शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

भेगाळलेली धरणी माता खुणावते दुष्काळाची दाहकता            

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 17:41 IST

बुलडाणा: जिल्ह्यात धरण, तलावांची भेगाळली धरणी माता दुष्काळाची दाहकता खुणावत आहे.

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: जिल्ह्यात धरण, तलावांची भेगाळली धरणी माता दुष्काळाची दाहकता खुणावत आहे. गावोगावी पाणी प्रश्न पेटला असून, अनेकांच्या हाताला कामी नाही. त्यामुळे विकतच्या पाण्यासाठीही घरात पैसे उपलब्ध होत नाहीत. असे विदारक चित्र अनेक गावांमध्ये सध्या पाहावयास मिळत आहे. तर मेहकर, लोणार तालुक्यातील काही गावातील ८० ते ९० टक्के लोक रोजगाराच्या शोधात स्थलांतरीत झाले आहेत. दुष्काळाच्या दाहकतेत सर्वसामान्य होरपळून निघत असताना  मजुरांच्या हातालाही काम मिळेनासे झाले आहे. त्यामुळे कामाच्या शोधात जिल्ह्यातील मजुरांचे परजिल्ह्यात स्थलांतर वाढले आहे. जिल्ह्यातील काही गावांच्या  नशिबी कायम आर्थिक, सामाजिक आणि नैसर्गिक मागासलेपण पाचवीला पुजले आहे. घरी अत्यल्प एक ते दोन एकर शेती, त्यात निसर्गाची अवकृपा. यामुळे शेतीतील उत्पादनासाठी खर्चच अधिक होत असल्याने तोट्यात जाणाºया शेतीला कंटाळून अनेकांनी मजुरी सुरू केली; परंतु मजुरीसाठी गावातच नव्हे, तर परिसरातही कुठे काम मिळत नसल्याचे भयावह जिल्ह्यातील काही गावांमध्ये आहे. जिल्ह्यातील गोत्रा, नांद्रा, रायगाव, मढी, पहुर, दाभा, खुरामपूर, टिटवी व इतर गावातील आदिवासी कुटुंब बाहेरगावी जाऊन काम करीत आहे. लोणार तालुक्यातील टिटवी या गावी मजुरांना हाताला काम नसल्याने परजिल्ह्यात मजुरांचे स्थलांतर वाढले आहे. जवळपास टिटवी येथील ८० ते ८५ टक्के लोक रोजागाराच्या शोधात बाहेरगावी गेलेले आहेत. जिल्ह्यात रोजगार हमी योजनेशिवाय कुठलीच कामे होत नाहीत; परंतु रोहयोच्या कामावरही मजुरांऐवजी जेसीबीचा वापर होत आहे. त्यामुळे स्थानिक मजुरांच्या हाताला काम मिळेल, अशी कुठलीच उपाययोजना शासनाकडून केली जात नाही. त्यात आता पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. धरण, तलावांनी तळ गाठल्याचे दिसून येते आहे. पाणी पुरवठा निवारणार्थ उपाययोजनांसाठी जिल्ह्यात टँकरची संख्या वाढतच आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १९९ गावांतील लाखो नागरिकांची तहान सुमारे २०६ टँकरद्वारे भागविण्यात येत आहे. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यातील २३ गावांसाठी २४ टँकर, चिखली तालुक्यातील १४ गावांसाठी १५ टँकर, देऊळगाव राजा तालुक्यातील २७ गावात २८ टँकर, लोणार तालुक्यातील आठ गावात ११ टँकर, मेहकर तालुक्यात १४, मोताळा १८, मलकापूर ५, नांदुरा १९, शेगाव २२, खामगाव २९, संग्रापूर एक अशा प्रकरे एकूण २०६ टँकर सुरू करण्यात आले आहेत. 

 लोणार शहराला होणारा पाणीपुरवठा काळेपाणी गायखेड व इतर ठिकाणाहून होणारा पाणीपुरवठा कमी होत आहे.  त्यामुळे शहरवासीयांना व सर्वसामान्य जनतेला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहरामध्ये खासगी टँकरद्वारे पाण्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. - हाजी मोहम्मद रिजवान, लोणार. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाdroughtदुष्काळ