डायरियाचे थैमान; ८0 रुग्णांवर उपचार सुरू
By Admin | Updated: June 21, 2014 00:01 IST2014-06-20T23:02:43+5:302014-06-21T00:01:01+5:30
धाड येथील ग्रामीण रूग्णालयामध्ये डायरियाचे ८0 रुग्ण भरती; नागरिकांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन

डायरियाचे थैमान; ८0 रुग्णांवर उपचार सुरू
धाड : गेल्या तीन दिवसांपासून डायरियाने धाडवासीयांना हैराण केले असून, आजही येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची रीघ कायम होती. गत दोन दिवसात निर्माण झालेल्या परिस्थितीने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने गावात ठिकठिकाणी पाण्याचे नमुने घेण्यात आले. यात सर्व नमुने दूषित असल्याचे आढळून आले. त्यामुळे नागरिकांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन करण्यात आले.
आज दुपारपर्यंत येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये ८0 रुग्ण भरती होते तर बहुतांश प्रमाणात रुग्णांना औषधोपचार करण्यात आले होते. एकंदरीत आज रुग्णसंख्येत घट झाल्याचे आढळून आले. आरोग्य विभागामार्फत गावातील विविध भागातून गेल्या दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पाणी नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून, ते पाणी पिण्यास अयोग्य असल्याची माहिती मिळाली आहे. तर स्थानिक ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा करणार्या विहिरींचे पाणी नमुने घेऊन ते तपासणीस रवाना केल्याची माहिती आहे. या रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या रुग्णांपैकी १९ जून रोजी आरोग्य विभागाचे अधिकार्यांनी ६ रुग्णांचे स्टुल सॅम्पल (विष्ठा नमुने) घेऊन ते प्रयोगशाळेस तपासणीस पाठवले असता पैकी ३ रुग्णांचे नमुना तपासणी अंती तो ह्यकॉलराह्ण असल्याची माहिती याठिकाणी आरोग्य अधिकारी व कर्मचार्यांचे गुप्त चर्चेतून बाहेर आले; परंतु कोणीही याबाबत जाहीरपणे सांगण्यास नकार दिल्याने ही फक्त चर्चाच राहिली. तर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.साबीर खान यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, रुग्णांचे स्टुल सॅम्पल नमुने हे तपासणीस पाठवले असून, माझ्यापर्यंत त्याचा अहवाल प्राप्त झाला नाही. त्यामुळे तो कॉलरा आहे किंवा आणखी काय, हे निश्चितपणे सांगता येत नाही. याबाबत आरोग्य विभागाने त्या नमुन्यांचा अहवाल लवकर जाहीर करुन आरोग्य प्रशासनाच्यावतीने नागरिकांना योग्य आरोग्यसेवा देऊन या आजारावर नियंत्रण मिळवण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.