शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी दसरखेड 'एमआयडीसीती'ल उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 13:33 IST

पाण्याअभावी दसरखेड एमआयडीसी परिक्षेत्रातील 'एमआयडीसीती'ल उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.  

  - मनोज पाटीलमलकापूर :  मलकापूर तालुक्यात पाणी टंचाईचे सावट असून, पाण्याअभावी दसरखेड एमआयडीसी परिक्षेत्रातील 'एमआयडीसीती'ल उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.  

          वाढत्या तापमानामुळे जलसाठयातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत चालले आहे. मानवी जिवा सोबतच जनावरांनाही पाणी टंचाईचे तीव्र चटके सहन करावे लागत आहेत. अशा पाणी- बाणी च्या परिस्थितीत एमआयडीसीतील उद्योग धंदे सुध्दा बंद पडण्याच्या मार्गावर येऊन ठेपले आहेत. 

           एमआयडीसी परिक्षेत्रात सद्यस्थितीत 25 ते 27 उद्योग सुरू असुन  यामध्ये सर्वाधिक पाण्याची गरज ही पुठठा  कारखाना, केमिकल कंपनी व बिर्ला  काॅटसीन आदी कंपन्यांना पडते. त्यामध्ये 7 क्राफ्ट पेपर व पेपर मिल, 3 केमिकल तर 1 टेक्स्टाईल्स कंपनी आहे. या कंपन्यांच्या  संपूर्ण उत्पादनात पाणी हा अविभाज्य घटक आहे. 

          पूर्णा  नदी पात्रातुन वाघोळा सबस्टेशन वरील जॅकवेल अंतर्गत या कंपन्यांना पाणी पुरवठा होत असतो. परंतु सद्यस्थितीत या उद्योगांना पाणी टंचाई ची चांगलीच झळ बसू लागली आहे. 15 दिवसाआधी वाघोळा सब स्टेशन वरील जॅकवेल मध्ये 11 टक्के पाणी होते. तर आठ दिवस आधी हतनूर धरणाचे दरवाजे उघडल्याने येथील पाणी पुढे तापी नदीच्या पात्रात वाहून गेले.

           सद्यस्थितीत येथे केवळ 2 टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. केवळ हतनूर धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे या जलसाठ्यातील जल अत्यंत कमी झाले. त्यामुळे उपलब्ध असलेल्या 2 टक्के पाण्यावर आता उद्योग कसा करायचा हा मोठा गंभीर प्रश्न उद्योजकांसमोर ठाण मांडून बसला आहे. तर उद्योग बंद पडल्यास या कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या तब्बल 2 हजार कामगारांच्या रोजगाराचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

             उद्योग बंद पडले तर शासनाचेही जीएसटी कराचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे या समस्येकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी सह जिल्हाधिकारी व एमआयडीसी प्रशासनाने सुध्दा तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. तर पावसाळ्यापर्यंत किमान आता तरी हतनूर धरणाचे दरवाजे उघडल्या जाऊ नये. त्याचप्रमाणे एमआयडीसी चे पंपिंग जॅकवेल समोरून पुढे दोन किमी अंतरावर पाणी अडविणे करिता कोल्हापुरी बंधारा बांधल्या जाणेही तेवढेच गरजेचे झाले आहे.

             जेणेकरून येथे पावसाळ्यातील पाणी साठवून पाण्याची पातळी जैसे थे राहण्यास मदत होऊ शकते त्याचप्रमाणे अशा पाणी-बाणीच्या परिस्थितीत उद्योग सुरू राहण्याकरिता प्रत्येक उद्योजकाला प्रशासनाने त्या -त्या कंपनीत बोअर करण्याची परवानगी देणे आवश्यक झाले आहे किंबहुना तशी मागणीसुद्धा उद्योजकांकडून समोर येऊ लागली आहे . 

  यापुढे किमान उन्हाळाभर तरी हातनूर चे दरवाजे उघडल्या जाऊ नये जेणेकरून उपलब्ध असलेला पाणीसाठा तरी जैसे थे राहील. तसेच पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आता शासन प्रशासनाकडून त्यादृष्टीने कायमस्वरूपी उपाय योजनांची येथे नितांत झाली आहे.

- शेखर धरणगावकर, सचिव, एमआयडीसी असोसिएशन, दसरखेड 

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरwater scarcityपाणी टंचाईMIDCएमआयडीसी