शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

महाराष्ट्र-गुजरातमधील दमणगंगा-पिंजर पाणीवाटप तंटा सुटला - नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 5:44 PM

बुलडाणा : दमणगंगा आणि पिंजर प्रकल्पांवरून महाराष्ट्र आणि गुजरातमधील पाणीवाटपाचा तंटा सुटल्यात जमा असून पुढील आठवड्यात या करारावर स्वाक्षऱ्या  होणार आहेत.

ठळक मुद्देमहाराष्ट्र आणि गुजरातमध्ये दमणगंगा आणि पिंजर संदर्भात असलेला तंटाही संपुष्टात आला असून पुढील आठवड्यात यासंदर्भातील करारावर स्वाक्षरी होणार आहे.. परिणामी नाशिक, नगर, आणि मराठवाड्यातील धरणे १०० टक्के भरून या भागातील पाणी समस्या निकाली निघण्यास मदत होणार आहे. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना गुजरात आणि महाराष्ट्रात झालेला यासंदर्भातील मुख्यमंत्र्यांना अमान्य होता.

- नीलेश जोशीबुलडाणा : दमणगंगा आणि पिंजर प्रकल्पांवरून महाराष्ट्र आणि गुजरातमधील पाणीवाटपाचा तंटा सुटल्यात जमा असून पुढील आठवड्यात या करारावर स्वाक्षऱ्या  होणार आहेत. परिणामी नाशिक, नगर, आणि मराठवाड्यातील धरणे १०० टक्के भरून या भागातील पाणी समस्या निकाली निघण्यास मदत होणार आहे. ३० हजार कोटी रुपयांचे हे प्रकल्प असून हे पाणी गोदावरी नदीत सोडण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय भुपृष्ठ, जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी बुलडाणा येथे दिली.बुलडाणा जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या सुजलाम सुफलांम बुलडाणा अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत ते बुलडाण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते.यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, यापूर्वी राज्या राज्यात पाणीप्रश्नावर तंटे होते. पण आपण या खात्याचे मंत्री झाल्यानंतर हे तंटे मिटविण्याला प्राधान्य दिले असून नुकताच दक्षीणेतील दोन राज्यातील तंटा संपुष्टात आला आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये दमणगंगा आणि पिंजर संदर्भात असलेला तंटाही संपुष्टात आला असून पुढील आठवड्यात यासंदर्भातील करारावर स्वाक्षरी होणार आहे. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना गुजराज आणि महाराष्ट्रात झालेला यासंदर्भातील मुख्यमंत्र्यांना अमान्य होता.त्यामुळे या प्रश्नी दिल्लीमध्ये बैठक बोलून तोडगा काढण्याचा प्रयत्न आपण केला होता. त्यात प्रारंभी यश आले नाही. परंतू नंतर सचिवांशी चर्चा करून यावर तोडगा काढण्यात येऊन दमणगंगा आणि पिंजरमधील पाणी गोदावरी नदी सोडून नाशिक, नगर आणि मराठवाड्यातील धरणे १०० टक्के भरण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात येत आहे. ३० हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून मुख्यमंत्र्यांच्या आग्रहास्तव या भागातील चार धरणांचा प्रश्नही मार्गी लागत असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या भाषणात म्हणाले.पाणीतंटे सोडविण्यावर भरराज्या राज्यात पाणीप्रश्नावरून असलेले तंटे सोडविण्यावर या खात्याचे मंत्री झाल्यानंतर आपण भर दिला आहे. उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशातील दुष्काळी भागावरून असलेला तंटाही मार्गी लागत असून केनबेतवा प्रकल्पासाठी ४० हजार कोटी रुपयांची रुपरेषा ठरली आहे. त्यातही केंद्र सरकार ३० हजार कोटी रुपये टाकत असल्याचे गडकरी म्हणाले.तर दक्षीणेतील पाणीसमस्या सुटेलआंध्रप्रदेशातील पोलावरम धरणामुळे तेथे कृषी क्रांती झाली असून आंध्रात कृषीचे दहा हजार कोटींनी उत्पन्न वाढल्याचा दावा चंद्रबाबू नायडूंनी केला असल्याचे गडकरी म्हणाले. पोलावरम धरणातील १४० टीएमसी पाणी २१० किमी कॅनॉलद्वारे कृष्णा नदीत जोडण्यात आल्याने या भागात पाण्याची उपलब्धता होऊन हे उत्पन्न वाढले आहे. दरम्यान, तीन हजार टीएमसी पाणी गोदावरीमधून वाहून जात आहे. त्या पाण्याचे योग्य नियोजन करून धरणांमधील बॅक वॉटर पोलावरम, कृष्णा, पेरोममध्ये सोडल्यास आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक या चार राज्यांचा पाणीप्रश्न मिटण्यास मोठी मदत होईल. या माध्यमातून ७५० ते ८५० एमलटी पाणी वाचविल्यास मोठी मदत होईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाNitin Gadakriनितिन गडकरीMaharashtraमहाराष्ट्रGujaratगुजरात