शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

बुलडाणा जिल्ह्यातील एक लाख ८५ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 18:14 IST

बुलडाणा : वर्षपूर्तीनंतरही शेतकरी कर्जमाफीचे गुर्हाळ सुरूच असून २७ जुलै २०१८ पर्यंतच्या तारखेत जिल्ह्यातील एक लाख ८५ हजार ४४८ शेतकऱ्यांना ९५० कोटी ६८ लाख ३३ हजार रुपयांची कर्जमाफी झाल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देबुलडाणा जिल्ह्यात शेतकरी कर्जमाफीसाठी प्रारंभी दोन लाख ५० हजार शेतकरी कुटूंब पात्र ठरले होते. प्रत्यक्षात एक लाख ५९ हजार ८३२ शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळाली होती.

 

- नीलेश जोशी

बुलडाणा : वर्षपूर्तीनंतरही शेतकरी कर्जमाफीचे गुर्हाळ सुरूच असून २७ जुलै २०१८ पर्यंतच्या तारखेत जिल्ह्यातील एक लाख ८५ हजार ४४८ शेतकऱ्यांना ९५० कोटी ६८ लाख ३३ हजार रुपयांची कर्जमाफी झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आतापर्यंत आठ ग्रीनलिस्ट आल्या असून, नवव्या ग्रीन लिस्टमध्ये जवळपास २६ हजार ६१६ शेतकऱ्यांना ९८ कोटी ८९ लाख रुपयांची कर्जमाफी मिळाल्याचा अंदाज असून त्यामुळे पूर्वीच्या ८५१ कोटी ७९ लाख रुपयांच्या कर्जमाफीच्या रकमेत वाढ झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात शेतकरी कर्जमाफीसाठी प्रारंभी दोन लाख ५० हजार शेतकरी कुटूंब पात्र ठरले होते. त्यांच्या कर्जमाफीसाठी एक हजार ४०० कोटी रुपयांची गरज होती. आठ डिसेंबर २०१७ पर्यंत प्रत्यक्षात जिल्ह्यात ५९ हजार २०२ शेतकर्यांना कर्जमाफी मिळून त्यापोटी २६८ कोटी ७१ लाख रुपये शेतकर्यांच्या खात्यात जमा झाले होते. दरम्यान, त्यानंतर सातत्याने हा आकडा वाढत जाऊन मधल्या काळात तो ८५१ कोटी ७९ लाख रुपयांच्या घरात गेला होता तर प्रत्यक्षात एक लाख ५९ हजार ८३२ शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळाली होती. मात्र यातील प्रोत्साहनपर अनुदान, वनटाईम सेटलमेंटच्या कार्यवाहीत कर्जमाफीची प्रक्रिया रेंगाळत गेली. त्यातच जिल्ह्यातील जवळपास ३० हजारांपेक्षा अधिक शेतकर्यांचा डाटाच अपडेट नसल्याने त्यांची प्रकरणे ही तालुकास्तरीय समितीच्या कोर्टात(टीेलसी) फेब्रुवारी २०१८ दरम्यान गेली होती. त्यात सातत्याने वाढ होत गेली आहे. या शेतकर्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा हा टीएलसी त्याबाबत काय निर्णय देते यावर अवलंबून आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून ६९१ कोटी २९ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेणार्या एक लाख २३ हजार ८१६ शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली तर अ‍ॅक्सीस, एचडीएफसी, आयसीआयसी या खासगी बँकांकडून ५३२ शेतकऱ्यांनी घेतलेले ९ कोटी ८१ लाख चार हजार रुपयांचे कर्जही माफ झाले आहे. दरम्यान, ग्रामीण बँकांकडून कर्ज घेतलेल्या २७ हजार ८८ शेतकऱ्यां ना ९० कोटी ९८ लाख ६३ हजार रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. जिल्हा बँकेकडून कर्ज घेतलेल्या ३४ हजार १२ शेतकर्यांनाही १५८ कोटी ५९ लाख १६ हजार हजार रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे.

प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम प्रलंबीत

प्रोत्साहनपर अनुदानापोटी शेतकर्यांना २५ कोटी ८१ लाख ९० हजार रुपयां मिळाले आहेत. मात्र प्रत्यक्षात ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडे १६ कोटी ६२ लाख, खासगी बँकांकडे सात कोटी ७४ लाख तर ग्रामीण बँकांकडे एक कोटी ७१ लाख रुपयांचे हे शेतकर्यांचे प्रोत्साहनपर अनुदान आहे. तेही वेळेत शेतकऱ्यांना मिळावे अशी ओरड आता होत आहे. ३१ जुलै २०१७ पर्यंत कर्जाची परतफेड करणार्या शेतकर्यांना २०१५-१६ या वर्षातील कर्जाच्या २५ टक्के किंवा २५ हजार रुपयांपैकी जी रक्कम कमी असले ती यातंर्गत अनुदानस्वरुपात शेतकर्यांना देण्यात येत आहे. १५ हजार रुपयांपेक्षा कमी रक्कम असल्यास अशी संपूर्ण रक्कम शेतकर्यांना परत देण्यात येणार आहे.

सहा हजार शेतकऱ्यांची कर्ज माफी प्रक्रियेत

याशिवाय जिल्ह्यातील सहा हजार ६३१ शेतकर्यांच्या कर्जमाफीच्या अर्ज प्रलंबीत असून कर्जमाफीसंदर्भातील त्यांची प्रक्रिया सुरू आहे. येत्या दोन ते तीन दिवसात ती पूर्णत्वास जाईल, असेही सुत्रांनी सांगितले. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडे पाच हजार ३६९ तर ग्रामीण बँकांकडे ८०० सध्या कर्जमाफीच्या प्रक्रियेत आले आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीagricultureशेती