शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यातील शेतकरी आंदोलन दडपण्याच्या निषेधार्थ निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 01:12 IST

सोयाबीन कापूस व धानाला हमी भाव मिळावा, शेतकर्‍यांना त्वरित संपूर्ण कर्जमाफी  मिळावी या व इतर मागण्यांसाठी अकोला येथे लोकजागर मंचाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला  होता. या मोर्चाचे नेतृत्व करणारे माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा व स्वाभिमानी शेतकरी  संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी स्थानबद्ध केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी बुलडाणा  येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी शासनाचा निषेध व्यक्त करीत निदर्शने केली.

ठळक मुद्देयशवंत सिन्हा व रविकांत तुपकर यांना पोलिसांनी स्थानबद्ध केल्याचा निषेधचिखलीत सरकारच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: सोयाबीन कापूस व धानाला हमी भाव मिळावा, शेतकर्‍यांना त्वरित संपूर्ण कर्जमाफी  मिळावी या व इतर मागण्यांसाठी अकोला येथे लोकजागर मंचाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला  होता. या मोर्चाचे नेतृत्व करणारे माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा व स्वाभिमानी शेतकरी  संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी स्थानबद्ध केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी बुलडाणा  येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी शासनाचा निषेध व्यक्त करीत निदर्शने केली.सोयाबीन, कापूस व धानाला हमीभाव द्यावा, शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या व इतर  मागण्यांसाठी अकोला येथील शेतकरी जागर मंचाने ४ डिसेंबर २0१७ रोजी गांधी जवाहर बागेतून  मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्व माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा व  स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी केले. मोर्चानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी  जात असताना अकोला पोलिसांनी यशवंत सिन्हा व रविकांत तुपकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते  व शेतकर्‍यांना स्थानबद्ध केले. दरम्यान, मागण्या मान्य होईपर्यंत येथून हलणार नाही, अशी  आक्रमक भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्यांविरुद्ध धाकद पटशाही केली. पोलिसांच्या या कृतीचे तीव्र पडसाद उमटले असून, मंगवारी बुलडाणा जिल्हाधिकारी  कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्‍चिम विदर्भ प्रमुख राणा चंदन यांच्या नेतृत्वात  शासनाचा निषेध करून तीव्र निदर्शने केली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी  शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत झालेल्या प्रकाराचा निषेध केला. तसेच स्थानबद्ध करण्या त आलेल्या यशवंत सिन्हा, रविकांत तुपकर व शेतकर्‍यांची बिनशर्त सुटका करून शेतकर्‍यांच्या  मागण्या विनाविलंब मंजूर कराव्यात, अशी मागणी केली.शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य न केल्यास व यशवंत सिन्हा, रविकांत तुपकर व त्यांच्या सहकार्‍यांची  तातडीने सुटका न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून जिल्हाभर तीव्र  आंदोलन करेल, असा इशारा राणा चंद्रशेखर चंदन यांनी दिला. या आंदोलनामध्ये त्यांच्यासह श्याम अवथळे, शे. रफिक, शे. करीम, प्रदीप शेळके, महेंद्र  जाधव, पवन देशमुख, शे. वसीम, गंगाधर तायडे, अनिल पडोळ, अविनाश डुकरे, कडूबा मोरे,  अमिन खासाब, हरिभाऊ उबरहंडे, गजानन गवळी, रशीद पटेल, डॉ. भानुदास जगताप, शे.  साजिद, राजू पन्हाळकर, मुकुंदा शिंबरे, डिगंबर हुडेकर, दत्तात्रय राऊत, गुलाबराव काळवाघे,  मुश्कीन शाह, समाधान धंदर, शत्रुघ्न तुपकर, गोपाल जोशी, रमेश जाधव, रामेश्‍वर जाधव,  नारायण चंदेल, रामदास खसावत, विनोद कांबळे, गजानन पवार, धनंजय मुरकुटे, राहुल गाडे,  पंकज शेजोळे, शे. अजीज, संदीप तांगडे, गोटू जेऊघाले, रामेश्‍वर जाधव, गजानन जाधव,  पुरुषोत्तम तांगडे, सतीश नवले, पद्माकर गवई, मयूर सोनुने, जाबीर खान, नीलेश पुरभे, बाबुराव  सोनुने, अमोल मोरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.दरम्यान, स्थानबद्ध करण्यात आलेल्यांची त्वरेने सुटका न केल्यास तथा मागण्या मान्य न केल्यास  स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही देण्यात आला आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन