शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मोदींच्या पराभवाची चर्चा चहाच्या टपरीवरून होईल : शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2018 17:27 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा परभाव का झाला? याची चर्चा चहाच्याच टपरीवर करताना दिसतील

देऊळगाव मही (जि. बुलडाणा) : ज्यांनी चहाचं भांडवल करून जनसामान्यांना फसवले तीच मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा परभाव का झाला? याची चर्चा चहाच्याच टपरीवर करताना दिसतील, अस भाकीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी देऊळगाव मही येथे केले. स्वत:ला गांधीवादी व लोकशाहीचे पुजारी म्हणवणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्यांच्या प्रश्नासाठी अधिवेशन बोलावण्याची आमची मागणी मान्य करावीअसे सांगत शेतकर्यांनी त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी निकराने लढा द्यावा. २०१९ ची निवडणूक जात-धर्मावर लढणार्या हिसका दाखवा, असे आवाहनही खा. राजू शेट्टी यांनी पुढे बोलताना केले.

महाराष्ट्र दिनापासून धुळे जिल्ह्यातील वखरण येथून ही ‘शेतकरी सन्मान यात्रा’ सुरू झाली असून पाच मे रोजी रात्री ती देऊळगाव मही येथे पोहोचलीहोती.  त्यावेळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, कवी ज्ञानेश वाकुडकर,युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडगूले, महिला प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे, घनशाम चौधरी, माणिकराव कदम, गजानन बंगाळे पाटील, राज्य उपाध्यक्ष सयाजीमोरे, अमोल हिप्परगे, अनिल पवार, राज्य उपाध्यक्षा शर्मीला येवले, बबनराव चेके यांच्यासह अन्य उपस्थित होते.

ही लढाई परिवर्तनाची असून नेतृत्व स्थापन करण्याची नाही. शेतकर्यावर आलेली ही वेळ सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आली आहे. सरकारचे आयात धोरण हे  शेतकर्यांसाठी मारक ठरत आहे. स्वामीनाथ आयोगाची शिफारस स्वीकरली असती तर वेतन आयोगाप्रमाणे सरकारला फरक द्यावा लागला असता. जीएसटी, नोटबंदीचा शेतकर्यानां फटका बसला आहे. शेतकर्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी १९३ संघटना एकत्र आल्या असून शेतकरी प्रश्नावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणीसाठी दहा मे रोजी राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक लाख सह्यांचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीNarendra Modiनरेंद्र मोदी