शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

महावितरणाच्या जनता दरबारात शेकडो तक्रारींचा फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 17:42 IST

बुलडाणा: येथील महावितरणच्या कार्यालयात २५ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या जनता दरबारामध्ये नागरिक, शेतकर्यांच्या शेकडो तक्रारींचा आॅन द स्पॉट फैसला करण्यात आला.

बुलडाणा: येथील महावितरणच्या कार्यालयात २५ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या जनता दरबारामध्ये नागरिक, शेतकऱ्यां च्या शेकडो तक्रारींचा आॅन द स्पॉट फैसला करण्यात आला. तब्बल पाच तास चाललेल्या या जनता दरबारामध्ये शेतकर्यांना वेठीस धराल तर याद राखा, अशी तंबीच खा. प्रतापराव जाधव यांनी अधिकार्यांना दिली. दरम्यान, शेतकरी व जनसामान्यांच्या सुविधेसाठी महावितरण आहे. त्यामुळे अधिकार्यांनी कौटुंबिक भावनेतून काम करून समस्या एैकणारे कान ठेवा, असे सुचक विधानही अधिकार्यांना उद्देशून केले. खा. प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखालीच हा जनता दरबार झाला. यावेळी आ. डॉ. संजय रायमुलकर, आ. डॉ. शशिकांत खेडेकर, बबनराव तुपे, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, शांताराम दाणे, अधिक्षक अभियंता गुलाबराव कडाळे, इन्फ्राचे अधिक्षक अभियंता बोरीकर, उपजिल्हा प्रमुख भोजराज पाटील, तालुका प्रमुख डॉ. मधुसूदन सावळे यांच्यासह अन्य उपस्थित होते. दरम्यान, पैसे भरूनही वीज जोडणी मिळत नाही, अधिकारी पैशाची मागणी करतात, अनधिकृत सब कॉन्ट्रॅक्टर नेमल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले, वीज भारनियमनाचा त्रास अशा स्वरुपाच्या अनेक तक्रारी या जनता दरबारात नागरिक, शेतकर्यांनी केल्या. दरम्यान, उपस्थित अनेक तक्रारींचा यावेळी आॅन द स्पॉट फैसला करण्यात आला. दुसरीकडे धडक सिंचन विहीरीवरील वीज जोडणीस प्राधान्य देणयाच्या सुचनाही खा. प्रतापराव जाधव यांनी यावेळी केल्या. नादुरुस्त वीज रोहीत्र त्वरेने दुरुस्त करण्याबाबतही त्यांनी सुचीत केले. पैशाची मागणी करणार्या एजंटाविरोधात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात अभियंत्यांना त्यांनी ताकीदच दिली.

१९ वर्षानंतर शेतकऱ्याला न्याय

देऊळगाव राजा तालुक्यातील सुरा येथील गबाजी लक्ष्मण चेके यांनी महावितरणकडे १२ जुलै १९९९ मध्ये वीज जोडणीसाठी कोटेशन भरले होते. पैसे भरल्याचीही पावती त्यांनी जनता दरबारात दाखवली. मात्र या शेतकर्याला १९ वर्षानंतरही वीज जोडणी मिळालेली नाही ही बाबत यावेळी समोर आली. त्यामुळे अधिकाऱ्यांना या मुद्द्यावर चांगलेच धारेवर धरण्यात आले. संबंधीत कंत्राटदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून अभियंत्याला निलंबीत करण्याचे निर्देशही देण्यात आले. त्यामुळे या शेतकर्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. येळगाव येथील शेतकर्याच्या शेतात दोन वर्षापासून पोल पडलेले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या शेतात हे पोल लगोलग उभे झाले पाहिजे, अशा सुचना खा. प्रतापराव जाधव यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यातील अन्य ठिकाणच्याही समस्याही या जनता दरबारात मार्गी लावण्यात आल्या.

टॅग्स :buldhanaबुलडाणाmahavitaranमहावितरण