शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

जिल्ह्यात पीक विम्याचे १४.१६ कोटी रुपये वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 4:37 AM

पंचायत राज समिती अध्यक्ष तथा आ. संजय रायमूलकर यांनी जिल्ह्यातील पीक विमा योजनेबाबत अधिवेशनात शुक्रवारी प्रश्न मांडला होता. खरीप ...

पंचायत राज समिती अध्यक्ष तथा आ. संजय रायमूलकर यांनी जिल्ह्यातील पीक विमा योजनेबाबत अधिवेशनात शुक्रवारी प्रश्न मांडला होता. खरीप हंगाम २०२० मध्ये जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत करण्यात आली. जिल्ह्यातील २.९५ लाख शेतकऱ्यांनी २२.०८ कोटी रक्कम विमा हफ्ता भरला. २.२६ लाख हेक्टर क्षेत्र पिकांकरिता संरक्षित करण्यात आले होते. योजनेंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती झालेले नुकसान या बाबींतर्गत एकूण १४ हजार ३४३ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम १४.१६ कोटी रुपये विमा कंपनीमार्फत वाटप करण्यात आली. काढणी पश्चात नुकसान भरपाई या बाबींतर्गत १३१८ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम ०.९० कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. इतर रक्कम वाटपाची कार्यवाही सुरू आहे. विमा कंपनीकडून प्राप्त अंतरिम अहवालानुसार उत्पन्नावर आधारित ८ हजार २८४ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम १.२४ कोटी रुपये निश्चित करण्यात आली असून वाटप कंपनीस्तरावर सुरू आहे. मेहकर तालुक्यातील एकाच गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना समान रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांनी १५ डिसेंबरला तालुका कृषी अधिकारी यांना घेराव घातला होता. ही बाब भुसे यांनी मान्य केली. तालुक्यातील पीक विमा योजनेमध्ये २७ हजार १ शेतकऱ्यांनी १.८७ कोटी रुपये विमा हफ्ता भरला होता. २० हजार ८१७ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे. योजनेंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती झालेले नुकसान या बाबींतर्गत २ हजार ७३३ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम ३.६८ कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे. इतर शेतकऱ्यांना वाटप सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.