शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविम्याची प्रतीक्षा - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:25 IST

साखरखेर्डा: तालुक्यातील सातही मंडळांत अतिवृष्टी झाल्याने तालुक्यातील १०५ गावांत ओला दुष्काळ म्हणून जाहीर करण्यात आला. परंतु, शेतकऱ्यांना अद्यापही पीकविमा ...

साखरखेर्डा: तालुक्यातील सातही मंडळांत अतिवृष्टी झाल्याने तालुक्यातील १०५ गावांत ओला दुष्काळ म्हणून जाहीर करण्यात आला. परंतु, शेतकऱ्यांना अद्यापही पीकविमा रक्कम मिळाली नाही. पीकविमा रक्कम तत्काळ मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. खरीप हंगामाच्या पेरणीचे दिवस जवळ आलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मागील हंगामातील पीकविम्याची रक्कम मिळाली, तर यंदा पेरणीसाठी आर्थिक मदत होऊ शकते.

साखरखेर्डा परिसरात मागील वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. साखरखेर्डा आणि शेंदुर्जन मंडळात सर्वाधिक पाऊस पडल्याने सोयाबीन, कपाशी ही पिके उद्ध्वस्त झाली होती. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हिरवा दाना असतानाच कोंब फुटले होते. तर कापसाला बोंडी येऊन कापूस वेचणीला आला होता. अतिवृष्टीमुळे काही शेतकऱ्यांनी कपाशी उपटून टाकली. हेक्टरी चार क्विंटल सरासरी निघाल्याने पेरणी, डवरणी, बी, खते, काढणी, मळणी यांचा सरासरी हिशेब केला तर झालेला खर्चही निघाला नाही. पीकविमा काढण्यासाठी तालुका कृषी अधिकारी वसंतराव राठोड यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन विमा काढण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक यांना पाठविले होते. तालुक्यातील ४५ हजार शेतकऱ्यांपैकी २५ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेचा लाभ घेतला होता. पीकविमा काढताना शेतकऱ्यांच्या दारी जाणारे कृषी अधिकारी आज मात्र गप्प का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील सर्व १०५ गावांची आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी असताना शेतकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत नाही. केवळ खरडलेल्या जमिनीचा पंचनामा करून त्यांनाच मदत विमा कंपनीने केली. इतर शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळाली नाही. शिंदी शिवारातील पाझर तलाव फुटल्याने जवळपास २५ हेक्टर जमीन खरडून गेली होती. त्या शेतकऱ्यांना विमा कंपनीने नुकसान भरपाई दिली नाही, अशा कितीतरी तक्रारी विमा कंपनीच्या विरोधात तहसीलदार सुनील सावंत, तालुका कृषी अधिकारी वसंतराव राठोड यांच्याकडे केलेल्या आहेत. परंतु, कृषी अधिकारी याची दखल घेत नाहीत.

पीकविमा देण्याची मागणी

कोरोना संक्रमण ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक शेतकऱ्यांनी जवळ असलेला पैसा रुग्णालयात घालविला. आज खत, बियाणे भरण्यासाठी पैसा नाही. सोने गहाण ठेवून कर्ज काढावे, तर सोनाराची दुकाने बंद आहेत. शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, अशा बिकट परिस्थितीत शेतकरी अडला असून, पीकविम्याचे हक्काचे पैसे द्यावेत, अशी मागणी वामनराव जाधव, गंभीरराव खरात यांनी केली आहे.

आणेवारी ४८ टक्के आल्यानंतरही विमा कंपनीने सरसकट विमा रक्कम तत्काळ द्यावी. कृषी अधिकारी यांनी त्यासंबंधीची माहिती विमा कंपनीला द्यावी.

तोताराम ठोसरे, उपाध्यक्ष

तालुका सरपंच संघटना.