शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

अकोल्यातील शेतकरी आंदोलन दडपण्याच्या निषेधार्थ निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 01:12 IST

सोयाबीन कापूस व धानाला हमी भाव मिळावा, शेतकर्‍यांना त्वरित संपूर्ण कर्जमाफी  मिळावी या व इतर मागण्यांसाठी अकोला येथे लोकजागर मंचाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला  होता. या मोर्चाचे नेतृत्व करणारे माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा व स्वाभिमानी शेतकरी  संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी स्थानबद्ध केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी बुलडाणा  येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी शासनाचा निषेध व्यक्त करीत निदर्शने केली.

ठळक मुद्देयशवंत सिन्हा व रविकांत तुपकर यांना पोलिसांनी स्थानबद्ध केल्याचा निषेधचिखलीत सरकारच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: सोयाबीन कापूस व धानाला हमी भाव मिळावा, शेतकर्‍यांना त्वरित संपूर्ण कर्जमाफी  मिळावी या व इतर मागण्यांसाठी अकोला येथे लोकजागर मंचाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला  होता. या मोर्चाचे नेतृत्व करणारे माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा व स्वाभिमानी शेतकरी  संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी स्थानबद्ध केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी बुलडाणा  येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी शासनाचा निषेध व्यक्त करीत निदर्शने केली.सोयाबीन, कापूस व धानाला हमीभाव द्यावा, शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या व इतर  मागण्यांसाठी अकोला येथील शेतकरी जागर मंचाने ४ डिसेंबर २0१७ रोजी गांधी जवाहर बागेतून  मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्व माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा व  स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी केले. मोर्चानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी  जात असताना अकोला पोलिसांनी यशवंत सिन्हा व रविकांत तुपकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते  व शेतकर्‍यांना स्थानबद्ध केले. दरम्यान, मागण्या मान्य होईपर्यंत येथून हलणार नाही, अशी  आक्रमक भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्यांविरुद्ध धाकद पटशाही केली. पोलिसांच्या या कृतीचे तीव्र पडसाद उमटले असून, मंगवारी बुलडाणा जिल्हाधिकारी  कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्‍चिम विदर्भ प्रमुख राणा चंदन यांच्या नेतृत्वात  शासनाचा निषेध करून तीव्र निदर्शने केली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी  शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत झालेल्या प्रकाराचा निषेध केला. तसेच स्थानबद्ध करण्या त आलेल्या यशवंत सिन्हा, रविकांत तुपकर व शेतकर्‍यांची बिनशर्त सुटका करून शेतकर्‍यांच्या  मागण्या विनाविलंब मंजूर कराव्यात, अशी मागणी केली.शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य न केल्यास व यशवंत सिन्हा, रविकांत तुपकर व त्यांच्या सहकार्‍यांची  तातडीने सुटका न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून जिल्हाभर तीव्र  आंदोलन करेल, असा इशारा राणा चंद्रशेखर चंदन यांनी दिला. या आंदोलनामध्ये त्यांच्यासह श्याम अवथळे, शे. रफिक, शे. करीम, प्रदीप शेळके, महेंद्र  जाधव, पवन देशमुख, शे. वसीम, गंगाधर तायडे, अनिल पडोळ, अविनाश डुकरे, कडूबा मोरे,  अमिन खासाब, हरिभाऊ उबरहंडे, गजानन गवळी, रशीद पटेल, डॉ. भानुदास जगताप, शे.  साजिद, राजू पन्हाळकर, मुकुंदा शिंबरे, डिगंबर हुडेकर, दत्तात्रय राऊत, गुलाबराव काळवाघे,  मुश्कीन शाह, समाधान धंदर, शत्रुघ्न तुपकर, गोपाल जोशी, रमेश जाधव, रामेश्‍वर जाधव,  नारायण चंदेल, रामदास खसावत, विनोद कांबळे, गजानन पवार, धनंजय मुरकुटे, राहुल गाडे,  पंकज शेजोळे, शे. अजीज, संदीप तांगडे, गोटू जेऊघाले, रामेश्‍वर जाधव, गजानन जाधव,  पुरुषोत्तम तांगडे, सतीश नवले, पद्माकर गवई, मयूर सोनुने, जाबीर खान, नीलेश पुरभे, बाबुराव  सोनुने, अमोल मोरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.दरम्यान, स्थानबद्ध करण्यात आलेल्यांची त्वरेने सुटका न केल्यास तथा मागण्या मान्य न केल्यास  स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही देण्यात आला आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन