रोहित्र जळाल्याने सात गावांत पाणीटंचाई

By Admin | Updated: October 12, 2015 01:21 IST2015-10-12T01:21:05+5:302015-10-12T01:21:05+5:30

नांदुरा तालुक्यातील सात गावातील नागरिक पाणी पुरवठय़ाअभावी १५ दिवसांपासून त्रस्त.

Due to the burning of Rohit, water shortage in seven villages | रोहित्र जळाल्याने सात गावांत पाणीटंचाई

रोहित्र जळाल्याने सात गावांत पाणीटंचाई

नांदुरा (जि. बुलडाणा) : महावितरण कंपनीच्या शेंबा येथील कार्यालय अंतर्गत येणार्‍या कंडारी येथील ट्रान्सफॉर्मर जळाल्याने परिसरातील सात गावांचा पाणीपुरवठा १५ दिवसापासून बंद आहे. परिणामी नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. कंडारी प्रकल्पातील विहिरीवरून १४ हजार लोकसंख्येच्या सात गावांना पाणीपुरवठा होतो. तथापि, रोहित्र जळाल्याने तरवाडी, पोटा, खैरा, जवळा बाजार, बेलुरा, फुली, पिंप्री आढाव या गावांचा पाणीपुरवठा बंद आहे. पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिक शिवारातील विहिरींवरून पाणी आणत आहेत. महावितरणकडे तोंडी तक्रारी झाल्या असून, तरवाडी ग्रामपंचायतीने याबाबत लेखी स्वरूपात तक्रार दिलेली आहे. दरम्यान, नवीन रोहित्र मलकापूर कार्यालयातून दोन दिवसांत येत आहे; ते त्वरेने बसविण्यात येईल, असे कनिष्ठ अभियंता आर. टी. वानखडेंनी सांगितले.

Web Title: Due to the burning of Rohit, water shortage in seven villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.