शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पाण्याअभावी दसरखेड 'एमआयडीसीती'ल उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 13:33 IST

पाण्याअभावी दसरखेड एमआयडीसी परिक्षेत्रातील 'एमआयडीसीती'ल उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.  

  - मनोज पाटीलमलकापूर :  मलकापूर तालुक्यात पाणी टंचाईचे सावट असून, पाण्याअभावी दसरखेड एमआयडीसी परिक्षेत्रातील 'एमआयडीसीती'ल उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.  

          वाढत्या तापमानामुळे जलसाठयातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत चालले आहे. मानवी जिवा सोबतच जनावरांनाही पाणी टंचाईचे तीव्र चटके सहन करावे लागत आहेत. अशा पाणी- बाणी च्या परिस्थितीत एमआयडीसीतील उद्योग धंदे सुध्दा बंद पडण्याच्या मार्गावर येऊन ठेपले आहेत. 

           एमआयडीसी परिक्षेत्रात सद्यस्थितीत 25 ते 27 उद्योग सुरू असुन  यामध्ये सर्वाधिक पाण्याची गरज ही पुठठा  कारखाना, केमिकल कंपनी व बिर्ला  काॅटसीन आदी कंपन्यांना पडते. त्यामध्ये 7 क्राफ्ट पेपर व पेपर मिल, 3 केमिकल तर 1 टेक्स्टाईल्स कंपनी आहे. या कंपन्यांच्या  संपूर्ण उत्पादनात पाणी हा अविभाज्य घटक आहे. 

          पूर्णा  नदी पात्रातुन वाघोळा सबस्टेशन वरील जॅकवेल अंतर्गत या कंपन्यांना पाणी पुरवठा होत असतो. परंतु सद्यस्थितीत या उद्योगांना पाणी टंचाई ची चांगलीच झळ बसू लागली आहे. 15 दिवसाआधी वाघोळा सब स्टेशन वरील जॅकवेल मध्ये 11 टक्के पाणी होते. तर आठ दिवस आधी हतनूर धरणाचे दरवाजे उघडल्याने येथील पाणी पुढे तापी नदीच्या पात्रात वाहून गेले.

           सद्यस्थितीत येथे केवळ 2 टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. केवळ हतनूर धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे या जलसाठ्यातील जल अत्यंत कमी झाले. त्यामुळे उपलब्ध असलेल्या 2 टक्के पाण्यावर आता उद्योग कसा करायचा हा मोठा गंभीर प्रश्न उद्योजकांसमोर ठाण मांडून बसला आहे. तर उद्योग बंद पडल्यास या कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या तब्बल 2 हजार कामगारांच्या रोजगाराचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

             उद्योग बंद पडले तर शासनाचेही जीएसटी कराचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे या समस्येकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी सह जिल्हाधिकारी व एमआयडीसी प्रशासनाने सुध्दा तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. तर पावसाळ्यापर्यंत किमान आता तरी हतनूर धरणाचे दरवाजे उघडल्या जाऊ नये. त्याचप्रमाणे एमआयडीसी चे पंपिंग जॅकवेल समोरून पुढे दोन किमी अंतरावर पाणी अडविणे करिता कोल्हापुरी बंधारा बांधल्या जाणेही तेवढेच गरजेचे झाले आहे.

             जेणेकरून येथे पावसाळ्यातील पाणी साठवून पाण्याची पातळी जैसे थे राहण्यास मदत होऊ शकते त्याचप्रमाणे अशा पाणी-बाणीच्या परिस्थितीत उद्योग सुरू राहण्याकरिता प्रत्येक उद्योजकाला प्रशासनाने त्या -त्या कंपनीत बोअर करण्याची परवानगी देणे आवश्यक झाले आहे किंबहुना तशी मागणीसुद्धा उद्योजकांकडून समोर येऊ लागली आहे . 

  यापुढे किमान उन्हाळाभर तरी हातनूर चे दरवाजे उघडल्या जाऊ नये जेणेकरून उपलब्ध असलेला पाणीसाठा तरी जैसे थे राहील. तसेच पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आता शासन प्रशासनाकडून त्यादृष्टीने कायमस्वरूपी उपाय योजनांची येथे नितांत झाली आहे.

- शेखर धरणगावकर, सचिव, एमआयडीसी असोसिएशन, दसरखेड 

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरwater scarcityपाणी टंचाईMIDCएमआयडीसी