शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

चिखली तालुक्यातील सीताफळ जयपूर, इंदुरच्या बाजारात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2020 12:12 IST

Buldhana Agriculture News सीताफळाची लागवड करून राजेंद्र वाघमारे यांनी तोट्यात जाणाऱ्या शेतीचे फायद्यात रूपांतर केले.

- सुधीर चेके पाटील लोकमत न्यूज नेटवर्क चिखली : पाण्याची कमतरता, त्यात जमीनीचा पोत खराब, अशा परिस्थितीत सातत्याने नुकसान सोसावे लागत असल्याने पारंपारीक पिकाला फाटा देत कमी पाण्यावर येणाऱ्या सीताफळाची लागवड करून राजेंद्र वाघमारे यांनी तोट्यात जाणाऱ्या शेतीचे फायद्यात रूपांतर केले. त्यांच्या शेतातील उच्च दर्जाचे सीताफळ थेट जयपूर आणि इंदुरच्या बाजारात विकले जात आहेत. लाखो रूपयांचे उत्पन्न त्यांना मिळत आहे.तालुक्यातील सोमठाणा येथील राजेंद्र श्रीराम वाघमारे हे उच्चशिक्षित, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग चिखली येथे कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत. शेतीशी असलेली नाळ त्यांनी तुटू दिली नाही. त्यांच्याकडे साडेसात एकर जमीन आहे. डोलखेडा येथील दत्तात्रय राऊत यांच्यापासून प्रेरणा घेवून त्यांनी ३ एकरावर  काटक अशा सीताफळाची २०१५ मध्ये लागवड केली. लागवडी पश्चात तीन वर्षांनंतर त्यांना उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण झाला. तीन एकर शेतात १० बाय १० या अंतरावर ८०० सीताफळांच्या झाडांची लागवड केली. झाडांना ठिबकव्दारे पाणी देऊन जगविण्याचे काम केले. राज्यातील विविध भागातील शेतकरी त्यांची शेती पहायला येतात. पहिल्या वर्षी साडेतीन लाख, दुसऱ्या वर्षी चार लाखापर्यंत उत्पन्न मिळाले. यंदा मध्यप्रदेशातील इंदुर येथून मागणी आली असून ८० ते १३० रूपये प्रति किलोप्रमाणे भाव मिळत आहे.

सीताफळ हे कमी पाण्यात येणारे फळपीक असल्याने याकडे आता अनेक शेतकरी वळले आहे. लागवड जास्त होत असल्याने भाव कमी होत आहेत. आपल्या भागात सीताफळ प्रक्रिया उद्योगाची उभारणी होणे गरजेचे आहे. -राजेंद्र वाघमारे,  सोमठाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाChikhliचिखलीagricultureशेतीFarmerशेतकरी