध्ये कनेक्टिव्हिटी नसल्याने शेतकºयांना दिवसभर रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

Dump connectivity to remove crop insurance! | पीक विमा काढण्यात कनेक्टिव्हिटीचा खोडा!

पीक विमा काढण्यात कनेक्टिव्हिटीचा खोडा!

ठळक मुद्देबँकांमध्ये लागल्या रांगाशेतकरी ताटकळतपीक विम्यापेक्षा प्रवासाचा खर्च अधिक

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शेतमालाचा पीक विमा काढण्याकरिता शेतकरी बँकांमध्ये गर्दी करीत आहेत. मात्र, बँकांमध्ये कनेक्टिव्हिटी नसल्याने शेतकºयांना दिवसभर रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.
यावर्षी पीक विमा काढताना शेतकºयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीला शासनाने आॅनलाइन पीक विमा काढण्याची अट घातली. आॅनलाइन पीक विमा काढणे शेतकºयांना शक्य झाले नाही. त्यामुळे शासनाने या निर्णयामध्ये बदल करीत पूर्वीप्रमाणेच आॅफलाइन विमा काढण्याचा आदेश दिला. मात्र, सदर आदेश मुदत संपण्याच्या दोन दिवसांपूर्वीच देण्यात आल्याने शेतकरी पीक विमा काढण्यापासून वंचित राहिले. त्यानंतर शासनाने ५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिल्याने बुधवारी जिल्ह्यातील अनेक शेतकरी बँकांमध्ये पीक विमा काढण्याकरिता गोळा झाले. बँकेत रांगा लावल्यानंतर कनेक्टिव्हिटीच नसल्याने शेतकºयांना तासन्तास ताटकळत बसावे लागले. प्रत्येक बँकेत बुधवारी मोठ्या प्रमाणात कनेक्टिव्हिटीची समस्या निर्माण झाली. त्यामुळे अखेरीस बँकेच्या रांगेत असलेल्या अनेक शेतकºयांना विमा न काढताच परत जावे लागले. जिल्ह्यात ग्रामीण भागात राहणारे शेतकरी पैसे खर्च करून बँकेत विमा काढण्याकरिता आले. मात्र, कनेक्टिव्हिटीअभावी त्यांना परत जावे लागले. त्यामुळे शेतकºयांना नाहक आर्थिक भुर्दंड बसला आहे.

पीक विम्यापेक्षा प्रवासाचा खर्च अधिक
शेतकºयांना ग्रामीण भागातून शहरातील बँकांमध्ये पीक विमा काढण्याकरिता यावे लागते. त्यानंतर कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे पुन्हा दुसºया दिवशी यावे लागते. त्यामुळे शेतकºयांना एका पिकाचा विमा काढण्यापेक्षा गावातून शहरात ये - जा करण्याचा प्रवास खर्चच अधिक करावा लागत आहे.

अनेक बँकांमध्ये कनेक्टिव्हिटी नसल्याने शेतकरी पीक विम्यापासून बुधवारी वंचित राहिले. गावावरून पैसे खर्च करून शेतकरी बँकेत येतात. मात्र, येथे त्यांना कनेक्टिव्हिटीमुळे तासन्तास ताटकळत बसावे लागते. तसेच काही बँकेचे अधिकारी त्यांना पीक विमा मुदतवाढीचा अध्यादेशच मिळाला नसल्याचे कारण सांगून शेतकºयांना परत पाठवित आहेत. वरिष्ठांनी याची त्वरित दखल घेण्याची गरज आहे.
- लखन गाडेकर
किसान सेना, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना.

Web Title: Dump connectivity to remove crop insurance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.