शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
3
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
4
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
5
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
6
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
7
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
8
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
9
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
10
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
11
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
12
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
13
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
14
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
15
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
16
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
17
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
18
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री
19
५० टक्के ट्रम्प टॅरिफचा वार, भारत कसा करणार बचाव? ७ पर्याय अजून खुले; अमेरिका गुडघे टेकेल!
20
संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविम्याची प्रतीक्षा - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:25 IST

साखरखेर्डा: तालुक्यातील सातही मंडळांत अतिवृष्टी झाल्याने तालुक्यातील १०५ गावांत ओला दुष्काळ म्हणून जाहीर करण्यात आला. परंतु, शेतकऱ्यांना अद्यापही पीकविमा ...

साखरखेर्डा: तालुक्यातील सातही मंडळांत अतिवृष्टी झाल्याने तालुक्यातील १०५ गावांत ओला दुष्काळ म्हणून जाहीर करण्यात आला. परंतु, शेतकऱ्यांना अद्यापही पीकविमा रक्कम मिळाली नाही. पीकविमा रक्कम तत्काळ मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. खरीप हंगामाच्या पेरणीचे दिवस जवळ आलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मागील हंगामातील पीकविम्याची रक्कम मिळाली, तर यंदा पेरणीसाठी आर्थिक मदत होऊ शकते.

साखरखेर्डा परिसरात मागील वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. साखरखेर्डा आणि शेंदुर्जन मंडळात सर्वाधिक पाऊस पडल्याने सोयाबीन, कपाशी ही पिके उद्ध्वस्त झाली होती. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हिरवा दाना असतानाच कोंब फुटले होते. तर कापसाला बोंडी येऊन कापूस वेचणीला आला होता. अतिवृष्टीमुळे काही शेतकऱ्यांनी कपाशी उपटून टाकली. हेक्टरी चार क्विंटल सरासरी निघाल्याने पेरणी, डवरणी, बी, खते, काढणी, मळणी यांचा सरासरी हिशेब केला तर झालेला खर्चही निघाला नाही. पीकविमा काढण्यासाठी तालुका कृषी अधिकारी वसंतराव राठोड यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन विमा काढण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक यांना पाठविले होते. तालुक्यातील ४५ हजार शेतकऱ्यांपैकी २५ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेचा लाभ घेतला होता. पीकविमा काढताना शेतकऱ्यांच्या दारी जाणारे कृषी अधिकारी आज मात्र गप्प का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील सर्व १०५ गावांची आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी असताना शेतकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत नाही. केवळ खरडलेल्या जमिनीचा पंचनामा करून त्यांनाच मदत विमा कंपनीने केली. इतर शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळाली नाही. शिंदी शिवारातील पाझर तलाव फुटल्याने जवळपास २५ हेक्टर जमीन खरडून गेली होती. त्या शेतकऱ्यांना विमा कंपनीने नुकसान भरपाई दिली नाही, अशा कितीतरी तक्रारी विमा कंपनीच्या विरोधात तहसीलदार सुनील सावंत, तालुका कृषी अधिकारी वसंतराव राठोड यांच्याकडे केलेल्या आहेत. परंतु, कृषी अधिकारी याची दखल घेत नाहीत.

पीकविमा देण्याची मागणी

कोरोना संक्रमण ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक शेतकऱ्यांनी जवळ असलेला पैसा रुग्णालयात घालविला. आज खत, बियाणे भरण्यासाठी पैसा नाही. सोने गहाण ठेवून कर्ज काढावे, तर सोनाराची दुकाने बंद आहेत. शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, अशा बिकट परिस्थितीत शेतकरी अडला असून, पीकविम्याचे हक्काचे पैसे द्यावेत, अशी मागणी वामनराव जाधव, गंभीरराव खरात यांनी केली आहे.

आणेवारी ४८ टक्के आल्यानंतरही विमा कंपनीने सरसकट विमा रक्कम तत्काळ द्यावी. कृषी अधिकारी यांनी त्यासंबंधीची माहिती विमा कंपनीला द्यावी.

तोताराम ठोसरे, उपाध्यक्ष

तालुका सरपंच संघटना.