शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणाच्या जनता दरबारात शेकडो तक्रारींचा फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 17:42 IST

बुलडाणा: येथील महावितरणच्या कार्यालयात २५ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या जनता दरबारामध्ये नागरिक, शेतकर्यांच्या शेकडो तक्रारींचा आॅन द स्पॉट फैसला करण्यात आला.

बुलडाणा: येथील महावितरणच्या कार्यालयात २५ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या जनता दरबारामध्ये नागरिक, शेतकऱ्यां च्या शेकडो तक्रारींचा आॅन द स्पॉट फैसला करण्यात आला. तब्बल पाच तास चाललेल्या या जनता दरबारामध्ये शेतकर्यांना वेठीस धराल तर याद राखा, अशी तंबीच खा. प्रतापराव जाधव यांनी अधिकार्यांना दिली. दरम्यान, शेतकरी व जनसामान्यांच्या सुविधेसाठी महावितरण आहे. त्यामुळे अधिकार्यांनी कौटुंबिक भावनेतून काम करून समस्या एैकणारे कान ठेवा, असे सुचक विधानही अधिकार्यांना उद्देशून केले. खा. प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखालीच हा जनता दरबार झाला. यावेळी आ. डॉ. संजय रायमुलकर, आ. डॉ. शशिकांत खेडेकर, बबनराव तुपे, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, शांताराम दाणे, अधिक्षक अभियंता गुलाबराव कडाळे, इन्फ्राचे अधिक्षक अभियंता बोरीकर, उपजिल्हा प्रमुख भोजराज पाटील, तालुका प्रमुख डॉ. मधुसूदन सावळे यांच्यासह अन्य उपस्थित होते. दरम्यान, पैसे भरूनही वीज जोडणी मिळत नाही, अधिकारी पैशाची मागणी करतात, अनधिकृत सब कॉन्ट्रॅक्टर नेमल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले, वीज भारनियमनाचा त्रास अशा स्वरुपाच्या अनेक तक्रारी या जनता दरबारात नागरिक, शेतकर्यांनी केल्या. दरम्यान, उपस्थित अनेक तक्रारींचा यावेळी आॅन द स्पॉट फैसला करण्यात आला. दुसरीकडे धडक सिंचन विहीरीवरील वीज जोडणीस प्राधान्य देणयाच्या सुचनाही खा. प्रतापराव जाधव यांनी यावेळी केल्या. नादुरुस्त वीज रोहीत्र त्वरेने दुरुस्त करण्याबाबतही त्यांनी सुचीत केले. पैशाची मागणी करणार्या एजंटाविरोधात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात अभियंत्यांना त्यांनी ताकीदच दिली.

१९ वर्षानंतर शेतकऱ्याला न्याय

देऊळगाव राजा तालुक्यातील सुरा येथील गबाजी लक्ष्मण चेके यांनी महावितरणकडे १२ जुलै १९९९ मध्ये वीज जोडणीसाठी कोटेशन भरले होते. पैसे भरल्याचीही पावती त्यांनी जनता दरबारात दाखवली. मात्र या शेतकर्याला १९ वर्षानंतरही वीज जोडणी मिळालेली नाही ही बाबत यावेळी समोर आली. त्यामुळे अधिकाऱ्यांना या मुद्द्यावर चांगलेच धारेवर धरण्यात आले. संबंधीत कंत्राटदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून अभियंत्याला निलंबीत करण्याचे निर्देशही देण्यात आले. त्यामुळे या शेतकर्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. येळगाव येथील शेतकर्याच्या शेतात दोन वर्षापासून पोल पडलेले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या शेतात हे पोल लगोलग उभे झाले पाहिजे, अशा सुचना खा. प्रतापराव जाधव यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यातील अन्य ठिकाणच्याही समस्याही या जनता दरबारात मार्गी लावण्यात आल्या.

टॅग्स :buldhanaबुलडाणाmahavitaranमहावितरण