शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

बुलडाणा जिल्ह्यातील ६८८ शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 1:22 PM

सोयाबीन उगवले नसल्याची तक्रार केलेल्या शेतकºयांच्या बांधावर जाऊन कृषी विभागाकडून पंचनामे करण्यात येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात सरासरी ७० टक्के खरीपाची पेरणी पूर्ण झाली आहे. परंतू यंदा बोगस बियाण्यांचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. ८०० हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन उगवलेच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ६८८ शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. सोयाबीन उगवले नसल्याची तक्रार केलेल्या शेतकºयांच्या बांधावर जाऊन कृषी विभागाकडून पंचनामे करण्यात येत आहेत.मृग नक्षत्रात झालेल्या पावसावर खरीप हंगामाची पेरणी केल्यानंतर चांगले उत्पादन मिळते. परंतू दरवर्षी पाऊस लांबत असल्याने मृग नक्षत्रातील पेरणीचा मुहूर्त हुकत बेभरवश्याच्या या पावसाचा शेतकºयांना दरवेळी फटका बसतो. यंदा मृग नक्षत्रात पाऊस झाल्याने बहुतांश शेतकºयांनी पेरणी उरकली. परंतू पावसाने पाठ फिरवल्याने शेतकºयांच्या आनंदावर विरजण पडले. पावसाची दांडी, त्यात बोगस बियाण्यांचा फटका असे दुहेरी संकट शेतकºयांवर निर्माण झाले आहे. सध्या ७० टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यामध्ये २ लाख ६३ हजार ९८ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झालेला आहे. परंतू यंदा बोगस बियाण्यांमुळे, तर कुठे पाऊस न झाल्याने सोयाबीन उगवलेच नसल्याचे प्रकार समोर आले आहेत. १ जुलैपर्यंत सोयाबीन न उगवल्याच्या ६८८ शेतकºयांच्या तक्रारी कृषी विभागाकडे आल्या आहेत. ८०० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचे बियाणे उगवलले नाही. तालुकास्तरीय समित्यांच्या माध्यमातून शेतकºयांच्या तक्रारीनंतर पंचनामे करण्यात येत आहेत. ज्या कंपन्या शेतकºयांसाठी सहकार्याची भूमिका ठेवणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे सुत्रांनी सांगितले.सोयाबीन पाठोपाठ कपाशीचे क्षेत्रजिल्ह्यात एकूण पेरणीच्या ४ लाख ९ हजार २११ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन असते. सर्वाधिक क्षेत्र हे सोयाबीनचे आहे. सोयाबीन पाठोपाठ जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र आहे. १ लाख ६८ हजार ८७९ हेक्टर क्षेत्रावर कपाशीचा पेरा होतो. सध्या १ लाख ५५ हजार ५४६ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली.

माझ्या पाच एकर शेतात मी १० जूनला सोयाबीनची पेरणी केली होती. त्यानंतर पावसाने पाठ फिरवली. शेतात तुरळक ठिकाणी सोयाबीन उगवले. ते वखरुन दुबार पेरणी करावी लागत आहे.-गोपाल पाझडे, शेतकरी साखरखेर्डा.

सोयाबीन बियाणे उगवुन आले नाही. त्यामुळे मला दुबार पेरणी करावी लागली. ऐनवेळी पावसाने हजेरी लावल्याने आता पेरण्या यशस्वी झाल्या आहेत. आता मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.-आत्माराम नरवाडे,शेतकरी, सावळी.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी