‘जलयुक्त’मुळे विहिरींना नवसंजीवनी
By Admin | Updated: July 6, 2015 01:48 IST2015-07-06T01:48:50+5:302015-07-06T01:48:50+5:30
साखरखेर्डा परिसरात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सात बंधा-यांची कामे पूर्ण.

‘जलयुक्त’मुळे विहिरींना नवसंजीवनी
सिंदखेडराजा (जि. बुलडाणा): तालुक्यातील साखरखेर्डा परिसरात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत १७ बंधार्यांचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्याने परिसरातील सुमारे १00 हेक्टर शेती पाण्याखाली येत असून, परिसरातील विहिरींनाही जलयुक्त शिवारामुळे संजीवनी मिळत आहे. तालुका कृषी कार्यालयाच्यावतीने साखरखेर्डा येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या मृद व जलसंधारण कामाची पाहणी करण्यासाठी शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. शिवार फेरीमध्ये साखरखेर्डा येथे जलयुक्त शिवार अभियान २0१५ अंतर्गत झालेल्या कामाची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये सिमेंट, बांध, खोलीकरण व रुंदीकरणाची १३ कामे, ढाळीचे बंधारे तसेच गायखेडी तलावामधून शेतकर्यांनी ५६ हजार घनमिटर गाळ काढण्यात आला. या सर्व उपक्रमातून जवळपास ५१३ टीएमसी पाणी अडविले गेले. त्यामुळे विहिरीच्या पाणीपातळीत वाढ झाली. तलावातील गाळ काढून जमिनीची सुपीकता वाढण्याला मदत होते. जलयुक्त शिवार अभियानाच्या पाहणीदरम्यान उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन केले. तसेच शासन राबवित असलेल्या या जलयुक्त शिवार योजनेत लोकसहभाग महत्त्वाचा असल्याने डॉ. सचिन खल्लाळ यांनी सांगितले. दरम्यान, जलयुक्त शिवार अभियानात प्रकल्प व्यवस्थापक आयुक्त आर.जे. भोसले पुणे, उपविभागीय कृषी अधिकारी बी.यू. बनसोड यांनी मार्गदर्शन केले.