शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

प्राधान्यक्रम भरण्याची मुदत संपली, आता निवड यादीची प्रतीक्षा

By संदीप वानखेडे | Updated: April 26, 2023 16:40 IST

एक दिवस दिली हाेती मुदतवाढ : नवीन नाेंदणी लवकरच सुरू हाेण्याची शक्यता

बुलढाणा : १९६ व्यवस्थापनांच्या वर्ग ६ ते १२ वीच्या शिक्षकांच्या रिक्त जागांसाठी प्राधान्य क्रम भरण्याची मुदत २५ एप्रिलपर्यंत असताना त्यात एक दिवसाची वाढ करून २६ एप्रिलपर्यंत देण्यात आली हाेती. ही मुदत संपली असून, भावी शिक्षकांना आता निवड यादीची प्रतीक्षा लागली आहे. तसेच नुकत्याच झालेल्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची पवित्र पोर्टलवर नोंदणीची प्रतीक्षाच आहे़.

सन २०१७ मध्ये घेण्यात आल्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलवर शिक्षकांची भरती करण्यात येत आहे. १९६ व्यवस्थापनांच्या जागांसाठी प्राधान्यक्रम भरून घेण्यात आले हाेते. मात्र, तांत्रिक कारणांमुळे उमेदवारांना १३ एप्रिल ते २५ एप्रिलदरम्यान पुन्हा प्राधान्य क्रम नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली हाेती. २५ एप्रिल राेजी उमेदवारांची संख्या पाहता, अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी २६ एप्रिल राेजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली हाेती. त्यानंतर मुदत वाढ देण्यात येणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे भावी शिक्षकांना आता निवड यादीची प्रतीक्षा लागली आहे.

नवीन भरतीला मुहूर्त मिळेना

राज्य शासनाने ३० हजार शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याची घाेषणा केली हाेती. त्यानुसार तातडीने फेब्रुवारी महिन्यात शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली. या परीक्षेचा निकालही जाहीर करण्यात आला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर पवित्र पोर्टलवर नाेंदणी सुरू हाेणे अपेक्षित हाेेेते. मात्र, २०१७ ची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येत असल्याने नवीन शिक्षक भरतीचा मुहूर्तच मिळत नसल्याचे चित्र आहे.

१०० टक्के रिक्त जागा भराव्यात...

२०१७ मध्ये पहिल्यांदाच शिक्षकांची भरती अभियोग्यता चाचणीद्वारे करण्यात आली. त्यावेळी एकूण १२ हजार शिक्षक भरणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, केवळ ५ हजार जागा भरून पुढील प्रक्रिया बारगळली. त्यामुळे अनेक उमेदवारांचे नुकसान झाले. त्यानंतर आता २०२३ मध्ये पुन्हा शिक्षक भरतीसाठी अनेक उमेदवारांनी शिक्षक अभियोग्यता परीक्षा दिली असून, त्याचा निकालही जाहीर झाला आहे.

मात्र, २०१७ च्या भरती प्रक्रियेतच शासन अडकून पडल्यामुळे २०२३ ची भरती सध्या तरी थांबली आहे. त्यातच शिक्षणमंत्री केसरकर वारंवार सांगत आहेत की, शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी, म्हणजेच जूनपूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण होऊन ८० टक्के शिक्षक भरण्यात येतील. त्यामुळे भावी शिक्षकांच्या आशा वाढल्या असून, ८० ऐवजी १०० टक्के जागा भरल्यास अजून आनंद होईल, असे मत अभियोग्यताधारकांतून उमटत आहे.