शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

अवैध पाणी उपसा करणार्‍यांवर फौजदारी दाखल करणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 02:01 IST

बुलडाणा : संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर नागरी आणि शहरी भागास पाणी पुरवठा करणार्‍या प्रकल्पांवरून अवैधरीत्या पाण्याचा उपसा करणार्‍याविरोधात फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

ठळक मुद्दे तालुका स्तरावर नियुक्त केली पथके दर आठवड्याला घेणार आढावा

प्रभाव लोकमतचालोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर नागरी आणि शहरी भागास पाणी पुरवठा करणार्‍या प्रकल्पांवरून अवैधरीत्या पाण्याचा उपसा करणार्‍याविरोधात फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. दरम्यान, तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली यावर देखरेख ठेवण्यासाठी पथकेही नियुक्त करण्यात आली असून, तहसीलदार या समितीचे अध्यक्ष राहणार असून, दर आठवड्याला या प्रश्नी स्थितीचा आढावा घेण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी निर्देशित केले आहे.यासंदर्भात लोकमतने २४ ते २७ ऑक्टोबर दरम्यान पाणी ‘आरक्षणाचा पेच’ ही वृत्तमालिका आणि लोणार शहरासाठी पाणी आरक्षित असलेल्या ‘बोरखेडी धरणातून होतोय अवैध पाणी उपसा’, या आशयाचे वृत्त आठ नोव्हेंबरच्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्यानुषंगाने उपरोक्त निर्देश २७ ऑक्टोबरला झालेल्या पाणी आरक्षण समितीच्या बैठकीत कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिले होते. त्या संदर्भाने आता  नोव्हेंबरमध्ये तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली पथके गठीत करण्यात आली आहेत. यामध्ये पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता सदस्य सचिव असून, पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी, वीज वितरणचे उपअभियंता, पालिकांचे मुख्याधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता हे सदस्य म्हणून आहेत. बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १0७ टक्के पाऊस झाला असला, तरी नागरी आणि ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणार्‍या प्रकल्पांमध्ये अपेक्षित जलसाठा यावर्षी उपलब्ध नाही. गतवर्षीच्या तुलनेत अवघा ३५ टक्केच जलसाठा या प्रकल्पांमध्ये १५ ऑक्टोबरच्या पाणी आरक्षणाच्या अनुषंगाने  शिल्लक आहे. या पाणीसाठय़ाच्या आधारावरच जून २0१८ पर्यंतचे शहरी आणि नागरी भागाचे पाणी आरक्षित करण्यात आले आहे. ४0 दलघमी पेक्षा अधिक पाणी हे पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. शहरी भागात जवळपास साडेपाच लाखांच्या आसपास लोकसंख्या असून, ग्रामीण भागात १८ लाखांच्या आसपास लोकसंख्या आहे. त्यांच्या पिण्याच्या पाण्याचे प्रामुख्याने नियोजन या माध्यमातून करण्यात आले आहे. 

३0 टक्के पाण्याचे बाष्पीभवनप्रकल्पातील उपलब्ध असलेल्या पाण्यापैकी ३0 टक्के पाणी साधारणत: बाष्पीभवन आणि जमिनीत मुरण्यासोबतच गळतीमुळे वाया जाते. त्यामुळे वर्तमान स्थितीत प्रकल्पामध्ये उपलब्ध असलेल्या पाण्यापैकी ५८ दलघमी पाणीसाठा उपयोगात येऊ शकत नाही. त्यामुळे जिल्हय़ातील बहुतांश प्रकल्पातील पाणी हे पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्याने आरक्षित ठेवण्यात आलेले आहे.

कारवाईसही झाला प्रारंभअमडापूर गावास पाणी पुरवठा करणार्‍या ब्राम्हणवाडा धरणावरून तहसीलदार अध्यक्ष असलेल्या पथकाने कारवाई करीत ५0 कृषी पंपाविरोधात कारवाई केली आहे. या धरणात सध्या मृतसाठा शिल्लक असून, त्यावर अमडापूर येथील १६ हजार नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे. ग्रामपंचायतीने मागणी केल्यानंतर १४ नोव्हेंबरला ही कारवाई करण्यात आली.

सिंचन कार्यक्रमालाही फटकारब्बी हंगामात यावर्षी अपेक्षित असा सिंचन कार्यक्रमही राबवणे अशक्य असल्याचे बैठकीदरम्यान स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे शेतकरी वर्गाचीही अडचण होणार आहे. प्रामुख्याने नागरी आणि ग्रामीण भागाचा पाणी पुरवठा अवलंबून असलेल्या प्रकल्पांसंदर्भात हे धोरण असल्याचे संकेत आहेत. जिल्ह्याचा टंचाई कृती आराखडाही नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात प्रत्यक्षात दृष्टीपथास येण्याची शक्यता आहे. त्या आधीच मेहकर, लोणारसह अन्य काही तालुक्यातील ग्रामीण भागात टंचाईची दाहकता जाणवत आहे. जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील काही गावे आधीच डार्क झोनमध्ये गेल्या दोन वर्षांपूर्वी टाकण्यात आली होती. 

टॅग्स :Waterपाणी