शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

प्राधान्यक्रम भरण्याची मुदत संपली, आता निवड यादीची प्रतीक्षा

By संदीप वानखेडे | Updated: April 26, 2023 16:40 IST

एक दिवस दिली हाेती मुदतवाढ : नवीन नाेंदणी लवकरच सुरू हाेण्याची शक्यता

बुलढाणा : १९६ व्यवस्थापनांच्या वर्ग ६ ते १२ वीच्या शिक्षकांच्या रिक्त जागांसाठी प्राधान्य क्रम भरण्याची मुदत २५ एप्रिलपर्यंत असताना त्यात एक दिवसाची वाढ करून २६ एप्रिलपर्यंत देण्यात आली हाेती. ही मुदत संपली असून, भावी शिक्षकांना आता निवड यादीची प्रतीक्षा लागली आहे. तसेच नुकत्याच झालेल्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची पवित्र पोर्टलवर नोंदणीची प्रतीक्षाच आहे़.

सन २०१७ मध्ये घेण्यात आल्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलवर शिक्षकांची भरती करण्यात येत आहे. १९६ व्यवस्थापनांच्या जागांसाठी प्राधान्यक्रम भरून घेण्यात आले हाेते. मात्र, तांत्रिक कारणांमुळे उमेदवारांना १३ एप्रिल ते २५ एप्रिलदरम्यान पुन्हा प्राधान्य क्रम नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली हाेती. २५ एप्रिल राेजी उमेदवारांची संख्या पाहता, अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी २६ एप्रिल राेजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली हाेती. त्यानंतर मुदत वाढ देण्यात येणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे भावी शिक्षकांना आता निवड यादीची प्रतीक्षा लागली आहे.

नवीन भरतीला मुहूर्त मिळेना

राज्य शासनाने ३० हजार शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याची घाेषणा केली हाेती. त्यानुसार तातडीने फेब्रुवारी महिन्यात शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली. या परीक्षेचा निकालही जाहीर करण्यात आला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर पवित्र पोर्टलवर नाेंदणी सुरू हाेणे अपेक्षित हाेेेते. मात्र, २०१७ ची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येत असल्याने नवीन शिक्षक भरतीचा मुहूर्तच मिळत नसल्याचे चित्र आहे.

१०० टक्के रिक्त जागा भराव्यात...

२०१७ मध्ये पहिल्यांदाच शिक्षकांची भरती अभियोग्यता चाचणीद्वारे करण्यात आली. त्यावेळी एकूण १२ हजार शिक्षक भरणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, केवळ ५ हजार जागा भरून पुढील प्रक्रिया बारगळली. त्यामुळे अनेक उमेदवारांचे नुकसान झाले. त्यानंतर आता २०२३ मध्ये पुन्हा शिक्षक भरतीसाठी अनेक उमेदवारांनी शिक्षक अभियोग्यता परीक्षा दिली असून, त्याचा निकालही जाहीर झाला आहे.

मात्र, २०१७ च्या भरती प्रक्रियेतच शासन अडकून पडल्यामुळे २०२३ ची भरती सध्या तरी थांबली आहे. त्यातच शिक्षणमंत्री केसरकर वारंवार सांगत आहेत की, शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी, म्हणजेच जूनपूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण होऊन ८० टक्के शिक्षक भरण्यात येतील. त्यामुळे भावी शिक्षकांच्या आशा वाढल्या असून, ८० ऐवजी १०० टक्के जागा भरल्यास अजून आनंद होईल, असे मत अभियोग्यताधारकांतून उमटत आहे.