शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

पाण्याअभावी दसरखेड 'एमआयडीसीती'ल उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 13:33 IST

पाण्याअभावी दसरखेड एमआयडीसी परिक्षेत्रातील 'एमआयडीसीती'ल उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.  

  - मनोज पाटीलमलकापूर :  मलकापूर तालुक्यात पाणी टंचाईचे सावट असून, पाण्याअभावी दसरखेड एमआयडीसी परिक्षेत्रातील 'एमआयडीसीती'ल उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.  

          वाढत्या तापमानामुळे जलसाठयातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत चालले आहे. मानवी जिवा सोबतच जनावरांनाही पाणी टंचाईचे तीव्र चटके सहन करावे लागत आहेत. अशा पाणी- बाणी च्या परिस्थितीत एमआयडीसीतील उद्योग धंदे सुध्दा बंद पडण्याच्या मार्गावर येऊन ठेपले आहेत. 

           एमआयडीसी परिक्षेत्रात सद्यस्थितीत 25 ते 27 उद्योग सुरू असुन  यामध्ये सर्वाधिक पाण्याची गरज ही पुठठा  कारखाना, केमिकल कंपनी व बिर्ला  काॅटसीन आदी कंपन्यांना पडते. त्यामध्ये 7 क्राफ्ट पेपर व पेपर मिल, 3 केमिकल तर 1 टेक्स्टाईल्स कंपनी आहे. या कंपन्यांच्या  संपूर्ण उत्पादनात पाणी हा अविभाज्य घटक आहे. 

          पूर्णा  नदी पात्रातुन वाघोळा सबस्टेशन वरील जॅकवेल अंतर्गत या कंपन्यांना पाणी पुरवठा होत असतो. परंतु सद्यस्थितीत या उद्योगांना पाणी टंचाई ची चांगलीच झळ बसू लागली आहे. 15 दिवसाआधी वाघोळा सब स्टेशन वरील जॅकवेल मध्ये 11 टक्के पाणी होते. तर आठ दिवस आधी हतनूर धरणाचे दरवाजे उघडल्याने येथील पाणी पुढे तापी नदीच्या पात्रात वाहून गेले.

           सद्यस्थितीत येथे केवळ 2 टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. केवळ हतनूर धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे या जलसाठ्यातील जल अत्यंत कमी झाले. त्यामुळे उपलब्ध असलेल्या 2 टक्के पाण्यावर आता उद्योग कसा करायचा हा मोठा गंभीर प्रश्न उद्योजकांसमोर ठाण मांडून बसला आहे. तर उद्योग बंद पडल्यास या कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या तब्बल 2 हजार कामगारांच्या रोजगाराचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

             उद्योग बंद पडले तर शासनाचेही जीएसटी कराचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे या समस्येकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी सह जिल्हाधिकारी व एमआयडीसी प्रशासनाने सुध्दा तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. तर पावसाळ्यापर्यंत किमान आता तरी हतनूर धरणाचे दरवाजे उघडल्या जाऊ नये. त्याचप्रमाणे एमआयडीसी चे पंपिंग जॅकवेल समोरून पुढे दोन किमी अंतरावर पाणी अडविणे करिता कोल्हापुरी बंधारा बांधल्या जाणेही तेवढेच गरजेचे झाले आहे.

             जेणेकरून येथे पावसाळ्यातील पाणी साठवून पाण्याची पातळी जैसे थे राहण्यास मदत होऊ शकते त्याचप्रमाणे अशा पाणी-बाणीच्या परिस्थितीत उद्योग सुरू राहण्याकरिता प्रत्येक उद्योजकाला प्रशासनाने त्या -त्या कंपनीत बोअर करण्याची परवानगी देणे आवश्यक झाले आहे किंबहुना तशी मागणीसुद्धा उद्योजकांकडून समोर येऊ लागली आहे . 

  यापुढे किमान उन्हाळाभर तरी हातनूर चे दरवाजे उघडल्या जाऊ नये जेणेकरून उपलब्ध असलेला पाणीसाठा तरी जैसे थे राहील. तसेच पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आता शासन प्रशासनाकडून त्यादृष्टीने कायमस्वरूपी उपाय योजनांची येथे नितांत झाली आहे.

- शेखर धरणगावकर, सचिव, एमआयडीसी असोसिएशन, दसरखेड 

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरwater scarcityपाणी टंचाईMIDCएमआयडीसी