शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

संग्रामपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नूकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 15:58 IST

शनिवारी दुपारी १ वा. पासून सोनाळा परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

संग्रामपूर :-  संग्रामपूर तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री नंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यात महसूली पाच मंडळात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये 'कही खुशी कही गम' अशी परिस्थिती आहे. कवठळ मंडळात ६२ मी मी पावसाची नोंद झाली. पातुर्डा ५५, संग्रामपूर ६४, सोनाळा ७४ तर बावनबिर मंडळात सर्वात जास्त ८५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात एकूण ६८ मि. मि पावसाची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीमुळे असंख्य शिवारात प्रचंड शेती पिकांचे नुकसान झाले आहे. लहान नद्या व नाले दुथडी भरून वाहू लागले. बहूतांश ठिकाणी पाझर तलाव भरल्याने ओव्हर फ्लो झाले. अगोदरच बोगस बियाणे मुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. आता या पावसामुळे शेकडो हेक्टर वर पेरण्यात आलेल्या विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. असंख्य शेतकऱ्यांची शेती खरडून गेली आहे. रात्री पडलेल्या या पावसामुळे वान नदीला पहीले पूर गेले असून वानखेड व पातुर्डा या दोन गावातील वान नदीवरील पूल पाण्याखाली गेले होते. तालुक्यातील वानखेड, पातुर्डा, कवठळ, मनार्डी, वरवट बकाल, बावनबीर, संग्रामपूर, सोनाळा सह सर्वच शिवारात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने घरांचे नुकसान झाले असून बहुतांश ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. वरवट बकाल येथील बाजार समितित पाणी घुसल्याने येथे पडून असलेले शेतकऱ्यांचे शेतीमाल पूर्णपणे भिजले आहे. यात गहू, हरभरा, तूर, ज्वारी मका आदी धान्यांचा समावेश आहे. आ. डॉ. संजय कुटे यांनी संग्रामपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. शनिवारी दुपारी १ वा. पासून सोनाळा परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरRainपाऊसagricultureशेती