शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

महावितरणाच्या जनता दरबारात शेकडो तक्रारींचा फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 17:42 IST

बुलडाणा: येथील महावितरणच्या कार्यालयात २५ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या जनता दरबारामध्ये नागरिक, शेतकर्यांच्या शेकडो तक्रारींचा आॅन द स्पॉट फैसला करण्यात आला.

बुलडाणा: येथील महावितरणच्या कार्यालयात २५ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या जनता दरबारामध्ये नागरिक, शेतकऱ्यां च्या शेकडो तक्रारींचा आॅन द स्पॉट फैसला करण्यात आला. तब्बल पाच तास चाललेल्या या जनता दरबारामध्ये शेतकर्यांना वेठीस धराल तर याद राखा, अशी तंबीच खा. प्रतापराव जाधव यांनी अधिकार्यांना दिली. दरम्यान, शेतकरी व जनसामान्यांच्या सुविधेसाठी महावितरण आहे. त्यामुळे अधिकार्यांनी कौटुंबिक भावनेतून काम करून समस्या एैकणारे कान ठेवा, असे सुचक विधानही अधिकार्यांना उद्देशून केले. खा. प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखालीच हा जनता दरबार झाला. यावेळी आ. डॉ. संजय रायमुलकर, आ. डॉ. शशिकांत खेडेकर, बबनराव तुपे, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, शांताराम दाणे, अधिक्षक अभियंता गुलाबराव कडाळे, इन्फ्राचे अधिक्षक अभियंता बोरीकर, उपजिल्हा प्रमुख भोजराज पाटील, तालुका प्रमुख डॉ. मधुसूदन सावळे यांच्यासह अन्य उपस्थित होते. दरम्यान, पैसे भरूनही वीज जोडणी मिळत नाही, अधिकारी पैशाची मागणी करतात, अनधिकृत सब कॉन्ट्रॅक्टर नेमल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले, वीज भारनियमनाचा त्रास अशा स्वरुपाच्या अनेक तक्रारी या जनता दरबारात नागरिक, शेतकर्यांनी केल्या. दरम्यान, उपस्थित अनेक तक्रारींचा यावेळी आॅन द स्पॉट फैसला करण्यात आला. दुसरीकडे धडक सिंचन विहीरीवरील वीज जोडणीस प्राधान्य देणयाच्या सुचनाही खा. प्रतापराव जाधव यांनी यावेळी केल्या. नादुरुस्त वीज रोहीत्र त्वरेने दुरुस्त करण्याबाबतही त्यांनी सुचीत केले. पैशाची मागणी करणार्या एजंटाविरोधात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात अभियंत्यांना त्यांनी ताकीदच दिली.

१९ वर्षानंतर शेतकऱ्याला न्याय

देऊळगाव राजा तालुक्यातील सुरा येथील गबाजी लक्ष्मण चेके यांनी महावितरणकडे १२ जुलै १९९९ मध्ये वीज जोडणीसाठी कोटेशन भरले होते. पैसे भरल्याचीही पावती त्यांनी जनता दरबारात दाखवली. मात्र या शेतकर्याला १९ वर्षानंतरही वीज जोडणी मिळालेली नाही ही बाबत यावेळी समोर आली. त्यामुळे अधिकाऱ्यांना या मुद्द्यावर चांगलेच धारेवर धरण्यात आले. संबंधीत कंत्राटदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून अभियंत्याला निलंबीत करण्याचे निर्देशही देण्यात आले. त्यामुळे या शेतकर्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. येळगाव येथील शेतकर्याच्या शेतात दोन वर्षापासून पोल पडलेले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या शेतात हे पोल लगोलग उभे झाले पाहिजे, अशा सुचना खा. प्रतापराव जाधव यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यातील अन्य ठिकाणच्याही समस्याही या जनता दरबारात मार्गी लावण्यात आल्या.

टॅग्स :buldhanaबुलडाणाmahavitaranमहावितरण