शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविम्याची प्रतीक्षा - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:25 IST

साखरखेर्डा: तालुक्यातील सातही मंडळांत अतिवृष्टी झाल्याने तालुक्यातील १०५ गावांत ओला दुष्काळ म्हणून जाहीर करण्यात आला. परंतु, शेतकऱ्यांना अद्यापही पीकविमा ...

साखरखेर्डा: तालुक्यातील सातही मंडळांत अतिवृष्टी झाल्याने तालुक्यातील १०५ गावांत ओला दुष्काळ म्हणून जाहीर करण्यात आला. परंतु, शेतकऱ्यांना अद्यापही पीकविमा रक्कम मिळाली नाही. पीकविमा रक्कम तत्काळ मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. खरीप हंगामाच्या पेरणीचे दिवस जवळ आलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मागील हंगामातील पीकविम्याची रक्कम मिळाली, तर यंदा पेरणीसाठी आर्थिक मदत होऊ शकते.

साखरखेर्डा परिसरात मागील वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. साखरखेर्डा आणि शेंदुर्जन मंडळात सर्वाधिक पाऊस पडल्याने सोयाबीन, कपाशी ही पिके उद्ध्वस्त झाली होती. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हिरवा दाना असतानाच कोंब फुटले होते. तर कापसाला बोंडी येऊन कापूस वेचणीला आला होता. अतिवृष्टीमुळे काही शेतकऱ्यांनी कपाशी उपटून टाकली. हेक्टरी चार क्विंटल सरासरी निघाल्याने पेरणी, डवरणी, बी, खते, काढणी, मळणी यांचा सरासरी हिशेब केला तर झालेला खर्चही निघाला नाही. पीकविमा काढण्यासाठी तालुका कृषी अधिकारी वसंतराव राठोड यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन विमा काढण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक यांना पाठविले होते. तालुक्यातील ४५ हजार शेतकऱ्यांपैकी २५ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेचा लाभ घेतला होता. पीकविमा काढताना शेतकऱ्यांच्या दारी जाणारे कृषी अधिकारी आज मात्र गप्प का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील सर्व १०५ गावांची आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी असताना शेतकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत नाही. केवळ खरडलेल्या जमिनीचा पंचनामा करून त्यांनाच मदत विमा कंपनीने केली. इतर शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळाली नाही. शिंदी शिवारातील पाझर तलाव फुटल्याने जवळपास २५ हेक्टर जमीन खरडून गेली होती. त्या शेतकऱ्यांना विमा कंपनीने नुकसान भरपाई दिली नाही, अशा कितीतरी तक्रारी विमा कंपनीच्या विरोधात तहसीलदार सुनील सावंत, तालुका कृषी अधिकारी वसंतराव राठोड यांच्याकडे केलेल्या आहेत. परंतु, कृषी अधिकारी याची दखल घेत नाहीत.

पीकविमा देण्याची मागणी

कोरोना संक्रमण ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक शेतकऱ्यांनी जवळ असलेला पैसा रुग्णालयात घालविला. आज खत, बियाणे भरण्यासाठी पैसा नाही. सोने गहाण ठेवून कर्ज काढावे, तर सोनाराची दुकाने बंद आहेत. शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, अशा बिकट परिस्थितीत शेतकरी अडला असून, पीकविम्याचे हक्काचे पैसे द्यावेत, अशी मागणी वामनराव जाधव, गंभीरराव खरात यांनी केली आहे.

आणेवारी ४८ टक्के आल्यानंतरही विमा कंपनीने सरसकट विमा रक्कम तत्काळ द्यावी. कृषी अधिकारी यांनी त्यासंबंधीची माहिती विमा कंपनीला द्यावी.

तोताराम ठोसरे, उपाध्यक्ष

तालुका सरपंच संघटना.