निर्णयांचा ‘एकनाथी पॅटर्न’ !
By Admin | Updated: January 11, 2015 00:17 IST2015-01-11T00:17:32+5:302015-01-11T00:17:32+5:30
दिवसभर एकाच हॉलमध्ये सर्व बैठका घेऊन तत्काळ निर्णय घेण्याचा ‘एकनाथी पॅटर्न’

निर्णयांचा ‘एकनाथी पॅटर्न’ !
राजेश शेगोकार /बुलडाणा
पालकमंत्री कमी अन् झेंडा मंत्री जास्त अशीच स्थिती कमी-अधिक फरकाने बुलडाण्याची राहिली आहे. महसूलसारखे दमदार खाते, मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीचा मान असलेल्या एकनाथ खडसे यांच्याकडे प्रथमच बुलडाणा जिल्ह्याचे पालकत्व आले आहे. पहिल्याच बैठकीसाठी जिल्ह्यात दाखल झालेल्या खडसे यांनी मुक्काम ठोकून अनेक प्रश्नांवर तत्काळ मार्ग काढला. त्यांनी घेतलेल्या मॅराथॉन बैठकांमुळे अधिकारीही प्रभावित झाले असून, या प्रत्येक निर्णयावर त्यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला. दिवसभर एकाच हॉलमध्ये सर्व बैठका घेऊन तत्काळ निर्णय घेण्याचा त्यांचा हा ह्यएकनाथी पॅटर्नह्ण सध्या जिल्ह्यात चर्चेचा आहे.
मलकापूर येथे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यांचे न्यायालय महिन्यातून १५ दिवस सुरू करण्याबाबत विधी व न्याय खात्याकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावाचा तत्काळ निपटारा केला. थेट संबंधित खात्याच्या सचिवांनाच दूरध्वनी करून मी घोषणा करू का, असा प्रश्न विचारून या न्यायालयालाही हिरवा कंदील मिळवला. असे अनेक निर्णय तडकाफडकी घेतले. नियोजन सभेत जिल्हा परिषद सदस्यांनाही धारेवर धरण्यास कमी केले नाही व अधिकार्यांनाही फटकारण्यास मागे-पुढे पाहिले नाही.
पालकमंत्री म्हणून त्यांनी सुरुवात छान केली. नागरिकांसोबतच अधिकारीही प्रभावित झाले; मात्र आता अपेक्षांची कमान वाढती राहील. नियोजन सभेत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी, शासनस्तरावर त्याचा होणारा पाठपुरावा याची सर्वच जबाबदारी त्यांच्यावर येऊन ठेपली आहे. जिगाव प्रकल्पांतर्गत भूसंपादनाचा झालेला निवाडा वादग्रस्त ठरला आहे. खुरकुंडी, टाकळी वतपाळ, पातोंडा आदी गावातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. खडकपूर्णा प्रकल्पाचे काम अपूर्ण आहे.
सिंदखेडराजा विकास आराखडा, लोणार सरोवर परिसराला विकसित करून हेरिटेजचा दर्जा, खामगाव जालना रेल्वे मार्गाचा प्रश्न, साखरखेर्डा, लाखनवाडा तालुक्यासह खामगाव जिल्ह्याची मागणी अशा अनेक प्रश्नांवर त्यांची कसोटी लागणार आहे. मंत्रिमंडळातील त्यांचे स्थान पाहता जिल्ह्याच्या अपेक्षा चुकीच्याही नाहीत. उद्या यदाकदाचित मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्याला मंत्रिपद मिळाले तरी त्यांच्यावरील अपेक्षांचे ओझे कमी होणार नाहीच, त्यामुळे त्यांच्या ह्यएकनाथीह्ण बैठकांचा पॅटर्नचे सातत्य जिल्ह्यातील रखडलेल्या प्रश्नांवरही कायम राहणे गरजचे आहे, असा पॅटर्न केवळ ह्यआरंभशूरह्ण ठरू नये इतकेच!